योजना- "इयत्ता ५ वी ते ७ वी मध्ये शिकणाऱ्या महाराष्ट्रातील 'विजाभज' व 'विमाप्र' प्रवर्गाच्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना"!!

योजना क्र १-



"इयत्ता ५ वी ते ७ वी मध्ये शिकणाऱ्या महाराष्ट्रातील 'विजाभज' व 'विमाप्र' प्रवर्गाच्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना"!!



सरकारी जीआर-

 

शासन निर्णय क्रमांक: इसीबी - १०९४ / ३२०३८ / प्र.क्र. ९०/ मावक-२/ दि. १२ जानेवारी १९९६
 

शासन निर्णय क्रमांक : इसीबी - २००३/ प्र.क्र. ४१७/ मावक- २/ दि. १३ मार्च २००५


 

योजनेचा उद्देश्य-

   
१) मुलींमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी.
   
२) शिक्षणातील मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे
   
३) शिक्षणातील आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे.



 

योजनेच्या अटी-

   
१) विद्यार्थीनी विजाभज व विमाप्र प्रवर्गातील असावी
   
२) इयत्ता ५ वी ते १० वी मध्ये शिक्षण घेणारी असावी
   
३) उत्पन्नाची अट नाही.
   
४) लाभधारक मुलगी शासनमान्य संस्थेत नियमित शिकत असावी.




लाभाचे स्वरूप-

प्रती विद्यार्थीनी प्रतीमहा रु ६० प्रमाणे १० महिन्यासाठी रु ६०० शिष्यवृत्ती देण्यात येते.


 

संपर्क- 

 

१) जिल्हा समाज कल्याण अधिकारी.

२) संबंधित शाळेचे मुख्याध्यापक/ प्राचार्य.



धन्यवाद- महाराष्ट्र सरकार समाजकल्याण विभाग 
 

-----------------------------------------------------------------------

 

योजना क्र २-


 

"इयत्ता ८ ते १० वी मध्ये शिकणाऱ्या महाराष्ट्रातील 'विजाभज' व 'विमाप्र' प्रवर्गाच्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना"!!







 


सरकारी जीआर-

 

शासन निर्णय क्रमांक : इमाव २००३/ प्र. क्र.२०१/ मावक - ३ दि. २५ जुलै २००३


 

योजनेचा उद्देश-
    

१) मुलींमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे.
    

२) शिक्षणातील मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे.
    

३) शिक्षणासाठी पालकांना आर्थिक मदत होणे.

 


योजनेच्या अटी-

    

१) विद्यार्थीनी विजाभज/ विमाप्र प्रवर्गातील असावी.
    

२) विद्यार्थीनी इयत्ता ८ वी ते १०वी पर्यंतच्या वर्गात शिक्षण घेणारी असावी.
    

३) उत्पन्नाची अट नाही.
    

४) लाभधारक मुलगी शासनमान्य संस्थेत शिकत असावी.
    

५) विद्यार्थीनी पूर्ण वेळ शिक्षण घेणारी असावी.


 

लाभाचे स्वरुप-
 

१) प्रति विद्यार्थींनी प्रतिमहा रु १००/- प्रमाणे १० महिन्यांसाठी एकूण रु १०००/-.


 

संपर्क- 

 

१) संबंधित जिल्ह्याचे विशेष समाज कल्याण जिल्हा अधिकारी.

२) संबंधित शाळेचे मुख्याध्यापक/ प्राचार्य.


 

धन्यवाद- महाराष्ट्र सरकार समाजकल्याण विभाग 


तुमचाच मित्र- निलेश रजनी भास्कर कळसकर(सोबत प्रबोधन टीम)
https://www.facebook.com/nilesh.kalaskar2

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...