आज खरंच बुद्धाने शिकवलेल्या प्रज्ञा आणि करुणेची या भारताला गरज आहे....

आज खरंच बुद्धाने शिकवलेल्या प्रज्ञा आणि करुणेची या भारताला गरज आहे....


 
उत्तराखंडात झालेल्या अतिवृष्टीमध्ये तब्बल १५ ते १७ हजार निष्पाप जीवांचा बळी गेलाय. या बळींमध्ये स्थानिकांपेक्षा अधिक संख्येने दर्शनास गेलेल्या भाविकांचा समावेश आहे. ज्या देवाच्या दर्शनाला हे भाविक गेले तोही या महाप्रलायापासून त्यांना वाचवू शकला नाही हे मोठे दुर्दैव..!!! पण हे सुद्धा काहीच नाही असे वाटावे इतका भयंकर दुर्दैवी प्रकार आज तिथे चालू आहे. त्या देवापेक्षाही कठोर अशी एक राक्षसी जमात आज तिथे अमानुषपणाचा थैमान घालत आहे..ती जमात आहे 'लोभी मनुष्याची'...!!!

 
नुकत्याच आलेल्या बातमीनुसार प्रलयाच्या ठिकाणी, अगदी मंदिरात सुद्धा प्रेतांचा खच पडलाय. ओलाखाण्यासही कष्ट पडावेत इतकी बिकट अवस्था त्या प्रेतांची सध्या आहे. बराच काळ पाण्यात राहिल्याने त्यांच्या सडण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे...हेही कमी पडावे म्हणून कि काय..?? आता त्या प्रेतांच्या अंगावरील सोने-चांदीचे दागिने पळवून नेण्यासाठी माणसांची नव्हे लोभी कुत्र्यांची तिथे चढाओढ लागलेली आहे. मानसिक दृष्ट्या पूर्णतः मोहात अडकेलेले हे विकृत लोक अक्षरशः त्या सोन्यासाठी प्रेतांचे अवयव कापून नेत आहेत. त्यामुळे आधीच ओळखण्यास कठीण झालेली प्रेते आता अधिकच विद्रूप असलेली मदतकार्यास आलेल्या टीमला पाहायला मिळत आहेत.

 
लाजेलाही लाज वाटावी असे हे कृत्य..!! घृणा तरी कितपत करावी...??? प्रेताच्याही टाळूवरील लोणी खाणारी जमात हे आजवर केवळ नेत्यांना असलेले विशेषण या घटनेने हाणून पाडले आहे. माणूस इतक्या खालच्या थराला का गेला..?? त्याच्यातलं 'माणूसपण' कुठे हरवलं..?? त्याच्या या परिस्थितीला जबाबदार कोण..??

 
स्पर्धेच्या या युगात श्रीमंत-गरीब हा भेदभाव हा शिगेला पोहोचला आहे. श्रीमंत अधिकच श्रीमंत तर गरीब हा अगदी गरीब होत चाललाय. यात आपल्या यंत्रणेचा ( system) चा मोठा हातभार आहे. त्यात आपल्या संस्कृतीत सोन्याला दिलेल्या अवाजवी महत्वामुळे, त्याच्या केल्या गेलेल्या बाऊमुळे आज ते मिळवण्याकरिता माणूस इतका खालच्या थराला गेला आहे कि, माणसाला माणसाप्रती कसलीच करुणा (Love and Care ) आणि प्रज्ञा (मानसिक व बौद्धिक प्रगल्भता) राहिलेली नाही. त्याच्या समोर उभारलेल्या एका आभासी जगात जगायला येथील system नेच त्याला आज भाग पाडलंय.

 
हे प्रकार पाहिले कि जाणवतं कि, आज खरंच बुद्धाने सांगितलेल्या अत्तिउच्च मुल्यांची 'प्रज्ञा आणि करुणेची' जगाला गरज आहे. असे करणे म्हणजे आपला धर्म त्यागणे नव्हे... तर मानवी कुटुंबात जन्माला आलेल्या आणि आधी स्वयंप्रकाशित होऊन मग जगाला ही उच्च मुल्य प्रदान केलेल्या तुमच्या आमच्या सारख्याच एका 'महामानवाची' ही तत्वे आमलात आणणे म्हणजे स्वजीवन आनंदमयी करणे होय...माणूस बनणे होय..!!!

 
माणसातलं माणूसपणच आज इतक्या खालच्या पातळीवर गेलंय कि सध्या एक सच्चा 'माणूस' भेटण आज दुर्मिळ झालंय...तिथे मंदिरात व चारधाम फिरून देव काय भेटणार...???

लेखं - गौरव गायकवाड(सोबत प्रबोधन टीम)

1 comment:

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...