टाटांनी घेतला 'अपमाना'चा बदला


काळ कधी, कोणासाठी थांबत नाही असं म्हणतात. अशीच काहीशी घटना रतन टाटांसोबत १९९९ मध्ये घडली. बोलावणं आल्याने रतन टाटा आपल्या चमूसह त्यावेळी अमेरिकेत डेट्रॉइटला गेले होते. मात्र अतिशय वाईट पद्धतीने अपमान झाल्याने त्यांना तिथून परतावे लागले. नंतर २००८ मध्ये म्हणजे नऊ वर्षींनी टाटांनी आपल्या अपमानाचा बदला घेतलाच.

हॅचबॅक इंडिका नावाने टाटा समूहाने १९९८ मध्ये आपली पहिली कार बाजारात आणली. पण त्याला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कंपनीने हा कार उद्योग फोर्ड मोटर्सला विकण्याची तयारी सुरु केली. टाटा समूहाचे मुख्यालय असलेल्या बॉम्बे हाऊसमध्ये येऊन फोर्डच्या अधिकाऱ्यांनीही खरेदीत रुची दाखवली. आणि त्यानंतर डीलसाठी टाटा समूहाला अमेरिकेत डेट्रॉइटमध्ये बोलवण्यात आलं. त्यावेळी रतन टाटा आपल्या प्रमुख अधिकाऱ्यांसह १९९९ मध्ये डेट्रॉइटला गेले. 'तुम्हाला काही माहितीच नव्हती तर कार उद्योगात उतरलेच कशाला? तुमचा हा उद्योग आम्ही खरेदी करतोय याबद्दल तुम्ही आमचे उपकारच मानायला हवेत', असं त्या बैठकीत फोर्डकडून सुनावलं गेलं. त्या बैठकीत सहभागी असलेले टाटा समूहातील प्रमुख अधिकारी प्रवीण कडले हा सर्व घटनाक्रम सांगत होते. या अपमानामुळे टाटा मोटर्सच्या टीमने संध्याकाळी लगेचच मायदेशी रवाना होण्याचा निर्णय घेतला. परतीच्या प्रवासात रतन टाटा खूपच उदास दिसून आले, असं कडलेंनी सांगितलं.


१९९९ मध्ये झालेल्या अपमानाचा बदला अखेर नऊ वर्षांनी म्हणजे २००८ मध्ये टाटा समूहाने फोर्डला चुकता केला. प्रमुख ब्रॅण्ड असलेल्या जॅग्वार आणि लँड रोवरला खरेदी करत टाटा समूहाने फोर्डला सनसणीत चपराक दिली. 'जेएलआर' खरेदीकरुन टाटा समूहाने फोर्डवर खूप मोठे उपकार केले, असं 'जेएलआर' डीलनंतर फोर्डचे अध्यक्ष बिल बोर्ड यांना बोलावं लागलं. अशी माहिती कडलेंनी दिली. टाटा समूहाने २००८ मध्ये २.३ अब्ज डॉलरमध्ये 'जेएलआर'ला खरेदी केलं होतं. जागतिक पातळीवर 'जेएलआर' आता टाटांच्या नावाने धावतेय.

स्मार्टफोनलाही यूएसबी सी पोर्ट

सी पद्धतीचे यूएसबी पोर्ट असलेले क्रोमबुक पिक्सल २०१५ गुगलने नुकतेच लाँच केले. यूएसबी पोर्टमधील सी पद्धतीचे पोर्ट हेच भविष्यात महत्त्वाचे ठरणार हे यावेळी स्पष्ट झाले. या नवीन पोर्टला सपोर्ट करणारे क्रोमबुक आणि नवीन अॅपल मॅकबुक ही डिव्हाइसेस याआधीच बाजारात आली आहेत. सी पोर्टला सपोर्ट करणाऱ्या क्रोमबुक पिक्सलनंतर आता यी सी पोर्टला सपोर्ट करणाऱ्या अँड्रॉइड फोनची निर्मिती करण्याचा गुगलचा विचार आहे. भविष्यात हे सी पोर्ट सध्याच्या मायक्रो यूएसबी पोर्टची जागा घेईल. 

यूएसबी टाइप सी कनेक्टरमध्ये यूएसबी ३.१च्या तोडीचा डाटा ट्रान्स्फर स्पीड मिळेल. शिवाय, यात रि‌व्हर्सिबल प्लगही असेल. त्यामुळे योग्यरित्या पोर्टमध्ये प्लग लावण्यास लागणाऱ्या वेळेतही बचत होईल. 

नवीन क्रोमबुक पिक्सलमधील यूएसबी टाइप सी कशा पद्धतीने कार्य करते, हे दर्शवणारा एक व्हिडीओ गुगलच्या अॅडम रॉड्रिग्ज यांनी प्रसिद्ध केला आहे. येत्या काळात अँड्रॉइड आणि क्रोमबुकमध्ये यूएसबी टाइप सी हे फीचर पाहायला मिळेल, असे त्यांनी यात स्पष्ट केले आहे. 

अॅपलचा नवीन मॅकबुकसुद्धा अशाच यूएसबी पोर्टचा उपयोग करणार आहे. क्रोमबुक पिक्सलबरोबर हे पोर्ट देण्यात येत आहे. यूएसबी टाइप सी पोर्ट लवकरच सर्व स्मार्ट फोनसाठी सामायिक कनेक्टर म्हणून वापरता येईल. या वर्षाच्या अखेरपर्यंत बहुतांश स्मार्ट फोन्स यूएसबी पोर्ट सी असलेले येतील, अशी अपेक्षा आहे. 

