छत्रपती संभाजीराजे !!


१४ मे छात्रवीर,रणमर्द, जगातील पहिले बाल साहीत्यिक, विद्वान पंडित, स्वराज्याचे रक्षणकर्ते, शिवस्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसलेयांच्या  जयंतीच्या हार्दिक-हार्दिक शुभेछा" !!


महाराष्ट्राचे पहिले युवराज आणि दुसरे छत्रपती, छत्रपती संभाजी राजे यांच्या जन्मोत्सव निमित्त माझा हा इतिहास संशोधित लेख-



१६७२ साली हिंदुस्तानात आलेल्या अबे कारे या फ्रेंच प्रवाशाने संभाजी राजांना प्रत्यक्ष पहिले होते. तो लिहितो हा युवराज लहान असला तरी धैर्यशील आणि आपल्या पित्याच्या कीर्तीस साजेल असाच शूर वीर आहे. शिवाजी महाराजासारख्या युद्धकुशल बापाबरोबर राहून तो युद्धकलेत तरबेज झालेला असून, चांगल्या वयोवृद्ध सेनापातीचीही बरोबरी तो करू शकेल इतका तो तयार आहे. या बाळराजाची सर्वत्र इतकी स्तुती केली जाते कि त्याच्या बापालाही त्याचा हेवा वाटत असेल !


असे होते शंभूराजे ! शिवरायांनी १६७० सालापासूनच युवराज म्हणून संभाजीला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. राज्यकारभाराचा अनुभव यावा म्हणून शिवरायांनी जबाबदारीची कामे संभाजीस सांगण्यास सुरुवात केली (२ ६ जानेवारी १६७१) {पहा शिवचरित्र प्रदीप पृ ५२
}.


आबे करे पुढे म्हणतो (१६७२ मध्ये ) "शिवाजी राजांनी आपल्या सैन्याचे विभाग करून शेजारच्या सर्व शत्रूवर एकाच वेळी हल्ला चढवला आहे. शिवाजी राज्यांनी दहा हजार शूर अशा सैन्याचे नेतृत्व आपल्या ज्येष्ठ पुत्र संभाजीच्या ताब्यात दिला आहे. हा युवराज लहान असला तरी धैर्यशील आणि आपल्या पित्याच्या कीर्तीस साजेल असाच शूर वीर आहे. शिवाजी महाराजासारख्या युद्धकुशल बापाबरोबर राहून तो युद्धकलेत तरबेज झालेला असून, चांगल्या वयोवृद्ध सेनापातीचीही बरोबरी तो करू शकेल इतका तो तयार आहे. या बाळराजाची सर्वत्र स्तुती केली जाते. तो मजबूत बांध्याचा, अति रूपवान असा आहे. त्याचे सोदर्य आणि त्याचे पराक्रम हाच सैनिकांचे त्यांचे आकर्षण वाढवणारा मोठा गुण आहे. शिवरायानइतकेच त्यालाही त्याचे सैन्य मान देत असते. फरक इतकाच कि ह्या सैनिकांना संभाजीच्या नेतृत्वाखाली लढण्यात विशेष धन्यता वाटते. ते आपल्या कर्तबगारीचे सर्व श्रेय आपल्या छोट्या सेनापतीस (संभाजीस ) देतात. कोणीही कर्तबगारी दाखवलि कि संभाजी त्यांचे कौतुक करतो. त्यांच्यासमोर एखाद्याने शौर्य दाखवले कि संभाजी त्याला बक्षीस दिल्याशिवाय राहत नाही."


जगावे कसे हे आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवले आणि मरावे कसे हे आम्हाला युवराज छत्रपती संभाजी राजांनी शिकवले! या पितापुत्र यांचे भारतीय इतिहासात अतिशय महत्वाचे असे स्थान आहे. असे असूनही स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीच्या इतिहासकारांनी संभाजी महाराजांना पूर्णपणे बदनाम केले परंतु सत्य हे सत्यच असते हे काळच दाखून देतो !



संभाजी राजांची दिल्ली काबीज करण्याची महत्वाकांशा-


छत्रपती संभाजी महाराजांनी दिल्ली वरही आक्रमण करून दिल्ली काबीज करण्याची योजना बनवली होती. जर संभाजी महाराज अजून ३० वर्षे जगले असते तर हे स्वप्नहि सत्यात उतरावले असते. औरंगजेब याचा पुत्र शेह्जादा अकबर हा संभाजीला शरण आला होता तो तब्बल आठ वर्षे संभाजी राज्यांच्या आश्रयाला होता यावरुण दिल्ली काही दूर नव्हती हेच दिसून येते.


दुर्दैवी मृत्यू-

असा हा शूर, पराक्रमी, देखना मराठ्याचा राजपुत्र महाराष्ट्राला लाभला हे आपले भाग्यच म्हणायचे. परंतु सनातन कर्मकांड स्वार्थी इतिहासकार आणि नाटक कारांनी त्यांचे हे खरे चित्र कधीच जनतेसमोर मांडले नाही हे त्यांचे दुर्दैव!


सर जदुनाथ सरकार या थोर इतिहासकाराने संभाजी राजांवर ब्राह्मणी शक्तींनी वांरवांर विषप्रयोग केला व त्यांना मारण्याचा प्रयत्न केला गेला असे म्हटलेआहे तसेच पोंडीचेरीचा समकालीन फ्रेंच गव्हर्नर मार्टिन यानेदेखील आपल्या रोजनिशीत संभाजी राजांच्या काही प्रमुख ब्राह्मणांनी मुघल अधिकाऱ्यांची संगनमत करून त्यांचा नाश घडवून आणला असे नमूद केले आहे. हे सर्व काही दुर्दैविच असे म्हणावे लागेल.



स्वराज्याच्या ह्या दुसर्या रणधुरंधर, राजबिंड्या वादळास माझा मानाचा मुजरा... __/\__


जय जय रौद्रशंभो !!



संदर्भ - House of Chatrapati Shivaji By Jadunath Sarkar.


लेखं- शंकर माने.

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...