चर्मकार बंधु-भगिनीनो किती दिवस दुसऱ्याने केलेल्या आंदोलनाचे फायदे घेत राहणार??



चर्मकारांना आंदोलनाची परंपरा नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे कितीही मोठा अन्याय झाला तरी तो समाज रस्त्यावर येत नाही. चर्मकार समाजाला लहान-लहान आंदोलनातून तशी सवय लावणे काळाची गरज आहे. कोणी कार्यकर्ता तशे प्रयत्न शून्यातून समाज जागृतीचे काम करत असल्यास त्याला प्रोत्साहनदेणे आपले कर्तव्य आहे.  चर्मकार समाजाला रस्त्यावर येवून अन्याया विरुद्ध आवाज उठविण्याची /करण्याची सवय लावणे अत्यंत गरजेचे आहे. किती दिवस दुसऱ्याने केलेल्या आंदोलनाचे फायदे घेत राहणार, चर्मकार समाजातील खासदार आमदार नगरसेवक हे कोणाच्या आंदोलनाचे फळ आहे ?? कधीतरी स्वतःच्या पायावर उभे राहवेच लागणार. सुरुवात करा, आंदोलनाच्यादृष्टीने चर्मकार समाज अजून बाल्याअवस्थेत आहे. हे आपल्या समाजाला कळायला हवे... हिंदु-हिंदु करुन अजुनही... ब्राह्मणीव्यवस्थेचे गुलाम बनलेले आहेत.... देव देव करण्यातच जिंदगी घालवत आहेत.



चर्मकार समाजाला कायम वापरले गेले आहे याची जाणीव आपल्या समाजाला नाही. महाराष्ट्रात या समाजाची लोकसंख्या २००१ च्या जनगणनेनुसार १२ लाख आहे. मात्र ५९ अनुसूचित जातीपैकी फक्त चर्मकारानाच सर्वात जास्त राजकीय प्रतिनिधित्व मिळाले आहे. लोकसभेत, विधानसभेत चर्मकार मागासवर्गीयांच्या प्रश्नावर राखीव मतदार संघातून निवडून आलेल्या चर्मकार खासदार आमदारांनी कितीदा तोड उघडले याची जरा आकडेवारी राहिली माहिती द्यावी?? अजूनही सारख्याच गुणवत्तेचे बौद्ध व चर्मकार असे उमेदवार नोकरीसाठी, निवडणुकीसा­ठी व इतर कोणत्याही स्पर्धेसाठी उभे झाल्यास चर्मकार उमेदवारास पसंती दिली जाते. बौद्धांच्या संघर्षाला बोथट करण्यासाठी चर्मकार समाज उपयोगी पडत असल्यामुळे प्रस्थापित तथाकथित सवर्ण हिंदू चर्मकाराना संघर्ष न करताही सर्व लाभ मिळवून देतात. चर्मकारांची लोकसंख्या शहरी भागात जास्त व ग्रामीण भागात कमी आहे. यामुळे गावातील जातीयतेचे चटके त्यांना सोसावे लागत नाही. यामुळे चर्मकार संघर्षापासून अलिप्त आहेत.



विचार-  Lata Baile ताई ,  Sunil Khobragade सर.

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...