भगतसिंग आणि व्हॅलेंटाइनडे...?

सकाळपासून व्हेलन्ताइन विरोधासाठी भगतसिहाच्या फोटोचे पोस्टर फिरते आहे. भगतसिग आणि १४ फेब्रुवारी यांचा काहीही संबध नाही . भगतसींग आणि त्याच्या सहकारी क्रांतिकारकांना २३ मार्च १९३१ ला फाशी झाली. ७ ओक्टोबर १९३० ला हि फाशीची सजा सुनावली गेली होती . भगतसिग यांची दोनदा अटक ,सोंडर्स मर्डर केस , लाहोर खून खटला यातल्या एकाही महत्वपूर्ण घटनेशी १४ फेब्रुवारी या तारखेचा दुरान्वयेहि संबंध नाही . बरेच संशोधन केल्यावर असे आढळते . कि या केस मध्ये - फाशिविरुद्ध कोन्ग्रेस चे तत्कालीन अध्यक्ष पं मदन मोहन यांनी एक फाशी माफी अर्ज ब्रिटिश सरकारला पाठवला होता त्याची तारिख १४ फेब्रुवारी आहे . तो अर्ज पुढे बर्याच काळाने फ़ेटाळण्यात आला . त्यामुळे भगतसिंगांच्या चरित्रपटात १४ फेब्रुवारी हि तारीख अजिबात महत्वाची ठरत नाही . एका कोन्ग्रेस अध्यक्षाने भगतसिंगला पाठिबा देण्याचा तो स्मरणदिन आहे . प्रत्येकच तारखेला कोण्या न कोण्या हुतात्म्याचा मृत्यू / मृत्यू ची सरकारी ओर्डर निघालेली असते . ह्या न्यायाने मुलांचे वाढदिवस सुद्धा साजरे करणे अवघड होऊन बसेल …
व्हेलेण्टाइन डे विरोधकांनी चालवलेला हा खोटा प्रचार आहे. शर्ट पेंट फेसबुक कोम्प्युटर सगळे परदेशी चालते … पण प्रेम म्हटले कि कट्टर वाद्यांच्या पोटात पाश्चिमात्य गोळा उठतो !
भगतसिघांचे स्मरण धार्मिक आगंतुकांनि १४ फेब्रुवारीलाच काय ? तर रोजच केले पाहिजे . पण फुले उदबत्त्यांनि त्यांच्या फोटोची मूर्तीपूजा करून नव्हे । तर भगतसिंहाच्या क्रांतिकारी विचाराचे चिंतन करून ! धर्माला व्हेलनटैनपेक्षा अधिक धोका भगत सिहाच्या विचारांमुळे आहे हे संस्कृती रक्षकानि समजून घेतले पाहिजे. भगतसिंह लिहितात...
मी नास्तिक का झालो ? - सदार भगतसिंग
"माझ्या लक्षात एक गोष्ट आली की सर्व शक्तीमान परमात्माची कहाणी, विश्वनिर्मिती आणि विश्वाचं संचालन देव करतो ही गोष्ट एकदम बकवास आहे. माझ्या या विचारांना मी मांडू लागलो. माझ्या मित्रांशी याबाबत मी विचार विनिमय, चर्चा करू लागलो. मी नास्तिक म्हणून जाहीर झालो होतो… फाशी जाहीर झाली त्या दिवसापासून काही पोलीस अधिकारी मी नियमितपणे दोन वेळा देवाची प्रार्थना करावी म्हणून माझे मन वळवू लागले. मी तर नास्तिक होतो.
फक्त शांततेच्या काळातच नव्हे - तर कठीण प्रसंगीदेखील …. विचारान्ती मी निर्णय घेतला की देवावर विश्वास ठेवणे व त्याची प्रार्थना करणे हे माझ्याकडून होणार नाही. नाही, ते कधीही शक्य नाही. फाशीच्या आदल्या दिवशीही नाही !
ज्याक्षणी माझ्या मानेभोवती फास आवळला जाईल आणि पायाखालची फळी खेचली जाईल तो शेवटचा क्षण असेल. तोच अंतिम क्षण असेल. मी, किंवा अगदी काटेकोर आध्यात्मिक भाषेप्रमाणे बोलायचे झाले तर माझा आत्मा याचा तेथेच अंत होईल. बस्स इतकेच. जर असे मानायचे धैर्य मला असेल तर कोणतेही भव्यदिव्य यश न मिळालेले, एक संघर्षाचे, थोड्याच दिवसांचे जीवन हेच खुद्द माझे बक्षीस आहे. याहून जास्त काही नाही. स्वार्थी हेतू न बाळगता, तसेच इहलोकी किंवा परलोकी फळाची अपेक्षा न ठेवता, अगदी निरिच्छपणे मी माझे आयुष्य स्वातंत्राच्या ध्येयासाठी वाहिले, कारण त्याहून वेगळे काही करणे मला जमलेच नसते."
समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, जन्म-पुनर्जन्म, ८४ लक्ष फेरे व त्यातून मुक्ती, मृत्यूनंतरचे जीवन, वगरे तर्कशुद्ध नसलेल्या गोष्टींवर अंधविश्वास न ठेवणारा कणखर समाज निर्माण व्हावा यासाठीच त्यांचा हा प्रयत्न होता. सदार भगतसिंग यांच्या नास्तिक विचाराचे स्मरण आपण करणार का ? कि इतरांच्या लैगिक - भावनिक आयुष्याचे हुकुमशाही नियंत्रण करण्यासाठी फक्त त्यांच्या फोटोची पूजा करणार ?
लेखक - डॉ . अभिराम दिक्षित Abhiram Dixit

ऑक्टोपस चे रक्त निळे का असते ?

