संविधान सभेतील भाषणे... प्रजासत्ताक दिन चिरायू होवो... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो !!

संविधान सभेतील भाषणे... प्रजासत्ताक दिन चिरायू होवो...  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो !!


मी माझे मित्र , आणि साथी डॉ. आंबेडकरांचे प्रथमदर्शनी अभिनंदन केले नाही तर मी माझ्या कर्तव्यात कसूर केली असा त्याचा अर्थ होईल. मी डॉ. आंबेडकर यांच्या दैदिप्यमान कर्तृत्वाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो.संविधानाच्या प्रस्तावाला निश्चित रूप व आकार देण्यासाठी त्यांनी आपला अमुल्य वेळ आणि शक्ती खर्च त्याबद्दल हे सभागृह त्यांचे अभिनंदन करते.



विचार- पंडित लक्ष्मीनारायण मित्रा (संविधान सभेतील भाषणातून)




आता संविधानाच्या मसुद्याविषयी संविधान मसुदा समिती निर्धारित शर्तीच्या पलीकडे गेली आहे, अशी मला भीती वाटते. जे संपूर्ण संविधान आपणापुढे प्रस्तुत करण्यात आले आहे ते संविधान सभेने जी तत्वे निर्धारित केले होते त्याही पलीकडे गेले आहे, अशी मला भीती वाटते. या संपूर्ण मसुद्यात कॉंग्रेसच्या दृष्टीकोणाचा कोठे मागमूसही दिसत नाही. या मसुद्यात गांधीवादाच्या सामाजिक, राजनैतिक विचाराचे कोठेही प्रतिबिंब दिसत नाही. विद्वान डॉ. आंबेडकरांना आपल्या विद्वत्तापूर्ण भाषणात गांधींचा उल्लेख करावा असा एकही प्रसंग त्यांना आढळत नाही किंवा कॉंग्रेसचा उल्लेख करावा असा एकही प्रसंग त्यांना आढळत नाही. पण यात आश्यर्य वाटण्यासारखे काहीही नाही. संपूर्ण संविधानात विशेषत्वाने कॉंग्रेसची विचारसरणी आणि आदर्श यांचा अभाव आहे, असे मला वाटते... मुलभूत अधिकारासंदर्भात डॉ. आंबेडकर हे विद्वान प्राध्यापक आहेत. मी त्यांच्या विद्वत्तेचा क्षमतेचा आदर करतो. संविधानाचा मसुदा हि त्यांचीच निर्मिती आहे, कलाकृती आहे. असे मला वाटते.



विचार- श्री. अरुणचंद्र गुहा, पश्चिम बंगाल (संविधान सभेतील भाषणातून)





अध्यक्ष महोदय, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण काळजीपूर्वक ऐकणाऱ्या सदस्यांपैकी मी एक आहे. या संविधानाचा मसुदा तयार करतांना त्यांना किती कष्ट सहन करावे लागले असतील. तरीही त्यांनी किती उत्साहाने हि जबाबदारी पार पडली याची मला जाणीव आहे. पण त्याचवेळी हे संविधान जे आपणाकरिता एवढे महत्वाचे आहे त्याचा मसुदा तयार करतांना मसुदा समितीने जेवढे लक्ष द्यावयास पाहिजे होते तेवढे दिले नाही याची मलाही जाणीव आहे. या सभागृहाला याची जाणीव असेल कि, याच सभागृहाने मसुदा समितीवर ज्या सात सदस्यांची नियुक्ती केली होती त्यापैकी... एकाने या सभागृहाचा राजीनामा दिला म्हणून त्यांच्या जागी दुसऱ्यांना नियुक्त करण्यात आले नाही. एका सदस्याचा मृत्यू झाला आणि ती जागा रिकामीच राहिली. एक सदस्य दूर अमेरिकेत निघून गेले त्यांचीही जागा भरली गेलीच नाही दुसरे एक सदस्य राज्याच्या राजकाणात व्यस्त होते, गुंतलेले होते आणि त्या प्रमाणात पोकळी निर्माण झाली होती. एक किंवा दोन सदस्य दिल्लीपासून फार दूर होते आणि कदाचित प्रकृती अस्वास्थामुळे त्यांनी बैठकीत भाग घेतलाच नाही. याचा अंतिम परिणाम असा झाला कि , संविधानाचा मसुदा तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी डॉ. आंबेडकर यांच्यावर आली आणि हे महत्वपूर्ण कार्य निसंशय अत्यंत समर्थपणे पूर्ण केले यात तिळमात्र शंका नाही.याकरिता आम्ही त्यांचे कृतज्ञ आहोत.


