तयास मानव का म्हणावे??- सवित्रीआई ज्योतिबा फुले.

तयास मानव का म्हणावे ??- सवित्रीआई ज्योतिबा फुले.



ज्ञान नाही विद्या नाही
ते घेणेची गोडी नाही
बुध्दी असुनि चालत नाही
तयास मानव का म्हणावे ?||१||

दे हरी पलंगी काही
पशुही ऐसे बोलत नाही
विचार ना आचार नाही
तयास मानव का म्हणावे ? ||२||

बाईल काम करीत राही
ऐतोबा हा खात राही
पशू पक्षात ऐसे नाही
तयास मानव का म्हणावे ? ||३||

दुसर्‍यास मदत नाही
सेवा त्याग दया माया ही
जयापाशी सदगुण नाही
तयास मानव का म्हणावे ? ||४||

 पशुपक्षी माकड माणुसही
जन्ममृत्यु सर्वानाही
याचे ज्ञान जराही नाही
तयास मानव का म्हणावे ?||५ ||


कवियत्री- सवित्रीआई ज्योतिबा फुले.

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...