आज खरा जातीयवादी कोण आहे ??

आज खरा जातीयवादी कोण आहे ?? 

 



आज खरा जातीयवादी कोण आहे..? ब्राम्हण आहे की ओबीसी आहे याला महत्व नाही. जो जातीयवादी आहे तो आपला शत्रूच आहे. मग तो कुणीही असेना. आता नव्याने शत्रूत्वाची व शत्रूची व्याख्या करावी लागेल. त्याप्रमाणे सामाजिक/राजकिय भूमिका घ्याव्या लागतील. स्वातंत्र्यानंतरची चवथी पिढी शिकली आहे. तरीही ही पिढी आजही दलीतांबद्द्ल जातीयभावना जोपासत असेल तर तो अडाणीपणा नसून जातीय उच्चतेचा उर्मट अंहकारच समजून त्याला धडा शिकविला पाहीजे.


 

बहूजन/मूलनिवासीच्या नावाखाली दलितांवर अत्याचार करणाऱ्या ब्राह्मणेत्तरांना कदापीही माफ करू नये. तो शत्रूच समजावा. खैरलांजीतील आरोपी/रमाबाईनगर गोऴीबार प्रकरणातील आरोपी/आनंद गायकवाड (उस्मानाबाद) हत्याकांडातील आरोपी हे दलीतांचे शत्रूच आहे. ते कोणत्याही जातीचे असोत. आता दलीतांनी धर्मनिरपेक्ष भूमिकेऐवजी जातनिरपेक्ष भूमिका घेणाऱ्यांना मित्र मानले पाहीजे.

 

धर्मनिरपेक्षतेची भूमिकेचा बाता करून निवडणूका जिंकणारे महाराष्ट्रातील पक्ष/नेते मुख्यमंत्रीपद/इतर महत्वाची मंत्रीपदावर दावा सांगताना "जात" हीच पात्रता लावतात तेव्हा यांचा धर्मनिरपेक्षतेचे सोंग उघडे पडते. दलीतांना खूप ब्लँकमेल केल्या गेले आहे. सारेच पक्ष दलीत विरोधी आहे. तसे नसते तर कसाब/अफजलला फासावर लटकविणारे खैरलांजी/रमाबाईनगर हत्याकांडातील आरोपी आजही दलितांना वाकूल्या का दाखवित आहे याचे उत्तर द्यावे ??


विचार- भारत लढे सर.

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...