जोतिबांचा मार्ग अनुसरला पाहिजे


जोतिबांचा अनुयायी म्हणवून घेण्यात मला यापूर्वी कधीही लाज वाटली नाही आणि आजही वाटत नाही. मी आत्मविश्वासाने आज असे म्हणू शकतो की मीच जोतिबांचा एकनिष्ठ राहिलो आहे, आणि मला खात्री आहे की या देशात जनतेचे सर्वांगीण हित करणारा असा कोणताही पक्ष पुढे आला त्यांनी कोणतेही नाव धारण केले तरी त्यांना जोतिबांचे धोरण, त्यांचे तत्वज्ञान आणि त्यांचे कार्यक्रम घेऊनच पुढे यावे लागेल. तोच एक खरा लोकशाहीचा मार्ग आहे. 

समाजातील ८० % लोकांस विद्या प्राप्ती करणेस न देणे आणि त्यांना सामाजिक, आर्थिक व राजकीय गुलामगिरीत जखडून ठेवणे हे सर्व दिसत असता स्वराज्य, स्वराज्य म्हणून ओरडण्यात काय फायदा ? स्वराज्याचा फायदा सर्वांना मिळाला पाहिजे मागासालेल्या वर्गाच्या सर्वांगीण उन्नतीचा कार्यक्रम घेऊन पुढे आल्याशिवाय कोणताही पक्ष खऱ्या अर्थाने जनतेचे नेतृत्व करू शकत नाही हे सूर्यप्रकाशा एव्हढे स्पष्ठ आहे. 



संकलन - विवेक घाटविलकर
दि. २८ नोव्हेंबर २०१४ क्रांतीसूर्य राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांच्या १२४ व्या स्मृती दिनानिमीत्त विनम्र अभिवादन.

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...