आजची स्त्री खरंच स्वतंत्र आहे का??

आजची स्त्री खरंच स्वतंत्र आहे का??


 
आजच्या युगामध्ये स्त्री हि पुरुषाएवढीच आघाडीवर असलेली आपल्याला पहावयास मिळते. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात ती पुरुषांच्या बरोबरीने काम करताना प्रगती पथावर आहे. अर्थाजानामध्येही ती पुरुषाएवढीच काही ठिकाणी त्यापेक्षाही जास्त करताना दिसते. साहजिकच पूर्वीपेक्षा आताच्या युगात स्त्रीला समाजात मोठे स्थान प्राप्त झाले आहे. ते तिने स्वत:च्या कर्तृत्वाने, कष्टाने, बुद्धीमतेने मिळविलेले आहे. यात शंकाच नाही. एकूण सर्वच बाबतीत स्त्रिया ह्या पुरुषांच्या बरोबरीने आघाडीवर आहेत. हे जरी खरे असले तरी या सर्व गोष्टी काही ठराविक वर्गापुरत्या मर्यादित आहेत. काही ठराविक स्त्रियांच्या बाबतीत खऱ्या आहेत. स्त्री सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे असे म्हटले तरीही तिच्यावर अन्याय होताना आजही दिसून येतोच आहे. आजही वर्तमानपत्र उघडले कि जास्तीत जास्त स्त्रीयांबाबाताच्याच अन्यायाच्या बातम्या जास्त असतात. नवविवाहितेच्या आत्महत्या, सुनेचा छळ करून मारले, अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घुण हत्या अश्या बातम्याच जास्त असतात.

 



सुशिक्षित वर्गातही पहिली पत्नी सुगरण, सुस्वभावी, समजूतदार असली तरीही तिला मुलीचं झाल्या तर तो दोष तिचाच समजून पतीचा दुसरा विवाह लावला जातो. मुलगा व मुलगी होणे हे स्त्रीच्या हातात नसते हे न कळण्या इतपत समाज मागासलेला तर आता नाही ना? तरी पण या ठिकाणी काही गुन्हा नसताना स्त्रीला अन्याय सहन करावा लागतो. साधारणपणे लग्नाला ५-६ वर्षे झाली न घरात पाळणा हलण्याची चिन्हे दिसली नाहीत कि योगीबाबा, डॉक्टर तपासण्या चालू होतात. त्यात प्रथम स्त्रीच्याच केल्या जातात. मुल जन्माला येण्यासाठी दोघेही तेवढेच जबाबदार असतात. पण स्त्रीला प्रथम दोष लावण्यात येतो. का? तिच्यात काही दोष नाही असे समजल्यास कसातरी तयार होऊन पुरुष डॉक्टरकडे जायला तयार होतो. या चाचण्यात स्त्रीच्यात दोष निघाला तर पुरुष या कारणावरून तिच्या संमतीने अथवा तिच्याशी घटस्फोट घेऊन दुसरे लग्न करण्यास सिध्द होतो. पण पुरुषांमध्ये दोष आढळला तर एक तरी स्त्री त्याच्यापासून घटस्फोट घेऊन दुसरे लग्न केल्याचे आपल्याला आढळते का ??

 



ऐन तारुण्यात पतीच्या अपघाती निधनाने विधवा झालेल्या मुली आपण पाहतो. मुला बाळ नसेल तर ठीक किमान दुसर्या विवाहाचा विचार तरी केला जातो पण जर पदरी लहान एक दोन मुले असतील तर तिला आपले उभे आयुष्य एकटीने काढावे लागते. तरी ती त्या कच्च्या बछ्याना सांभाळत त्यांचे सगळे करते. मुलांना व्यवस्थित वाढवून त्यांचे शिक्षण वैगरे करून त्यांना मोठ्या हुद्द्यावर बसविलेल्या मतांची अनेक उदाहरणे आपण पाहतो. पण हेच जर एखाद्या पुरुष्याबाबातीत त्याची पत्नी अचानक सोडून गेली तर एका वर्षाच्या आतच त्याच्या दुसर्या लग्नाची बोलणी सुरु केली जाते मुलांना कोण सांभाळणार, घरातले कोण करणार, स्वत:ची सर्वच गरज भागवण्यासाठी दुसरे लग्न करतो. त्यामध्ये त्याचा स्वार्थच असतो सगळा खरे तर! स्त्री आपल्या पतीच्या प्रेमाखातर त्याच्या आठवणीवर सगळे आयुष्य काढण्यास तयार होते. त्याच्या मुलांना मोठे करते. स्वताचा विचारही ती कधी करत नाही पण पुरुषांचे तसे नसते.


