नक्षलवादी !!

नक्षलवादी !!


उद्विग्नतेची सगळी दारे जेव्हा उघडतात
व्यवस्थेच्या दगडी भिंतीशी
वेदनांची मुळे जेव्हा भिडून जातात
विषमतेच्या ज्वालामुखीशी
पोटाचे गणित जेव्हा जुळत नाही
अविरत गाळलेल्या घामाशी
चिंध्यांनी झाकू पाहिलेली लाजही जेव्हा
खादी..वर्दी..च्या गर्दीकडे गहाण पडते
तेव्हाच...

तेव्हाच मनाचा पक्षी बेभान होतो

रक्तलांच्छित संहाराला सज्ज होतो
अहिंसेचे जोखड झुगारून
एक नक्षलवादी जन्म घेतो !

गमवायला काही बाकीच नसते

अब्रू... पोट... जगणे व्यर्थ
ठिणगी एकच उरात उरते
चिरंतन मुक्तीचे गीत गाते !

कवी- तुषार नातू


No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...