संभाजी राज्यांविषयी फार कमी माहिती लोकांना असते, हे सर्वश्रुत आहे. या थोडं सत्य जाणून घेऊ या महान व्यक्तीमत्वाबद्दल…!!

@ नक्की वाचा… वाचावयास द्या… छत्रपती संभाजी राज्यांविषयी फार कमी माहिती लोकांना असते, हे सर्वश्रुत आहे. या थोडं सत्य जाणून घेऊ या महान व्यक्तीमत्वाबद्दल…!!



छत्रपती शिवाजी राजेंच्या गूढ मृत्युनंतर आता ‘स्वराज्याचा’ डोलारा सांभाळणार कोण..?? असा प्रश्न महाराष्ट्राला कधी पडलाच नाही..कारण अजूनही ६ फुट उंचीची एक अभेद्य भिंत स्वराज्याच्या रक्षणाकरिता उभी होती...’संभाजीराजे शिवाजीराजे भोसले’ नामक..!! इतिहासाच्या पुस्तकात कुठेतरी गुप्त झालेलं पण त्याकाळात धार्मिक व राजकीय दुश्मनांना कापरं भरवणार हे नाव..!! हा राजा कोण होतं..?? कसा होतं..?? काय खरेच त्याने धर्मासाठी बलिदान दिले होते..?? कि होतं पुन्हा एक कापती डाव..आणखी एका सुधारकला संपवण्याचा..?? काय झाले होते नक्की तेव्हा..?? या एक नजर मारू.


शंभूराजे खेळण्या-पळण्याच्या वयापासून जिजाऊ मांसाहेबांच्या कुशीत बसून राजकीय घडामोडींचे वास्तव चित्र पाहत होते.स्वराज्यासाठी प्राणपणाने लढणारे, शिवरायांवर प्रगाढ विश्वास असणारे मावळे, स्वराज्यावर प्राण अर्पण करणाऱ्या मावळ्यांच्या लढायांवर भेदक नजरेने बाळ राजे पाहत होते. युद्ध कुणासाठी?? कुणा विरुद्ध?? असे प्रश्न विचारून ते जिजाउंना भंडावून सोडत होते.


शिवरायांप्रमाणेच जिजाउंनी शंभूराजांना बौद्धिक शिक्षण दिले होते. त्याचबरोबर राजकीय, कला, संस्कृ, मराठा व इतर भाषांचे शिक्षण दिले. शंभूराजांचे संस्कृतवर विशेष प्रभुत्व होते. त्यांनी त्या अनुषंगाने लहान वयातच बुद्धभूषण, हिंदीमध्ये सातसतक, नायिकाभेद, नखशिख ई. ग्रंथ लिहिले होते. शम्भूराजेंच्या या बुद्धिचातुर्यामुळे आपल्यावर गदा येईल म्हणून मनुवाद्यांनी त्याकाळी त्यांना त्रास द्यावयास सुरुवात केली, कारण त्यांनी संस्कृतचा अभ्यास, वाचन आणि लेखनही केले होते, ज्याची परिणीती त्यांच्या खुनात झाली..होय खून..!! निर्दयी खूनच..!!


१ फेब्रुवारी १६८९ ला संभाजीराजांना रामदासिंच्या फितूरीपणाच्या माध्यमातून पकडण्यात आले. मुकारर्बखानाने संभाजी राजे व कवी कलशास घेऊन औरंगेजबापुढे उभे करण्यात आले तेव्हा औरंगजेबाने राजांना फक्त दोन प्रश्न विचारले-


१.तुमचे खजिने, जडजवाहीर आणि इतर संपत्ती कुठे आहे..??

२.बादशाही सरदारांपैकी तुमच्याशी कोण-कोण पत्रव्यवहार करून संबंध ठेवीत होते..??


या दोन्ही प्रश्नांची राजांनी उत्तरे दिली नाहीत. स्वतःचे प्राण धोक्यात असताना सुद्धा शत्रूला स्वराज्याचा खजिना न देणारे संभाजी राजे महान राष्ट्रपुरुष होते.