ऑक्टोपसला तीन हृदय असतात. Hemocyanin नावाच्या रंग्द्रव्यामुळे ऑक्टोपसच्या रक्ताला नीला रंग येतो.
Hemocyanin हे रक्तातील प्रथिने असून त्यात कॉपर / तांबेचे अणु असतात जे तितक्याच संख्येचे ऑक्सिजनचे अणु पकडून ठेवतात. Hemocyanin मुळेच अत्यंत प्रतिकूल तापमानात सुद्धा जीव जिवंत राहू शकतात. पाठीचा काना नसलेल्या जीवांमध्ये Hemocyanin आढळते.
निळ्या रंगाच्या या Hemocyanin मुळेच ऑक्सिजन ओक्टोपसच्या शरीरात पुरवला जातो. ऑक्टोपसला तीन हृदय असतात आणि पाठीचा कणा नसलेल्या इतर सजीवापेक्षा त्याला सर्वात जास्त ऑक्सिजन लागतो आणि Hemocyanin ते पुरवण्याचे कार्य करतो.
ऑक्टोपस चे रक्त तांब या धातूवर असल्याने निळे तर मानवाचे लोह धातूवर आधारित असल्याने लाल असते.

Cancer उपचारा दरम्यान केस का गळतात ?

Cancer उपचारासाठी वापरण्यात येणारे केमोथेरपीचे औषध हे खूप पावरफुल असतात, केंसरच्या वेगाने वाढणाऱ्या पेशींवर ते जोरात हल्ला चढवतात. परंतु हे औषध cancer शिवाय शरीरातील वेगाने वाढणाऱ्या इतरही पेशींवर हल्ला करतात उदा. केसांच्या पेशी.
केमोथेरपीमुळे फक्त डोक्यावरीलच नाही तर शरीरावरील सर्वच केस निघून जाऊ शकतात अगदी भुवया, पापण्या सुद्धा. सुद्दैवाने केसांचे हे गळणे तात्पुरते असते. थेरपी संपली कि 3-६ महिन्यानंतर केस येयला पुन्हा सुरुवात होते.

मांजरीं उडी मारल्यावर पायावरच कशा पडतात ?

काही मोजक्या प्राण्याप्रमाणे मांजरींच्या हाडांचा सांगाडा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा असतो. मांजरींना खांद्याचे हाड नसते. आणि पाठीचे हाडे सुद्धा इतर प्राण्यांपेक्षा जास्त लवचिक असतात त्यामुळे खाली पडत असताना ते जास्त गतीने स्वताला गोल फिरउ शकतात आणि हवी तशी हालचाल करू शकतात.
परंतु दोन किवा जास्त मजल्यावरून उडी मारली तर मांजरींना सुद्धा दुखापत होऊ शकते. कारण मांजरींचे पाय तो धक्का सहन करू शकत नाही. 

आजची स्त्री : पारंपारिक की खरी आधुनिक?

मुलींसाठी पहीली शाळा काढल्यावर पुण्यातील सनातनी लोकांनी "धर्म बुडाला" अशी आवई उठवली... धर्मग्रंथानूसार स्ञियांना शिक्षणास बंदी होती, ते धर्मग्रंथ झुगारून साविञीमाईंनी मुलींना शिकवले.. आज मुली अंतराळात गेल्या, तरी धर्म बुडाला का?? पण ज्या धर्मग्रंथामूळे स्ञीयांनां वाचण्यास, लिहण्यास अधिकार नव्हता... आता स्ञिया शिकून, लिहून तेच धर्मग्रंथ, पोथ्यापुराणे वाचत आहेत या सारखे दुर्देव दूसरे नाही.. अगदी प्राध्यापक झालेल्या स्ञीया सुद्धा आज़ सत्संग क्रेंद्र, आश्रमात जात आहेत, साविञीच्या लेकीची ही अवस्था पाहून साविञीमाईंचा जीव पण तिळ तिळ तूटत असेल.. आज त्या मातेच्या असीम त्याग आणि प्रयत्नांची साविञीच्या लेकींना जाणीव असायला हवी !!

...तर व्हॉट्सअॅपवरून हद्दपार

कॅलिफोर्नियाः हो, हे शक्य आहे. व्हॉट्सअॅप किंवा व्हॉट्सअॅपच्या सुविधा तुम्ही थर्डपार्टी अॅपच्या माध्यमातून अॅक्सेस करणार असाल, तर तुम्हाला अशापद्धतीने व्हॉट्सअॅप कदाचित कधीच वापरता येणार नाही. पण तुम्ही व्हॉट्सअॅपचे अधिकृत अॅप पुन्हा वापरायला सुरुवात कराल तरच तुम्हाला व्हॉट्सअॅप वापरता येईल, अन्यथा नाही.

