'होळी लहान करा... पुरणपोळी दान करा...' पिंपरी-चिंचवड अ.नि.स कार्यकर्त्याचा अभिनव उपक्रम !!

'होळी लहान करा... पुरणपोळी दान करा...' पिंपरी-चिंचवड अ.नि.स कार्यकर्त्याचा अभिनव उपक्रम !!
 

गेल्या १५ वर्षापासून पिपरी-चिंचवड अंध्रश्रद्धा निर्मुलन समिती एक उपक्रम राबवत आहे.. त्या उपक्रमाचे नाव 'होळी लहान करा... पुरणपोळी दान करा...' हा उपक्रम कार्यकर्ते एखाद्या गावात राबवतात. होळीमध्ये जळून जाणाऱ्या पुरणपोळ्या होळीत न.. टाकता ते गरर्जू लोकांना वाटणे अथवा त्या पुरांपोळ्याचे समुहभोजन करणे.. तसेच होळी ही कमीत-कमी शेणी (गौरया) ची करणे... होळीत लाकडाचा वापर न करणे... व जमा झालेल्या शेणी (गौरया) स्मशानांत दान करणे. असा उपक्रम हे पिंपरी-चिंचवड अ.नि.स कार्यकते गेल्या १५ वर्षापासून राबवत आहे.

 



या वर्षी म्हणजेच काल १६ मार्च २०१४ ला होळी होती या अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या या १० कार्यकर्त्यांनी हा उपक्रम देहू जवळील.. माळवाडी, झेडेमला आणि चिंचोली गावातून पुरणपोळी जमा केल्या.. आणि रात्री ९. ३० वाजता जवळच असणाऱ्या त्या पुरणपोळ्या झाडू बनवणाऱ्या कुंचीकर समाजातील मुलं-मुलींना व लोकांना वाटल्या गेली १५ वर्ष या गावातील लोकं पुरणपोळी अग्नीत न टाकता जमा करतात. विचार तर कराल... १० लोकांनी तीन ठिकाणी ७०० पुरणपोळ्या आगींत जाण्यापासून वाचवल्या … महाराष्ट्रात किती पुरणपोळ्या आगीत जाऊन राख होत असतील?? आपण विचार करणार आहोत कि नाही??

 



महाराष्ट्रात गारपीट मुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले शेतकरी शेतात कष्टकरुन घाम गाळून शेतात धान्य पिकवतात जे लोक अजिबात कष्ट न करता सहज पुरणपोळी अग्नीमध्ये राख होण्यासाठी टाकतात खरच तो अग्नी शांत होत असेल का ?? कि कोणाच्या पोटात पुरणपोळी गेल्या मुळे जठर अग्नी शांत होईल.


 


भुकेल्याला अन्न हाच खरां धर्म हे गाडगेबाबा सांगतात... या सुविचाराचे आचरण या कार्यकर्त्यांनी केले. माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणीनो पर्यावरणाचे व राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण म्हणजेच देशप्रेम होय. हा उपक्रम येणाऱ्या होळीला आपण आपल्या कॉलनी मध्ये अथवा शिक्षकांनी आपल्या विधार्थ्याना सोबत घेवून राबवावा.

 


हा उपक्रम राबवणाऱ्या पिंपरी-चिंचवड अ.नि.स कार्यकर्त्याना व त्यांना साथ देणाऱ्या देहू जवळील.. माळवाडी, झेडेमला आणि चिंचोली गावातील लोकांना मानाचा मुजरा !!

 


नोट- तुम्ही खरचं पर्यावरणावर प्रेमं करत असाल तर ही पोस्ट जास्तीत-जास्त शरे करा.

 


धन्यवाद- विवेक साम (पिंपरी-चिंचवड अ.नि.स कार्यकता)

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...