त्यानंतर १ फेब्रुवारी ते ११ मार्च पर्यंत राजांचा अमानुषपणे छळ करण्यात आला. प्रथम त्यांची जीभ, नंतर अनुक्रमे डोळे, कान व त्वचा सोलून काढणात आली आणि त्यातच या वीर पुरुषाचा ११ मार्च १६८९ रोजी अंत झाला. त्यांची हत्या व छळवणूक कोरेगाव, तुळापुर आणि वढू बुदृक याठिकाणी करण्यात आली. पण वरील जे प्रकार संभाजी राजेंना छळण्यासाठी केले गेले त्यात केवळ औरंग्जेबाचाच हात होता काय..?? चला याचे उत्तर शोधूयात.


कलियुगात केवळ ब्राह्मण आणि शुद्र हे दोनच वर्ण आहेत असे मनुवादी धर्मग्रंथ सांगतात, ज्यानुसार शिवरायांना भरदरबारात आणि अलीकडे राजर्षी शाहू महाराजांना शुद्र म्हणून हिणवले गेले, व त्यांच्या क्षत्रीयात्वावर सवाल उठवले गेले होते. तोच प्रकार संभाजी राजेंच्या खुनाच्या बाबतीत दिसून येतो.


ब्रह्मसुत्रावरील आपल्या भाष्यात शंकराचार्य म्हणतात-


“वेदांचा उच्चार केला असता शुद्राच्या जिभेचा छेद करावा आणि वेदाचे धारण केल्यास शरीर भग्न करावे.,”


संभाजी राजांचे संस्कृतवर जबरदस्त प्रभुत्व होते, त्यांनी सर्व संस्कृत ग्रंथ वाचले होते, एवढेच नव्हे तर त्यांनी ‘बुद्धभूषण’ हा संस्कृत ग्रंथही लिहिला होता, त्यामुळे त्यांना जीवे मारण्याचे अनेक वेळा प्रयत्न झाले होते. त्यांनी संस्कृत व पर्यायाने वेदांचे वाचन केले म्हणून त्यांची जीभ कापण्यात आली. संस्कृत श्रावण केले म्हणून त्यांच्या कानात गरम शिश्याचा रस ओतण्यात आला. संस्कृतचे लेखन केले म्हणून त्यांचे शरीर छिन्न-विछिन्न (भग्न) करण्यात आले, व हे सर्व प्रकार औरंगजेबाच्या हाताखाली असणार्या मनुवादी ब्राह्मणांनी घडवून आणले होते, ज्याचा संदर्भ सुचिता भार्गव नावाच्या भृगु वैदिकाने लिहिलेल्या मनुस्मृती मध्ये आढळतो.


संभाजीराजांच्या स्वराज्य निष्ठतेपुढे औरंगजेब हतबल झाला होता, पण ब्राह्मण इतिहासकारांनी धर्मासाठी संभाजीराजांनी बलिदान दिले म्हणून खोटेच लिहिले आहे. त्यांनी बलिदान दिले जे येथील भूमिपुत्रांच्या स्वराज्यासाठी, स्वराज्याला मदत करणाऱ्या शत्रुपक्षातील सरदारांची नावे स्वतःचा प्राण धोक्यात असूनही न सांगणारे माझे संभाजी राजे तत्वनिष्ठ आणि प्रेमळ अंत:करणाचे होते यात शंका नाही.


तेव्हा मित्रानो खरा इतिहास जाणून घ्या...लोकं काय म्हणतील याचा विचार करत बसने म्हणजे लांडग्याच्या पोटाची बकरीने काळजी घेण्यासारखे आहे..जागे व्हा..सत्यवादी बना..!!


जय जिजाऊ ! जय शिवराय !! जय संभाजीराजे !!!

संदर्भ पुस्तकं-  प्रतीइतिहास - चंद्रशेखर शिखरे सर.



लेखं-गौरव गायकवाड(सोबत प्रबोधन टीम)

4 comments:

  1. सर, तुम्ही म्हटलंय कि औरंगजेबच्या सांगण्यावरून संभाजी राजांचा छळ करण्यात आला......this is not true... कारण औरंगजेब ने म्हटल होत कि 'इसे (संभाजी राजांना) यहा से ले जो और खात्म कर दो'. पण तिथल्या ब्राम्ह्णांनी तसे करू दिले नव्हते. संभाजी महाराजांचा छळ केला तो फक्त ब्राम्हणांनी...

    ReplyDelete
    Replies
    1. बरोबर आहे यशवंत भाऊ

      Delete
  2. सत्य इतिहासाचा प्रसार झाला पाहिजे.

    ReplyDelete

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...