सध्या WhatsApp+, WhatsApp Reborn, OgWhatsapp यासारख्या काही अॅप्सच्या माध्यमातून व्हॉट्सअॅपचा वापर करता येतो. मात्र ही काही अधिकृत अॅप्स नाहीत. या अॅपचा वापर करणाऱ्या युजरला काही मेसेज मिळतच नाहीत किंवा याद्वारे जाहिराती पसरविल्या जातात किंवा अन्य मार्गाने युजरच्या डेटाचा गैरवापर होतो, अशा तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे जे युजर या अॅपवरून व्हॉट्सअॅप वापरत असल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांना व्हॉट्सअॅपवरून हद्दपार करण्याची कारवाई कंपनीने सुरू केली आहे. जोपर्यंत हे युजर व्हॉट्सअॅपचे अधिकृत अॅप वगळता इतर अॅप वापरत राहतील, त्यांना व्हॉट्सअॅपच्या सुविधा मिळणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. या युजरला व्हॉट्सअॅपच्या सुविधा हव्या असतील, तर त्यांना व्हॉट्सअॅपच्या अधिकृत अॅपचा वापर पुन्हा सुरू करावा लागेल.

कॉलिंगच्या माध्यमातून व्हायरस

काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअॅपने कॉलिंगची सुविधा सुरू केली आहे. अर्थात ठराविक युजरनाच सध्या ती वापरता येते. मात्र व्हॉट्सअॅपची लोकप्रियता पाहता, इतर युजरनाही त्याचा वापर करायची इच्छा आहे. या युजरना गंडविण्यासाठी whatsappcalling.com आणि यासारख्या या वेबसाइटचे नाव असलेला मेसेज युजरपर्यंत पाठविला जात आहे. ही वेबसाइट ओपन करा आणि व्हॉट्सअॅप कॉलिंग सुरू करा, अशाप्रकारचा संदेश यासोबत पाठविण्यात येतो. व्हॉट्सअॅप कॉलिंग मोफत असल्याने व मेसेजमधील वेबसाइटचे नाव व्हॉट्सअॅपशी साधर्म्य दाखविणारे असल्याने अनेक युजर याला बळी पडत आहेत. या मेसेजमधील वेबसाइटच्या नावावर क्लिक केल्यास अनेक व्हायरस मोबाइलमध्ये आपोआप डाऊनलोड होत आहेत. त्यामुळे युझरची अनेक प्रकारची गोपनीय माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचते आहे. कुठल्याही आमिषाला बळी न पडता अधिकृतरित्या व्हॉट्सअॅप कॉलिंगची सुविधा मिळेपर्यंत वाट पाहणेच योग्य.
स्त्रोत : महाराष्ट्र टाईम्स