विचार- श्री.टी टी. कृष्णम्माचारी (संविधान सभेतील भाषणातून)





डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणातील काही भाग (२६ जानेवारी १९५०, संसद भवन)-



“आज २६ जानेवारी १९५० रोजी आपण सर्व एका विरोधाभासाच्या आयुष्यात प्रवेश करणार आहोत. राजकारणात आपण समानता अनुभउ परंतु आर्थिक आणि सामाजिक बांधणीमध्ये आपण प्रत्येक व्यक्तीची किंमत मान्य करणार आहोत कि नाही ?”


 

“आणखी किती काल आपण हे असे विषमतेचे आयुष्य जगायचे? किती दिवस आपण सामाजिक आणि आर्थिक विषमता सुरु ठेवणार आहोत? हे असेच सुरु राहिले तर राजकीय स्वातंत्र्य धोक्यात येईल. असमानतेचे बळी ठरलेले लोक मेहनतीने बनवलेली संविधानिक आणि लोकशाही प्रणीत व्यवस्था उखडून टाकतील.”


 


"मला ठामपणे वाटते कि हि घटना अतिशय उत्तम ठरते जर ती तितकीच लवचिक असेल आणि शांततेत तसेच युद्धप्रसंगात देशाला एकसंघ ठेवेल, खरंच मला असे वाटते. परंतु जर काही अनुचित किंवा चुकीचे घडले तर घटना चुकीची आहे असे नसून घटना वापरणारे दुष्ट आणि खलकारक असतील."


 


"खरया अर्थाने जगामध्ये भारत हा कुठला देश नाहीच आहे, अजून हा खऱ्या अर्थाने देश घडायचं आहे असे मी मानतो. आपण एक राष्ट्र आहोत असे मानाने म्हणजे निव्वळ भ्रम आहे. १००० प्रकारच्या जातींमध्ये विभागलेला समाज एक राष्ट्र, एक देश कसा काय होऊ शकतो ? लवकरच आपल्याला कळून येईल कि जगाच्या सामाजिक आणि मानसिक तत्वप्रणाली वर आपण देश या संज्ञेत बसत नाही."


 


"स्वातंत्र्य हि बाब आनंद होणारी आहे यात वाद नाही परंतु हे स्वातंत्र्य आपल्यावर भल्या मोठ्या जबाबदाऱ्या सुद्धा टाकते. या स्वातंत्र्यमुळे आता आपण काहीही चूक झाले कि त्याचे खापर ब्रिटीश सरकार वर फोडू शकत नाही, या नंतर काहीही चुकीचे घडेल त्यासाठी सर्वस्व आपणच जबाबदार असणार आहोत आणखी कुणी नाही. वेळ फार झपाट्याने बदलत आहे."


 


''जेव्हा आम्ही राजकीय लोकशाही स्थापन करीत आहोत तेव्हा हे सुद्धा अपेक्षित आहे कि, आम्ही आपला आदर्श आर्थिक लोकशाही हाच ठरविला पाहिजे. आम्हाला अपेक्षित नाही कि आम्ही अशी यंत्रणा निर्माण करावी कि ज्यामुळे लोकांनी फक्त यावे आणि सत्ता प्राप्त करावी. जे लोक सरकार बनविणार आहेत त्यांच्यापुढे भारतीय संविधान एक आदर्श ठेवू इच्छितो. हा आदर्श आर्थिक लोकशाही हाच आहे.




डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधान चा आम्हास गर्व आहे, भारतीय गणराज्यदिनाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा !!




जय भारत !!!




या अमुल्य माहितीसाठी धन्यवाद- प्रशांत वंजारे सर.


No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...