फटाके फोडू नका... पर्यावरण वाचवा !!

फटाके फोडू नका... पर्यावरण वाचवा  !!




फटाक्यांचा शोध चीनमध्ये इसवी सनापूवीर् लागला होता व त्याचा प्रसार आणि लोकप्रियता झपाट्याने जगभर पसरली. आज जगात सर्वच देशांत प्रमुख दिवशी अथवा राष्ट्रीय सण-समारंभांत फटाक्यांचा वापर केला जातो. कालांतराने या फटाक्यांत नावीन्य आले. कुठल्याही जागतिक स्पधेर्च्या उद्घाटन अथवा समारोपाच्या प्रसंगी नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी बघावी लागतेच. अशा या बहुढंगी आणि बहुरंगी फटाक्यांमुळे दिवाळीची रंगत वाढते, असा एकेकाळी सर्वांचाच समज होता. परंतु पर्यावरण संदर्भातली जागृती वाढत गेली, तसा फटाक्यांपासून होणाऱ्या ध्वनी आणि वायुप्रदूषणाचा त्रास आणि धोका जाणवू लागला. गेल्या काही वर्षांत दिवाळी तसेच अन्य सणांच्या निमित्ताने होणाऱ्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दिवाळीत फटाक्यांमुळे ध्वनिप्रदूषण तर होतेच; शिवाय वातावरणही दूषित होते.

 



ध्वनिप्रदूषणाच्या संदर्भात केंद्रीय पर्यावरण आणि वन विभागाने १९८६ सालच्या पर्यावरण रक्षण कायदा ऑक्टोबर १९९९मध्ये दुरुस्ती केली. नवीन कायद्यांतर्गत १२५ डेसिबल (ए. एल) अथवा १४५ डेसिबलच्या (सी) पेक्षा जास्त आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांस बंदी घातली आहे. अर्थात हा नियम केवळ कागदावरच राहतो, हे उघड आहे. महाराष्ट्र सरकारने मात्र या कायद्याच्या अंतर्गत ध्वनिप्रदूषण कमी करण्याबाबत कडक नियम आखले आहेत. हे नियम सवोर्च्च न्यायालयाच्या २००० सालच्या आदेशाप्रमाणे बनविलेले आहेत. या आदेशांतर्गत शहरातील व्यापारी विभागात ५५ डेसिबल , निवास भागात ४५ डेसिबल आणि शांतता भागात ४० डेसिबल पर्यंत आवाजावर बंधने आहेत. याबरोबरच महाराष्ट्र पोलिसांनी रात्री १०.०० नंतर सार्वजनिक ठिकाणी फटाके लावण्यास बंदी केली आहे.

 



हे सर्व नियम शासनाने केलेले आहेतच, परंतु नागरिकांनी- विशेषत: मुलांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहिले नाही, तर ते अमलात आणणे पोलिसांना अथवा शासनाला कठीण जाते. वेगवेगळ्या फटाक्यांतून निघणाऱ्या आवाजाची पातळी चार फूट दूर अंतरावरून खालीलप्रमाणे होती: लंवगीमाळा ८५ डेसिबल , आपटीबार ९२, लक्ष्मीबार / कृष्णबार ९८, अॅटम बॉम्ब ११८. या कोष्टकावरून फटाक्यांपासून निर्माण होणाऱ्या प्रचंड ध्वनिप्रदूषणाची कल्पना येते. या प्रचंड आवाजामुळे डोकेदुखी, बहिरेपणा आणि मानसिक अशांतता या व्याधी उद्भवतात. ध्वनिप्रदूषणाबरोबर फटाक्यातील धातू आणि रासायनिक संयोगापासून निर्माण होणाऱ्या वायूचे प्रदूषणही मानवी आरोग्याला घातक असते. १०० ग्रॅम फटाक्यात अथवा शोभेच्या दारूत (म्हणजेच अनार, फुलबाजी, वायर) खालील घटक मिली ग्रॅममध्ये आढळतात.

 



धातू : कॅडमियम ५.२ ते ८.०, जस्त ४६२ ते ८५०, झिंक ३२४, मॅग्नेशियम २६२२, तांबे ७४४ मँगनीज+लोखंडाचे कण+अल्युमिनियमचे कण.

