मराठ्यांचीया तो इज्जत वाचणार नाही -छत्रपती शिवराय !!

मराठ्यांचीया तो इज्जत वाचणार नाही -छत्रपती शिवराय !!




"मराठा समाजाने स्वताच्या रक्तातील सरंजामीपणा अगोदर संपवावा, ब्राह्मणशाही तर चुटकी सरशी उडून जाईल- प्रसिद्ध विचारवंत बा.ह.कल्याणकर "


प्रबोधनाची खरी गरज कुठे आहे हे ओळखून आम्ही आमची वाटचाल केली पाहिजे. जग हे खेडे बनलेले असताना आपण ग्लोबल होत आहोत की अजूनही बुरसटलेली मानसिकता जपत आहोत याचा विचार करावा. अन्यथा झपाट्याने बदलणाऱ्या या जगात मराठा कुठेही नसेल. दुसर्यांवर अन्याय अत्याचार करणाऱ्या मराठ्यांना खडसावताना छ.शिवराय म्हणाले होते "अशाने मराठ्यांचीया तो इज्जत वाचणार नाही." पण उठसुठ शिवाजी महाराजांशी थेट संबंध दाखवत इतर जातींवर हल्ले करायचे हा कोणता शिव विचार आहे? शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी ज्या ज्या जाती लढल्या त्या त्या मराठा ही व्याख्या जर आपण मानत असू तर मग आपल्याच गाव वस्तीत राहणारे इतर जातींचे लोक मराठा नव्हेत काय? प्रत्येकाला वाटते परिवर्तन झाले पाहिजे, समाज बदलला पाहिजे परंतु हा बदल स्वताला वगळून कसा काय होईल याचाही विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. चला आपण आपल्या अंगातील सरंजामशाही अगोदर संपवूया मग पहा या देशातील ब्राह्मणवाद कसा चुटकी सरशी संपतो ते.



विचार- डॉ.बालाजी जाधव, औरंगाबाद.

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...