सांभाळा आपल्या हृदयाला

मानवी शरीर रचनेतील उर्जा मिर्मितीचा स्त्रोत म्हणजे हृदय होय.
हृदयाची रचना आणि मुख्य कार्य :-
हृदयाचे प्रमुख कार्य शरीरामध्ये रक्ताभिसरण करणे होय. एखाद्या पंपिंग स्टेशन प्रमाणे हे इंद्रिय काम करते. हृदयाकडे आलेले रक्त आत घेते व बाहेर टाकते. हृदयाला चार कप्पे वर दोन कर्णिका व खाली दोन जीवनिका असतात. उजव्या बाजूला अशुद्ध रक्त असते व डाव्या बाजूला शुद्ध रक्त असते. हृदय सतत आकुंचन व प्रसरण पावते. त्याचा वेग मिनिटाला ६० ते १०० ठोके असतो. उजव्या बाजूला शरीराकडून आलेले रक्त फुफ्फुसाकडे पाठवले जाते. फुफ्फुसामध्ये रक्तातील कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकला जाऊन प्राणवायू शोषला जातो. हे रक्त हृदयाच्या डाव्या कर्णिकेत आणले जाते. येथून ते डाव्या जीवनिकेतून शरीरभर पोहचवले जाते.
हृदय विकाराचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत.
अ ) जन्मजात हृदयविकार
ब ) झडपांचा हृदयविकार
क ) हृदय रक्तवाहिन्यांचा विकार
अ ) जन्मजात हृदयविकार :- जन्मजात हृदयविकार केवळ २ टक्के प्रमाणात आढळतो. हल्ली गर्भाशयाच्या सहाव्या महिन्यात सोनोग्राफीमध्ये याबाबतचे निदान आणि उपचार आता शक्य झाले आहेत. साधारणतः हृदयाला छिद्र असण्याचे प्रकार आपल्याकडे आढळतात. जीवनिकेच्या पडद्याला असणारे छिद्र, कार्निकेच्या पडद्याला असणारे छिद्र, हृदयाच्या झाडापा आकुंचित असणे असे या आजाराचे स्वरूप असते. या आजाराने ग्रस्त झालेली मुले पिंक बेबी गटात येतात. यावर विनाशस्त्रक्रिया इलाज करणे शक्य आहे.
दुसरा प्रकार म्हणजे ब्लू बेबी. हा गुंतागुंतीचा हृदयविकार असून यामध्ये शुद्ध व अशुद्ध रक्त याचे मिश्रण होऊन किंवा फुफ्फुसाचा रक्तप्रवाह कमी प्रमाणात होत असल्याने रक्ताभिसरणातील प्राणवायूचे प्रमाण कमी होऊन शरीराला रक्त पुरवठा केला जातो. त्यामुळे या विकाराने त्रस्त रुग्णांची काय निळसर होते. तथापि जन्मजात हृदयविकारावरील उपचारासाठी हृदय शस्त्रक्रियेने उजवा व दावा कप्पा वेगळे करणे, फुफ्फुसाचा रक्त पुरवठा वाढविणे हे आजच्या प्रगत तंत्रज्ञानाने शक्य आहे.
ब ) झडपांचा हृदयविकार :- हृदयाला चार झडपा असतात. दोन उजवीकडे आणि दोन डावीकडे. वर्तमानपत्रांच्या कागदासारखी पातळ पडद्याची त्यांची रचनाअसते . यामध्ये उद्भवणाऱ्या आजाराला झडपांचा ( व्होल्व ) हृदयविकार म्हटले जाते. भारतामध्ये मोठ्या संख्येतील समाज हा मुलभूत सुविधानभावी गलिच्छ वस्तींमध्ये आपले जीवन कंठतो. दाटीवाटीच्या लोकसंख्येत राहणे आणि योग्य आहार न मिळणे यामुळे हृदयाचे स्नायू बळकट होत नाहीत आणि पर्यायाने झडपादेखील पूर्णशक्तीने काम करीत नाहीत. अशा स्थितीत रुग्णांना या पद्धतीचा आजार होण्याची शक्यता अधिक असते. भारतात हा आजार अधिक आढळतो. बलून उपचाराद्वारे झडपांमधील अरुंद्पणा कमी करण्याचे काम केले जाते. बर्याचदा झडपा खराब होऊन दुरुस्तीपलीकडे गेल्यास शस्त्रक्रियेने झडप बदलून कृत्रिम झडप लावणे हेही कमी धोक्याच्या पद्धतीने करता येते.
क ) हृदय रक्तवाहिन्यांचा विकार :- हृदय चालविण्यासाठी नियमित, समप्रमाणात आणि सातत्यपूर्ण रक्तपुरवठ्याची आवश्यकता असते. त्यामुळे रक्तवाहिन्या या निकोप असणे गरजेचे असते. हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या कोरोनरी आर्टरी यांच्यामध्ये येणाऱ्या अडथळ्याने हा पुरवठा कमी होऊ शकतो. रक्तवाहिनी आकुंचन पावते किंवा अरुंद होते. त्यामुळे हृदयाच्या स्नायूवर परिणाम होतो. तसेच रक्ताभिसरणाच्या नियमित प्रक्रियेमध्ये अडथळा येउन त्याचा शरीरावर परिणाम होतो. अस्वस्थता वाढते व पुढे हृदयविकाराचा झटका येतो.
