भिडेवाड्याच्या शोधात !!

भिडेवाड्याच्या शोधात !!
 


थोर महापुरुष महात्मा फुले विषयी त्यांच्या साहित्यातून बराच काही वाचाल होत पण त्यांनी १५ मे १८४८ ला भिडेवाडा येथे सुरु केलेली देशातील पहिली शाळा विषयी बरच कुतूहल होत . तो भिडेवाडा किती महान असेल या महापुरुषाचा सहवास लाभलेला म्हणून काही वर्षापूर्वी मी आणि माझा अभियंता मित्र राहुल जाधव भिडेवाडा शोधण्यासाठी निघालो . राहुल ला फक्त एव्हढंच माहित होत कि बुधवारपेठे मध्ये कुठेतरी आहे म्हणून ! बुधवारपेठेतून आम्ही पायी चालू लागलो . चालताना जणू तो काळच त्या रस्त्यामधून flashback झाल्यासारखे झाले . शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा नायनाट पेशव्यांनी करून नुसता माज पेशव्यांनी वाढवला असेल , जातीयतेचा उत निर्माण करून इथल्या शुद्र समाजावर अन्याय अत्याचार याच रस्त्यावर हे पेशवे करीत असतील , इतक्या भयंकर परिस्थिती मध्ये महात्मा फुले , सावित्रीबाई फुलेंनी बहुजन समाजाच्या उद्धाराचा जो वसा घेतला असेल तो किती किती महान आहे . ब्राह्मणी कामांध चेहरे , शेण गोटे खाऊन सगळ्या अडचणींना तोंड देऊन सावित्रीमाई ने जो स्त्री जातीचा उद्धार केला त्याची सर बदकावर बसून बदकाला त्रास देणाऱ्या काल्पनिक सरस्वतीला कुठून येणार असे अनेक विचार मनात येउन चालत होतो भिडेवाड्याच्या शोधात ! रस्त्याने चालताना अचानक देहविक्री करणाऱ्या स्त्रिया नजरेस पडल्या . मनात वाटल , पेशव्यांनी अनैतिकपणाचा किती अंत केला असेल . परराज्यातून स्त्रिया लुटून आणून त्यांना उपभोगुन त्यांना या गलिच्छ व्यवसायात ढकलुन अत्याचाराचा हा हा कार माजविला असेल . ज्या ब्राह्मण पेशव्यांनी असले घाणेरडे कृत्ये केले तिथे माझा महात्मा या स्त्रियांच्या उद्धारासाठी त्यांच्या अनौरस मुलांसाठी शिक्षणाचे दार उघडे करून त्यांना सन्मार्गाला लावण्याचे महान कार्य आमच्या महात्मा फुले आणि सावित्रीमाई ने केले खरच त्याला तोड नाही . जेव्हढा आदर आई वडिलांसाठी असेल त्याहुनी अधिक आदर फुले दांपत्याविषयी अधिकाधिक वाढत होता , प्रत्यक्ष तो काळ अनुभवतोय कि काय हे पाहून मन भरून आले.


 



चालताना अनेकांना हा प्रश्न होता कि भिडेवाडा कुठे आहे ,पण तिकडून उत्तर यायचं कि भिडेवाडा काय आहे ? आमच हेच उत्तर ठरलेल असायचं कि मुलींची पहिली शाळा महात्मा फुलेनी भिडेवाड्यामध्ये सुरु केली होती . अनेकांची महात्मा फुले बद्दलची अनास्था पाहून मन नाराज होत होत, दुपारची वेळ झाली होती . समोरच एक हॉटेल दिसलं वाटल अगोदर आता काहीतरी खाऊन घ्याव . बिलाचे पैसे द्यावे आणि हॉटेल मालकाला विचारावं कारण याला कदाचित माहित असेल पण कसलं काय त्यालाही काही माहित नव्हत . समोर असलेल्या पोलिस चौकीमध्ये बसलेल्या पोलिसालाही आम्हाला हेच विश्लेषण द्यावे लागले मग त्याने आम्हाला योग्य पत्ता दिला . येउन भिडेवाड्याजवळ आलो तर त्याची स्थिती पाहून मन हेलावून गेल कारण जीर्ण झालेला हा भिडेवाडा खूप मोडकळीस आलेला होता , त्यामध्ये अतिक्रमण करण्यात आलेले दुकाने पाहून तर मनात अधिक राग निर्माण झाला.


