आक्षेपार्ह छायाचित्रे तंत्रज्ञानाचा गैरवापर करून ती बनवून खुलेआमपणे पोस्ट करणारी, त्यांचा सुरी आनंद घेणारी, ती सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून पसरवणारी माणसे विकृत आहेत !!

आक्षेपार्ह छायाचित्रे तंत्रज्ञानाचा गैरवापर करून ती बनवून खुलेआमपणे पोस्ट करणारी, त्यांचा सुरी आनंद घेणारी, ती सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून पसरवणारी माणसे विकृत आहेत !!






केंद्रात पुरोगामी आघाडीचे सरकार आहे. देशातले अनेक लहान मोठे पक्ष एकत्रित येऊन हे सरकार बनलेले आहे. कॉंग्रेस त्यातला प्रमुख राजकीय पक्ष आहे. किंबहुना ते सरकार कॉंग्रेस सरकार म्हणूनच ओळखले जात आहे. अशा वेळी सरकारच्या असमाधानकारक कामगिरीचा राग कॉंग्रेस पक्षावर प्रामुख्याने निघणे स्वाभाविक आहे. तो पंतप्रधान या नात्याने मनमोहन सिंग आणि कॉंग्रेस पक्षप्रमुख म्हणून सोनिया गांधी यांच्यावर निघणेही स्वाभाविक आहे. याबाबत कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. पण मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांची वैयक्तिक बदनामी या विरोधाआड कशी काय केली जाऊ शकते. मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांची अत्यंत आक्षेपार्ह छायाचित्रे तंत्रज्ञानाचा गैरवापर करून ती बनवून खुलेआमपणे पोस्ट करणारी, त्यांचा सुरी आनंद घेणारी, ती सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून पसरवणारी माणसे विकृत आहेत, असे माझे स्पष्ट मत आहे.



अशी छायाचित्रे बनवून पोस्ट करणे हा संबंधित स्त्री वर एक प्रकारचा लैंगिक अत्याचारच, गैरवर्तणूक आहे. स्त्रीची अप्रतिष्ठा आहे. स्त्रियांच्या असुरक्षिततेचे खापर सरकारवर जरूर फोडले जाऊ शकते, पण आपल्या देशातल्या एका राजकीय पक्षाच्या प्रमुखपदी असलेल्या एका स्त्रीची इज्जत ज्या देशात अगदी सहजपणे चव्हाट्यावर मांडली जाऊन त्यावर हास्यविनोद होत राहतात आणि तथाकथित संस्कृतीरक्षक त्यात सामील असतात आणि इतर सोयीस्कर मौन बाळगून असतात, त्या देशात सरकारने किती जरी उपाययोजना करावयाच्या ठरवल्या तरी स्त्रियांच्या असुरक्षिततेचा प्रश्न कधीच सुटणार नाही.


 

अशा घाणेरड्या मनोवृत्तीचा मी तीव्र शब्दात धिक्कार करतो व माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना आवाहन करतो कि जिथे जिथे अशी छायाचित्रे दिसतील मग ती कोणाशीही संबंधित असोत, ती facebook ला report करा. आवश्यकता वाटल्यास, जमल्यास पोलिसांत तक्रार करा.


लेखं - राज असरोन्डकर सर.

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...