एन्जिओप्लास्टी म्हणजे काय :-
प्रत्यक्ष शस्त्रक्रिया न करता शरीरातील रक्तवाहिन्यातील अडथळे दूर करण्याची प्रक्रिया म्हणजे एन्जिओप्लास्टी होय. रक्तवाहिन्यांच्या भागांमध्ये आलेले अडथळे शरीरामध्ये छोटी नळी टाकून त्या ठिकाणचा अरुंद झालेला भाग बलूनने मोठा केला जातो. यामध्ये धातूचा स्टेंट वापरला जातो. रक्ताची गुळणी होऊ नये किंवा शरीराला अपाय होणार नाही, अशा औषधीयुक्त रसायनांनी हा स्टेंट तयार केला जातो. औषधीयुक्त स्टेंट अधिक प्रमाणात वापरले जातात.
बायपास सर्जरी म्हणजे काय :-
एन्जिओप्लास्टी केल्यानंतर पुन्हा ब्लॉकेज उद्भवणे किंवा जेव्हा दोन व अधिक रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस असतात तेव्हा अथवा एन्जिओप्लास्टी यशस्वी होत नाही अशा वेळेस बायपास सर्जरीचा निर्णय घेतला जातो. ऑनपंप आणि ऑफपंप अशा दोन प्रकारे हि शस्त्रक्रिया केली जाते. या शस्त्रक्रियेमध्ये जोडण्यात येणाऱ्या रक्तनलिका रोहिणी प्रकारातील असल्यास अधिक फायदेशीर ठरते. एन्जिओप्लास्टी किंवा बायपास शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्णाला अधिक कार्यक्षमतेने जगणे शक्य होते. या दोन्ही उपचाराने आयुष्यच वाढते असे नसून अधिक सक्षमतेने जीवन जगणे शक्य होते.
हृदयविकाराची कारणे :-
* स्थूलपणा
* अतिधुम्रपान
* मधुमेह
* उच्च रक्तदाब
* रक्तातील चरबीचे ( कोलेस्ट्रेरॉल ) वाढलेले प्रमाण
* व्यायामाचा अभाव
* अधिक बैठे काम
* मानसिक आणि शारीरिक ताण
हृदयविकाराची लक्षणे :-
बर्याच वेळा छातीत दुखणे, धडधडणे
पाठीच्या दोन फेर्यांमध्ये दुखणे ( दोन्ही बाजूंना )
डाव्या हाताला दुखणे
पोटाच्या वरच्या भागाला दुखून उलट्या होणे
प्रचंड अस्वस्थता वाटणे
रक्तदाब वाढणे
धाप लागणे
रक्ताच्या गुठळीमुळे झटका येणे.
परिणाम :-
हृदय रक्तवाहिनीमध्ये रक्ताच्या गुठळ्या आणि आकुंचन स्थिती व अंतरस्थरावर जाडेपणामुळे रक्तपुरवठा प्रभावित होतो.
त्यामुळे हृदयाच्या मागणीप्रमाणे पुरवठा करण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो व हृदयाचे स्नायू प्राणवायूच्या कमी पुरवठ्यामुळे अकार्यक्षम होतात.
काळजी अशी घ्यावी :-
१) नियमित रक्तदाब, मधुमेह आणि रक्तातील कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाण याची तपासणी
२) ईसीजी काढून त्यातील बदलानुसार पुढील तपासण्या कराव्यात.
३) हृदयाची आकुंचन / प्रसरणाची बाजू तपासणारी इको चाचणी करणे
४) वैद्यकीय सल्ल्यानुसार ऐन्जीओग्राफी ( हि १०० टक्के निदान करणारी सुरक्षित आणि महत्त्वाची चाचणी )
५) हृदयाच्या स्नायूंचे रक्ताभिसरण ( परफ्युजन स्कॅन ) यामुळे हृदयाला कोणत्या भागात रक्तपुरवठा होतो हे माहिती पडते, हि तपासणी गरजेनुसार करावी.
६) आयव्हस ( अल्ट्रासाउंड ) चाचणी - हृदयाच्या रक्तवाहिनीच्या आतमध्ये असलेल्या अडथळ्यांचे निदान करते.
७) हृदयाच्या रक्त वाहिनीतील प्रवाहाची नोंद करणारी चाचणी
८) ७० टक्क्यांपेक्षा अधिक अडथळे ( ब्लॉकेज ) असतील तरच एन्जिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी सुचविली जाते.
९) रक्ताचा प्रवाह ५० टक्के किंवा अधिक सुरु असला तर त्यावर औषधोपचार सुचविला जातो.
याशिवाय नियमित संतुलित आहार , क्षार व चरबीयुक्त पदार्थांचे सेवन टाळणे , नियमित व्यायाम आणि तणावरहित जीवनशैली आवश्यक आहे.
- डॉ. के. एन. भोसले ( जे जे रुग्णालय हृद्य विभागाचे प्रमुख )
- शब्दांकन - प्रवीण टाके.
सौजन्य - लोकराज्य ( महाराष्ट्र शासन )

