जंगली पशु आणि आपल्यात काहीतरी फरक आहे हे ज्याला उमगले तो खरा माणूस !!



जंगली पशु आणि आपल्यात काहीतरी फरक आहे हे ज्याला उमगले तो खरा माणूस !!

'एखाद्या मुलीने आपल्याला धोका दिलाय म्हणून तो आकस मनात दाबून धरत त्याचा बदला म्हणून त्यानंतर अनेक मुलींची आयुष्य बरबाद करणे' हि आजकाल सर्रास दिसणारी आणि बळावणारी मानसिकता माझ्या आकलन शक्तीच्या पलीकडली आहे.




'बरबाद' या शब्दाचा स्पष्टच अर्थ सांगायचा झाल्यास बदल्याच्या 'त्या' आगीत एकाच वेळी अनेक मुलींशी रिलेशन ठेऊन त्याअंतर्गत "साल्ला..यांची हीच लायकी आहे.." असं कुठल्यातरी अपोक्त मित्राने सांगितलेलं वाक्य डोक्यात ठेऊन त्यांच्या शरीराचा येथेच्छ भोग घेणे आणि मन भरल्यावर त्यांना सोडून दुसऱ्या 'शिकारी'कडे वळणे याला माणूसपण म्हणता येईल काय..?? केवळ प्रणयकाळात मादीशी संभोग करून झालेल्या व त्यानंतर तिला तसेच सोडून इतर मादिंशी प्रणयाराधन करण्यास जंगल भटकणाऱ्या एखाद्या नर (male) पशुत आणि या असल्या विचारांच्या मानवात फरक तो काय राहिला..??? पशुंत भावना नसतात ते केवळ 'निसर्गचक्र' पाळत असतात..पण माणसात भावना असतात..आणि त्यामुळे असंख्य निष्पाप मुलींची आयुष्य कलाटणी घेऊ शकतात..कधी कधी कायमची ..!!




वाचताना बोचरं वाटत असलं तरी असा एखादा मित्र व माणूस न भेटलेला कोणी सापडणं विरळाच..!!! वैयक्तिक सांगायचे झाल्यास माझ्या आयुष्यात सुद्धा असा प्रसंग घडलेला आहे. अतिशय 'सिरियस' (हा एक परवलीचा शब्द आज-कालचा) असलेल्या रिलेशन मध्ये जेव्हा 'जोडीदार' अचानक सोडून जातो तेव्हा वाटणारं 'ते' सगळं सगळं मी सुद्धा अनुभवलंय, त्यातून सावरता सावरता धडपडलोही कित्येकदा मी... पण माझ्या मनात आजवर बदला घेण्याची भावना आलेली मला आजही आठवत नाही..त्रास झाला खूप..वर उल्लेखल्या प्रमाणे भयंकर सल्ला देणारे अनेक मित्र सुद्धा भेटले पण न जाणे का मी निश्चल राहिलो. कुणी एकीने असं केलं म्हणून बाकीच्या मुलींशी असं वागणं मनाला पटत नव्हतं.आमच्या दोघांत झालेल्या या घटनेत इतर मुलींची काय चूक..?? किंवा त्याची शिक्षा वा बदला इतरांवर काढण्याचा आपल्याला अधिकार तो काय..?? असं वाटायचं आतून..माझी हि मतं जेव्हा मी मित्रांना सांगितली तेव्हा वेड्यात काढलं बऱ्याच जणांनी मला.!! मी ते 'वेडेपण' सुद्धा स्वीकारलं.




या सगळ्यात एक गोष्ट झाली. मी विचार करू लागलो..फक्त माझाच नाही तर अर्ध्यावर सोडून गेलेल्या 'तिचाही'. मी तिच्या मताचा आदर करू लागलो. प्रत्येकाला आपल्या आयुष्याचे निर्णय घेण्याचे अधिकार असतात. जसे आपण तसा समोरचाही स्वतंत्र आहे हे समजू लागलो आणि पुढे जात राहिलो..थांबलो नाही..किंवा साचलोही नाही. पण जेव्हा केव्हा असे लोक भेटतात तेव्हा मला त्यांच्या मानसिकतेची कीव येते.




हे केवळ मुलांनाच नाही तर मुलींनाही लागू होतं. 'कुणी एक' चुकीचा निघाला किंवा निघाली म्हणून सगळ्यांना त्याच माळेत मोजू नका. कारण दगडांनी भरलेल्या खाणीतच कुठेतरी हिरा सापडतो. एखाद्या सोबत वाईट व्यवहार करताना आपली बहिण वा भावासोबत असे कुणी केले तर कसे वाटेल..?? याचा विचार करून बघावा.




"शेवटी जंगली पशु आणि आपल्यात काहीतरी फरक आहे हे ज्याला उमगले तो खरा माणूस" भगवान बुद्धानेही हेच सांगितले होते.

 


लेखं-गौरव गायकवाड.

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...