 


फुले ,शाहू , आंबेडकर याचं नाव घेऊन येणार सरकारसहित महात्मा फुले , सावित्रीमाई फुले मुळे शिकलेले पण स्वतःची ओळख नसलेले आणि तेव्हढेच हुकलेले लोक पाहून या महात्म्याची होणारी हेळसांड खूप वेदानादाई होती .दुसर एक आश्चर्य म्हणजे भिडेवाड्याच्या विरुद्ध दिशेला पाहल तर "श्रीमंत दगडूशेठ हलवाई चा गणपती " नटून थटून आलेल्या स्त्रियांनी आणि मुलीनी घेरलेला दिसला . ज्या महापुरुषाने ,सावित्रीमाईने अतोनात हाल सोसून या समाजासाठी झिजले खासकरून सावित्रीमाई ! मुली शिकल्या पाहिजे पुढे गेल्या पाहिजे म्हणून आयुष्य वेचले. मुली शिकल्या प्रत्येक क्षेत्रात पुढे गेल्या . दगडू गणपतीच्या दर्शनासाठी मरत असलेल्या नटलेल्या मुलींची सावित्रीबाई विषयी असलेली अनास्था बघून मनात आक्रोश निर्माण होत होता पण आजही दगडू चा गणपती अधिकाधिक श्रीमंत होत आहे आणि अडगळीत पडलेला भिडेवाडा शेवटची घटका मोजीत आहे . दगडू गणपती ला मिळणाऱ्या देणग्या पाहल्या असता दिवस अपुरा पडतो , त्या देणगी देणारामध्ये रामदास आठवले चे नाव वाचून तर पारा अधिक चढतो पण अशा लोकांकडे दुर्लक्ष करून फुले शाहू आंबेडकरांचे विचार प्रसार करू हे ध्येय केंव्हाचेच उरी बांधले होते.

 



भिडेवाड्याचे फोटो काढत असताना दगडूगणपतीच्या रांगेतले आमच्याकडे येउन हे का गणपतीचे फोटो न काढता या पडक्या वाड्याचे फोटो काढत आहेत म्हणून विचारात होते त्यावर त्यांना या वाड्याचे काय महत्व आहे हे सांगितल्यावर तेच महानग महानगी भिडेवाड्याचेही फोटो काढू लागली … हा खूप मोठा विरोधाभास होता .




आज भिडेवाडा अत्यंत जीर्ण अवस्थेत असून त्यावर अतिक्रमण झालेले आहे ,शासनासह सर्वांनी या कडे दुर्लक्ष केल्यामुळे तो उपेक्षेचे केंद्र झालेला आहे एव्हढंच काय तर भिडेवाडा हा आज दारूचा अड्डा झालेला आहे , सर्वांच्या दुर्लक्ष्यामुळे ऐतिहासिक भिडेवाड्याची हि दुरवस्था झालेली आहे. भिडेवाडा बचाव समिती यासाठी कित्येक वर्षापासून लढा देत आहे पण आता महात्मा फुलेंच्या वंशजांनी हा वाडा सर्व जनतेमिळून ताब्यात घेण्याचे ठरविले आहे त्याची उपेक्षा थांबविण्यासाठी हेच आंदोलन आता हाच मार्ग बाकी आहे .



२८ नोव्हेंबर महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतीदिन खरच शिक्षक दिन म्हणून निदान महाराष्ट्र शासनाने तरी पाळावयास हवा. महात्मा ज्योतिबा फुलेंचे कार्य सर्व समाजापर्यंत पोहचावे आणि त्यासाठी प्रयत्न करणे हीच क्रांतीबाला वाहिलेली श्रद्धांजली ठरेल. महात्मा ज्योतिबा फुलें या महान क्रांतीबाला कोटी कोटी प्रणाम !!!



लेखं- प्रवीण जाधव.

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...