प्रजासत्ताक कोणा मुळे? संविधानामुळे संविधान कोणा मुळे? डॉ.बाबासाहेबांमुळे !!

सन १९४६, भारतीय संविधान समिती तयार करण्यासाठी, सर्व प्रांतीय विधानसभा मतदार संघातून सभासद निवडले जाणार होते. डॉ. आंबेडकरांना भारताच्या नव्याने तयार
होणाऱ्या संविधान समितीत प्रतिनिधित्व करण्याची इच्छा होती परंतु "शेड्युल्ड कास्ट फेडरेशन" या त्यांच्या पक्षाचा मुंबई प्रांतातून कुणीही प्रतिनिधी नसल्याने हि शक्यता धुसर वाटत होती. नव्याने तयार होणारे स्वतंत्र भारताचे संविधान हे सर्व अल्पसंख्यांक आणि उपेक्षित समाज समूहासाठी फायद्याचे असले पाहिजे म्हणून सर्व घटकातील प्रतिनिधी त्या समितीत असावे असे त्यांना वाटत होते.
सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या सांगण्यावरून तत्कालीन बॉम्बे प्रांताचे मुख्य मंत्री खेर यांनी बाबासाहेब बॉम्बे प्रांतातून निवडून जाणार नाहीत अशी चोख तयारी केली होती. सरदार पटेल स्वतः आंबेडकरांना कसं रोखता येईल यावर लक्ष ठेऊन होते अर्थात कॉंग्रेस सुप्रीमो कडून आलेल्या या सूचना असतील. डॉ. आंबेडकरांना रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असताना त्यांनी कोंग्रेसी दलित चेहऱ्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली, त्यापैकी एक जगजीवन राम हे होते. कॉंग्रेस ने ज्यांना संविधान आणि कायद्यांचा अभ्यास आहे अशा लोकांना निवडले नाही तर
ज्या लोकांना स्वातंत्र्य लढ्यात कारावास झाला त्या लोकांना समितीसाठी निवडले गेले.
कॉंग्रेस आपल्याला स्वतःहून या समितीत घेणार नाही हे आंबेडकरांना माहीत होते कारण कॉंग्रेस वर जहाल टीका करणाऱ्यांपैकी आंबेडकर हे एक होते. या समितीत कसे जायचे हा विचार सुरु असतानाच डॉ आंबेडकरांच्या पक्षातील जोगेंद्र नाथ मंडल हे बंगाल प्रांतातील सभासद होते, उत्तर बंगाल मध्ये त्यांची बंगाली दलित आणि मुस्लिम यांचा त्यांना पाठींबा होता. त्यांनी बाबासाहेबाना बंगाल मधून निवडून आण्याची जबाबदारी घेतली आणि डॉ आंबेडकर बंगाल मधून निवडणूक लढून निवडून आले.
बाबासाहेब आता बंगाल चे प्रतिनिधी म्हणून संविधान समितीच्या २९६ सभासदांपैकी एक म्हणून ९ डिसेंबर १९४६ च्या पहिल्या संविधान समितीच्या बैठकीत उपस्थित
राहिले. सर्व कॉंग्रेस आणि इतर पदाधिकारीच नाहीत तर ब्रिटीश अधिकारी सुद्धा डॉ आंबेडकरांना संसदेत पाहून आश्चर्यचकित झाले.
डॉ. आंबेडकरांनी पुढील एक वर्ष संविधान निर्मितीतील बैठकींमध्ये आपले अभ्यासपूर्ण मत मांडले,चर्चेत भाग घेतला, या काळात कॉंग्रेस मधील त्यांच्या बऱ्याच विरोधकांना आंबेडकरांना जवळून ओळखण्याची संधी मिळाली त्यांची विद्वत्ता, अभ्यास, मुद्देसूद भाषणे ऐकून ते त्यांचे प्रशंसक झाले, मित्र झाले आणि डॉ. आंबेडकर घटना तयार करण्यात खूप महत्वाचे आहेत हे सर्वांना कळून आले. परंतु ज्या बंगाल च्या प्रांतातून बाबासाहेब संविधान समितीवर गेले होते तो प्रांत बंगालच्या फाळणीत वेगळा केला गेला (कि तशी तजवीज केली नेहरू आणि गांधी यांनी?) त्यामुळे डॉ. आंबेडकरांना जुन १९४७ मध्ये पुन्हा सदर संविधान समितीच्या निवडलेल्या सभासदांमधून बाहेर पडावे लागले.
डॉ. आंबेडकरांच्या जाण्याने खूप मोठं नुकसान होऊ शकतं आणि आपण एका महान, अभ्यासू, हुशार व्यक्तीला गमावून बसू असं खुद्द कॉंग्रेस मधील लोकांना वाटू लागलं. ज्या सरदार वल्लभ भाई पटेल यांनी बाबासाहेबांना १९४६ मध्ये निवडून येऊ नयेत म्हणून प्रयत्न केले त्याच सरदार
पटेलांना बॉम्बे प्रांतातून निवडून आलेल्या जयकर यांना राजीनामा द्यायला लावून त्यांच्या जागी आंबेडकरांना (राज्य सभेवर) घेऊन पुन्हा संविधान समितीच्या कार्यकारिणीत घ्यावे लागले पुढे डॉ. आंबेडकरांना जरी मसुदा समितीचे अध्यक्ष केले तरी त्यावर एक स्वतंत्र घटना समिती बनवली गेली त्याचे अध्यक्ष स्वतः राजेंद्र प्रसाद हे होते जे तयार केलेल्या मसुद्यावर (कॉंग्रेस नेत्यांच्या सहमताने) अंतिम
निर्णय घेत होते. असं असलं तरी स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि समानता तसेच समाजातील सर्व घटकांना त्यांचे हक्क आणि अधिकार बहाल करणारी ३९५ अनुच्छेद आणि ८ अनुसूची (आता १२) असलेली सर्वात मोठी लोकशाही देणारी घटना डॉ. आंबेडकरांच्या अथक परिश्रम, सखोल अभ्यास आणि दूरदृष्टीतून साकार झाली.
२४ जानेवारी १९५० साली स्वतंत्र भारताची राज्यघटना स्वीकारली गेली आणि २६ जानेवारी १९५० रोजी ती अमलात आणली गेली. तसेच हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून घोषित करण्यात आला.
Ref - debate in constitutional assembly 1946
लेखक - अमोल गायकवाड Amol Gaikwad

