माफी मागणार नाही:- शफीकुर्रहमान !!

माफी मागणार नाही:- शफीकुर्रहमान !!


बहुजन समाजवादी पक्षाच्या खासदारने संसदेमध्ये 'वंदे मातरम्' या भारताच्या राष्ट्रीय गीताचा अपमान केल्याची घटना बुधवारी घडली. मात्र 'वंदे मातरम्' इस्लामच्या विरोधी असल्याने मी ही कृती केली असून माफी मागणार नाही, वेळ आलीच तर पुन्हा असेच करीन, अशी दर्पोक्ती शफीकुर्रहमान बर्क यांनी केली.


बुधावारी सभागृहात 'वंदे मातरम्'ची धून वाजण्याची घोषणा झाल्यानंतर सर्व उपस्थित खासदार आपल्या जागेवर उभे राहिले. मात्र राष्ट्रीय गीत सुरु झाल्यानंतर बसपचे खासदार शफीकर्रहमान हे आपल्या जागेवरुन उठून सभागृहाच्या बाहेर गेले. ही गोष्ट अध्यक्ष मीरा कुमार यांच्या नजरेतून सुटली नाही. राष्ट्रीय गीत संपल्यानंतर जेव्हा शफीकुर्रहमान हे सभागृहात परतले तेव्हा मीरा कुमार यांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले. 'वंदे मातरम्' पूर्ण झाल्यावर मीरा कुमार यांनी एक खासदार सभागृहाबाहेर गेल्याचे लोकसभेला सांगितले. 'मी या गोष्टीची गंभीर दखल घेतली असून त्यांच्या या कृत्याचे स्पष्टीकरण द्यावे. तसेच अशी घटना पुन्हा होणार नाही याचीही त्या खासदाराने काळजी घ्यावी, अशी तंबीही कुमार यांनी शफीकर्रहमान यांना दिली.


आपल्या वागणूकीचे समर्थन करताना बर्क यांनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे हा गोंधळ अजूनच वाढला. सर्व खासदार आपआपल्या जागी उभे असताना सभागृह सोडणा-या बर्क यांनी 'वंदे मातरम्' हे इस्लाम विरोधात असून त्याला विरोध करण्यासाठी मी सभागृह सोडून गेल्याचे लोकसभेला सांगितले. तसेच या पुढे असा प्रसंग आल्यास 'आज मी जे केले तेच पुन्हा करेल', असेही बर्क यांनी सांगितले.


बर्क यांच्या या वागणूकीचा आणि स्पष्टीकरणाचा भारतीय जनता पक्षाने कठोर शब्दात निषेध केला. भाजपचे प्रवक्ते सैयद शहनवाज हुसैन यांनी लोकसभेतील सदस्यांना राष्ट्रीय गीताचा अपमान करण्याचा काहीही अधिकार नाही, असे मत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. लोकसभेच्या अध्यक्षांनी अशा खासदाराची कानउघाडणी करुन व्यक्त केलेली संताप योग्य असला तरी अशा प्रकारच्या घटनांमध्ये अध्यक्षांनी आणखी कठोर होण्याची गरज असल्याचेही हुसैन यांनी सांगितले.


राष्ट्रीय गीताचा अपमान केल्याबद्दल लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार, खासदार शफीकुर्रहमान बर्क यांना नोटीसही पाठवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र या प्रकरणाबद्दल बसपने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.


धार्मिक कट्टरता नेहमीच या देशाला हानिकारक ठरत आली आहे. ज्या देशाचे खासदार देशाच्या राष्ट्रगीतापेक्षा स्वतःच्या धर्माला महत्व देत असतील तेव्हा या देशात राष्ट्रीय एकात्मता कशी कायम राहणार ???


प्रिय मित्र-मैत्रिणीनो या खासदाराच्या कृतीबद्दल काय वाटते आपणास ???

नोट- सभ्य भाषेत आपले विचार मांडा असभ्य प्रतिक्रिया डीलीट केल्या जातील.


संदर्भ- http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/19969310.cms

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...