कन्यादान योजना !!

कन्यादान योजना !!

 




  
सरकारी जीआर-



शासन निर्णय क्रमांक: सावियो-२००३/प्र.क्र. ७/ सुधार-१ दि. २४ डिसेंबर २००३
 

शासन निर्णय क्रमांक: सावियो-२००५/प्र.क्र. ४१/सुधार-१/मुंबई दि. १८ डिसेंबर २००८





उद्देश-



विवाह सोहळ्यामध्ये अनाठायी खर्च करणे आणि त्यासाठी कर्जबाजारी होणे व आर्थिक समस्या खाईत लोटले जाणे हे प्रकार टाळण्यासाठी विमुक्त जाती, भटक्या जमाती (धनगर व वंजारींसह) विशेष मागास प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबातील सामुहिक विवाह सोहळ्यात समाविष्ट होणाऱ्या जोडप्यांना अर्थसहाय्य देणे.




स्वरूप-

   


सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होऊन विवाह करणाऱ्या वि.जा.भ.ज./ वि.मा.प्र. कुटुंबातील जोडप्यास रु. १० हजार इतके अर्थसहाय्य वधूचे आई-वडील किंवा पालकांच्या नावे धनादेशाद्वारे विवाहाच्या दिवशी देण्यात येते,
   
 


सामुहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या संस्था व संघटनांना प्रत्येक जोडप्यामागे रु. २ हजार प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यात येते.



अटी व शर्ती-

   

या योजनेचा लाभ फक्त प्रथम विवाहासाठी आहे तथापि विधवा महिलेस दुसऱ्या लग्नासाठी या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील.
   
 

सामुहिक विवाह सोहळ्यात किमान १० जोडप्यांचा विवाह होणे आवश्यक आहे.
   
 

वधू व वर हे महाराष्ट्राचे रहिवासी असावेत.
   
 

वराचे वय किमान २१ वर्षे आणि वधूचे वय १८ वर्षे असावे.
   
 

सक्षम अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र असावे.



संपर्क- संबंधित जिल्ह्याचे विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी.




धन्यवाद- महाराष्ट्र सरकार समाजकल्याण विभाग.




तुमचाच मित्र- निलेश रजनी भास्कर कळसकर(सोबत प्रबोधन टीम)

https://www.facebook.com/nilesh.kalaskar2?ref=tn_tnmn

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...