खरा साहित्यिक उजेडाचा पक्ष घेतो !

साहित्यिक आपल्या लेखणीद्वारे सत्याचे प्रकटन करीत असतो. खरं तर हे सत्य सर्वसामान्य मानवी जीवनाच्या सभोवताल असून त्यास ते प्रभावित करीत असते. सामान्य माणसांच्या जीवनाला प्रभावित करणाऱ्या कोणत्याही घटना वा गोष्टी हे त्याच्या लेखणीचे विषय बनतात. जीवनाला प्रभावित करणाऱ्या कारणांच्या शोधत तो असतो आणि या कारणांच्या विरोधात आपली लेखणी उचलतो. वस्तुतः खरा साहित्यिक नेहमी उजेडाच्या शोधात असतो आणि सदैव उजेडाचाच पक्ष घेतो. इतकेच नव्हेतर तो अंधःकाराच्या विरुद्ध संघर्षही पुकारतो आणि सतत नेक मनाने सोद्देश मानवतेसाठी आवाज बुलंद करतो.

जो मुकबधीर समाजाला जावून भिडतो. आपण कितीही प्रयत्न केले तरी उच्चवर्णीयाकडून दलितांचे उत्थान शक्य नाही. मात्र या देशात राहायचं असेल तर सर्व सत्ता आपल्या हाती घ्यावी लागेल याचा बोध दलितांना झालेला आहे. पुढे आंबेडकरी साहित्याला सर्व परिवर्तनवादी साहित्याचे नेतृत्व करावे लागेल. विसावे शतक समाप्तीवर आहे आणि एकविसावे शतक हे आंबेडकरी विचारांचे युग असेल केवळ गरज आहे ती 'चेतना' जागविण्याची. ही चेतना केवळ आंबेडकरी साहित्यच जागवू शकते, आंबेडकरी साहित्य काळाची गरज आहे. परंतु आंबेडकरी विचार आपल्या हृदयाच्या परिघापर्यंत सीमित न ठेवता ते विशाल बनवून प्रामाणिकपणे जनतेपर्यंत पोहचविणे हे साहित्यिकांचे अहम कर्तव्य आहे. यामुळे समस्त दलितांमध्ये नवचेतना जागृत होईल आणि केवळ दलितच नव्हे तर संपूर्ण मानवजात मानवतेसाठी झटेल !

विचार संदर्भ- नानकचंद रत्तू अ. भा. आंबेडकरी साहित्य संमेलन दि. १४ नोव्हेंबर १९९७ यवतमाळ उदघाटकीय भाषणातून अनुवादित.


धन्यवाद- Anand Gaikwad

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...