..तेच खरे दलित साहित्य!

चंद्रपूर येथे ४ मार्च १९८९ रोजी झालेल्या अखिल भारतीय मराठी दलित साहित्य संमेलनाचे उद्घाटन पु. ल. देशपांडे यांच्या हस्ते झाले होते. त्या वेळी पुलंनी केलेल्या भाषणाचे संकलन..
मित्रहो,
दलित साहित्य संमेलनाला जमलेला हा नुसता समुदाय नाही. माणसांच्या गर्दीच्या रूपाने दिसणारी फुले, आगरकर, आंबेडकरांनी जिवाची तमा न बाळगता ज्ञानाग्नीला साक्षी ठेवून केलेल्या तपाला आलेली फळं आहेत. त्यापुढे मला उभं राहायला मिळणं हा मी माझ्या आयुष्यातला धन्यतेचा क्षण मानतो. 'जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत, खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत' या भावनेला दाद देणारा एक मित्र तुम्ही माझ्यात पाहिलात याचं मला समाधान वाटलं.
परंपरेने डोळे मिटून स्वीकारलेल्या साहित्यविषयक, कलाविषयक, समीक्षाविषयक आणि साक्षात vv02इतिहासविषयक कल्पनांना एखाद्या स्फोटासारखा नकार देत विद्रोही साहित्य ज्वालांच्या इंद्रधनुष्यासारखं मराठी साहित्याच्या आकाशात दिसायला लागलं. केशवसुतांच्याच 'परि एक एक जो नवा शब्द तू शिकसी, शक्ती तयाची उलथिल सर्व जगासी' या ओळीचा जबरदस्त प्रत्यय आला. दलित जीवनातल्या दु:खाचं यापूर्वी दर्शन घडलं नव्हतं असं नाही. या बाबतीत माटे मास्तरांचा उल्लेख जरूर करायला हवा; पण हे दर्शन आणि आंबेडकरी प्रेरणेतून उभ्या राहिलेल्या या नव्या कवींनी, कथाकारांनी आणि आत्मचरित्रकारांनी घडवलेले दर्शन यात जमीन-अस्मानाचा फरक होता. आजवर हे दर्शन सद्हेतूनंच घडवलेलं होतं; पण त्यामागं प्रयोजन दलितेतर समाजात दलितांविषयी सहानुभूती निर्माण व्हावी हे होतं. त्या समाजात जुन्या बुरसटलेल्या शोषक जगाला उलथविण्याची शक्ती निर्माण व्हायला पाहिजे, ही आच नव्हती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नवा शब्द शिकवला आणि त्यातून जुनं जग उलथवण्याची शक्ती असते असं साहित्य उभं राहिलं. तो शब्द म्हणजे 'धम्म'. धम्म या शब्दानं समाजात माणसांचं श्रेष्ठत्व आणि ऐहिकता या सर्वात महत्त्वाच्या मूल्यांची प्राणप्रतिष्ठा केली. या नव्या जीवनमूल्यांना त्यांनी 'धम्म' म्हटलं. बाबासाहेबांनी धर्माचा त्याग करून दुसरा धर्म स्वीकारला असं झालं नाही, तर निखळ आणि करुणेचं त्यांना जिथे अपूर्व मिश्रण आढळलं, त्या तत्त्वज्ञानाचा त्यांनी स्वीकार केला.
गावकुसाबाहेर राहणाऱ्यांना गावातला माणूस ठाऊक होता तो आपल्याला रक्त फुटेस्तोवर कष्ट करायला लावून मोठा उपकार केल्यासारखा शिळ्या भाकरीचा तुकडा टाकणारा, आपल्या सावलीलासुद्धा अपवित्र मानणारा असा एक हुकूमशहा एवढंच आणि गावातल्या माणसांच्या लेखी गावकुसाबाहेर राहणारा माणूस म्हणजे दारोदारी झाडलोटीपासून ते मलमूत्रांची घाण उपसण्याची 'नियतं कर्म कुरु' ही साक्षात भगवंताची आज्ञा पाळण्याशिवाय गत्यंतर नसलेला आणि बरेचसे कष्ट नि भूतदयेपोटी घातलेली भीक एवढय़ावर जगणारा एक मनुष्यधारी प्राणी एवढंच ठाऊक असायचं. अशा या उन्मत्तांच्या टाचेखाली रगडल्या जाणाऱ्या माणसाला माणुसकीच्या प्राथमिक हक्कांसाठी लढणारा सैनिक म्हणून उभं करणं हे एक दिव्य होतं. बाबासाहेबांनी ते करून दाखवलं.
चवदार तळ्याचं पाणी सर्वाना वापरायला द्यायची घोषणा म्हणजे बाबासाहेबांनी आंधळ्या रूढी पाळणाऱ्या अमानुषांना निखळ सुंदर माणसं बनण्याची दिलेली एक सुवर्णसंधी होती. आज आपण ज्याला विद्रोही दलित साहित्य म्हणतो, त्याच्या निर्मितीमागची शक्तीही बाबासाहेबांनी जागवलेल्या या आत्मविश्वासातून लाभली आहे, असं मला वाटतं. या घटनेपासून दलित समाजात जे नवचैतन्य निर्माण झाले त्यातूनच आपल्या जीवनाची कथा ही कुठल्याही सहानुभूतीची, दयेची किंवा औदार्याची अपेक्षा न बाळगता रोखठोकपणानं मांडली गेली.
जिथे धर्म, वर्ण, वर्ग या शक्ती माणसाच्या छळासाठी अन्याय्य रीतीने वापरल्या जातात, तिथे त्या प्रवृत्तींचा नाश करायला शस्त्र म्हणून जेव्हा शब्द वापरले जातात त्या क्षणी दलित साहित्याचा जन्म होतो. त्या साहित्यिकाचा जन्म कुठल्या जातीत आणि कुठल्या धर्मात झाला याचा इथे काहीही संबंध नाही. शोषण, उपेक्षा, जन्मावरून उच्च-नीच भेद ठरविणाऱ्या रूढी यांचा बीमोड करायला उठलेलं हे साहित्य फक्त माणुसकीला मानतं. विद्रोहाला मानतं. मग तो विद्रोह स्त्री-मुक्तीविषयक असो, स्पृश्यास्पृश्य भेदाविरुद्ध असो, आदिवासींच्या पिळवणुकीबद्दल असो, भटक्यांच्या जीवनातल्या यातनांबद्दल असो, नरकाची दहशत आणि स्वर्गाची भुरळ घालून फसवणाऱ्या बुवा-बाबांबद्दल असो, या अनिष्ट गोष्टींशी विद्रोहाची भूमिका घेऊन जे साहित्य उभं राहतं ते दलित साहित्य.
जीवनात विज्ञाननिष्ठा न मानता बाबासाहेबांच्या नावाचा उपयोग जपासाठी आणि पूजेसाठी व्हायला लागला, तर एका महान क्रांतीच्या इतिहासातील ती भयानक शोकांतिका ठरेल. बाबासाहेबांसारखा ग्रंथप्रेमी आजच्या काळात लाखात एखादा झाला असेल; पण जीवनातला त्यांचा प्रवास मात्र ग्रंथाकडून ग्रंथाकडे असा झाला नाही. ग्रंथाकडून जीवनाकडे आणि जीवनाकडून ग्रंथाकडे अशी त्यांची परिक्रमा चालली होती. अशी जीवनातून प्रेरणा घेऊन पुन्हा जीवनालाच सार्थ करणारे साहित्य निर्माण करायची प्रेरणा लाभावी, यासाठी या साहित्य संमेलनाचा प्रपंच आहे असं मी मानतो.
(शांता शेळके संपादित आणि परचुरे प्रकाशन प्रकाशित पु. ल. देशपांडे यांच्या 'मित्रहो' या पुस्तकाच्या सौजन्याने)
संकलन- शेखर जोशी
दै. लोकसत्ता

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...