 



आपला समाजही त्यास तेवढाच जबाबदार आहे. एखाद्याची पहिली पत्नी तरून वयात गेली कि लगेच त्याला वर्षाच्या आत लग्नासाठी प्रस्ताव येतात. मुलांना सांभाळायला, घरात लक्ष्मी हवी, एकटा किती दिवस राहणार, पण असा प्रस्ताव तरून विधावेकडे क्वचितच अपवादाने पाहायला मिळतो. नाही तर तिलाच तूच पांढऱ्या पायाची म्हणून नवऱ्याला घालवून बसली असा आरोप तिच्यावरच करण्यात येतो. स्त्री हि लग्न करून तुमच्या घरी आपले माहेर, बहिण-भाऊ, आई-वडील यांना सोडून येते. तुमच्या घरची जबाबदारी उचलते. तुमच्या मुलांना जन्म देते. त्यांना मोठे करते. वेळ प्रसंगी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. एकटा पुरुष किंवा स्त्री हि फारसा पराक्रम नाही गाजवू शकत दोघांनाही एकमेकांची साथ सारखीच हवी असते. हा संसाररूपी रथ एका चाकाच्या सहाय्याने चालवता येत नाही तरी सुद्धा कायम स्त्रीवरच अन्याय का?? आपला समाज कितीही बदलला तरी स्त्रीवर होणारे अन्याय कधी संपणारच नाहीत का? पेपरमध्ये रोज नवविवाहितेच्या आत्महत्या , सुनेचा छळ करून मारले, अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घुण हत्या अश्या बातम्या येणे कधी थांबेल का??

 



ह्या स्त्रीवरील अन्यायला जबाबदार कोण?? तिला कधी न्याय मिळेल कि नाही?? याला उत्तर सापडेल कि नाही?? असे अनेक प्रश्न आपल्या आधुनिक समाजातही अनुत्तरीतच राहत आहेत. सर्व क्षेत्रात सतत पुढे जाण्यासाठी धावणारा आपला समाज स्त्रियांच्या बाबतीत मागे का जातो?? हीच आज आपल्या समाजाची मोठी खंत आहे. कोणीतरी येईल हि परिस्थिती बदलेले या आशेवर कधीपर्यंत राहणार आपण?? या साठी जास्त काही करण्याची पण गरज नाही आपण प्रत्येकाने आपल्या आजूबाजूला असणाऱ्या स्त्रियांबद्दल मनात आदर ठेवून त्यांना मानपानाची वागणूक दिली तरी खूप फरक पडू शकेल. आपली आई, बहिण, बायको, मुलगी यांना माणूस मानून त्यांच्यात भेदभाव न करता वागले तरी खूप काही घडेल. कारण परिवर्तन नेहमी आपल्यापासून सुरु केले तर त्याचा फायदा जास्त होतो.





 


लेखं- राधिका घोडके.

5 comments:

  1. नमस्कार राधिका मॅडम,
    हा लेख अप्रतिम आहे. मला खूप आवडला.
    माझ्या मते स्त्री च्या अन्यायाला पाहिलं जबाबदार व्यक्ती हि एक स्त्रीच आहे. आई आणि होणारी सासू ह्याच आपल्या मुलाला स्त्री पुरुष समानता शिकवू शकतात. जर मुलांना लहानपणा पासून स्त्री पुरुष समानता शिकवली, तर स्त्री वर होणारे अन्याय कमी होतील. स्त्री हि एक माणूस आहे आणि तिला हि भावना आहेत ह्याची जाणीव प्रत्येक व्यक्ती ला होणे गरजेचे आहे.

    ReplyDelete
  2. Mam pardon...but mla Ase vatte ki lekhache shirshak lekhatil bhavnana nyay devu shakle nhi....Karan swatantrya aahe Ka hya vishayatun aapn dusrikade odhle gelo aani vishay nit mandata aala nhi...

    ReplyDelete
  3. अप्रतिम राधिका mam 🙏🙏🙏

    ReplyDelete

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...