 



आम्लधमीर्य मूलक: नायट्रेट + सल्फेट + फॉस्फेट ११६० ते १४२०, नायट्राइट १६२४.

 



नायट्रेट, नायट्राइट्स, फॉस्फेट आणि सल्फेट या आम्लधमीर्य मूलकांचा ऑक्सीडायझिंग एजन्ट म्हणून उपयोग केला जातो. त्याच्या संयोगातून कार्बन मोनॉक्साइड आणि नायट्रोजन डायॉक्साइड यासारखे विषारी वायू शोभेच्या दारूतून निर्माण होतात. हे वायू मानवी जीवनाला अतिशय घातक असतात. हदयरोग रक्तदाब, अस्थमा, क्रॉनिक ब्राँकायटिस असणाऱ्यांना हे तर जास्त घातक आहेतच, परंतु याबरोबरच गर्भवती स्त्रिया, वृद्ध माणसे, लहान बालके यांनासुद्धा फटाक्यापासून निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचा जास्त धोका आहे. फटाके वाजवताना सर्वसाधारण निरोगी व्यक्तींनाही अपचन, सदीर्-खोकला, मानसिक अशांती, डोके दुखणे या व्याधी होतात. फटाके लावताना होणारी इजा वा अपघात हा चिंतेचा विषय आहेच.

 




मानवाला प्रदूषणाचा त्रास होतो, त्याच्या शेकडो पटीने हा त्रास मुक्या जनावरांना आणि पक्ष्यांना होतो. कुत्रा, मांजर या पाळीव प्राण्यांची श्रवणक्षमता आपल्यापेक्षा ४०० पटीने जास्त असते. हे लक्षात आल्यावर फटाक्यांची माळ अथवा अॅटमबॉम्बच्या आवाजाचा त्यांना किती त्रास होत असेल याची कल्पना येते. ज्यांच्या घरी हे पाळीव प्राणी आहेत, त्यांना या प्राण्यांचे होणारे दिवाळीतील हाल बघवत नाहीत. दोन वर्षांपूवीर् आमच्या घरासमोरील आंब्याच्या झाडावरून खारीचे पिल्लू फटाक्यांच्या आवाजाने खाली पडले होते. त्याचा पाठीचा मणका मोडला होता. त्याच्यावर औषध उपचार करूनही ते वाचू शकले नाही. झाडावर बसलेले पक्षी उडणाऱ्या फटाक्यांमुळे जखमी होतात. अशा अनेक घटना दिवाळीच्या दिवसात पक्षीमित्रांना आढळतात.

 




दिवाळीच्या या ध्वनी आणि वायू प्रदूषणाबरोबर सामाजिक प्रदूषणाचे वेधही आपल्या संवेदनशील मनाने घेतला पाहिजे. आपल्याकडे बाजारात मिळणारे ८५ टक्के फटाके हे शिवकाशी, तामिळनाडू येथून येतात. ही गावे बालकामगारांना देण्यात येणाऱ्या अमानुष वागणुकीसाठी कुप्रसिद्ध आहे. १६ वर्षांखालील बालकामगार ठेवणे हा कायद्याने गुन्हा असूनही शिवकाशीमध्ये अजूनही धोकादायक वातावरणात बालकामगार अठरा-अठरा तास काम करत असतात. फटाके कमी प्रमाणात विकत घेऊन आपण एक प्रकारे या बाल कामगारांवरील अन्याय कमी करू शकतो. याचप्रमाणे दिवाळीच्या दिवसात वंचित व परिस्थितीशी झगडत जीवन जगणाऱ्या असंख्य लहान मोठ्यांना अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारे दिवाळीच्या निमित्ताने मदत करत असतात. जास्तीतजास्त लोकांनी, विशेषत: मुलांनी त्याचा कित्ता गिरविला पाहिजे. फटाक्यांवरील खर्च कमी करून त्यातील काही रक्कम आपण सामाजिक संस्था व शाळांना निश्चितच देऊ शकतो. 





संदर्भ -जिज्ञासा ट्रस्ट.



लेखं- विवेक साम.



No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...