गाईचे आत्मकथन

गाईला कुरवाळत कुरवाळत
वैदिकांची ओळख विचारली
तिने डोळे ताणले, कान टवकारले 
अन् शेपूट हालवून धूम ठोकली
हजारो
हजारो वर्षांची कत्तल डोळ्यासमोर येताच चर्मण्यवतीच्या पाण्यापेक्षाही
तिचे डोळे लाल झाले..
"आम्ही शिकारीत कमी
यज्ञात जास्त मारल्यागेलो "
हे तिने आत्मकथनात लिहिले
माणूस करूणामय असतो
प्राणीमात्रांवर दया करतो
हे तिला ठावुकच नव्हते बुद्धापर्यंत
हे यज्ञयागाच्या धर्मशास्त्रा!
मी लिहित आहे तुझ्या कत्तलीची कविता..
धर्मशास्त्रांच्या अमानुष नोंदी हा डॉ. मच्छिंद्र चोरमारे यांचा 4 था कवितासंग्रह प्रकाशित होत आहे. त्यातील कविता
धन्यवाद- सुरेखा सोडे

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...