स्त्री आणि जोडवे.....

ती लंगडत लंगडत माझ्याकडे आली.मी विचारलं, तायडे काय झालं? पायाला काही लागलयं का? सोफ्यावर बसत ती म्हणाली, अरे भैय्या,पायातले जोडवे आखुड झाल्यामुळे बोटं।ना इजा झालीय.जो-याचा चिमटा बसलाय. जोडवे जरासे सैल करुन दे ना..! मी पाहीलं तर खरचं बोटं सुजली होती.त्यावर मी म्हटलं, तायडे, तूला ञास होतो ना, मग जोडवेच काढुन टाक. नको घालत जावू. ती-वाटतं तसचं करावं पण सासु आणि नव-याला कदाचीत नाही आवडायचं. म्हणुन.. जराशा हळुवारपणे मी तीच्या पायातले जोडवे काढुन तीच्या हाती दिले. तेव्हा कुठे तीनं सुस्कारा सोडला. त्यावर ती म्हणाली, थोडेसे मोठे करते अन पून्हा घालते.
त्यावर मी म्हटलं, त्यापेक्षा एक कर, तूझ्या नव-याला दे. आठ- दहा दिवस घालुन बघ म्हणावं.म्हणजे त्यालाही त्या जोडव्यं। ची महती पटेल. ती-तू पण ना ! काहीही बोलतोस. पण प्रयोग करायला हरकत नाही. मी-खरेच करुन पहा. जोडव्यातुन तूला मूक्ती मिळेल आणि काही दिवस घालुन पाहील्यानंतर नको असलेल्या रुढी, परंपरेचं ओझं वाटुन तो ही स्वत:ची मुक्तता करुन घेईल.. बघ जमेल तेवढं आधी स्वत:हासाठीच कर.उद्या आपसुकचं ते जगाच्या भल्यासाठी होऊन जाईल...!!
Thank u.. ©जावेदाJindagi (25/2/2015)

शिवरायांचे सच्चे अनुयायी बनु या !!

शिवाजी.. नावासारखे नाव. फक्त तीन अक्षरे. पण तीन शतके उलटून गेल्यावरही हि तीन अक्षरे कानांवर पडल्याबरोबर आपल्या हृदयाची स्पंदने आनंदाने आणि अभिमानाने उत्तेजित होतात. आपल्या नसानसांतून रक्ताचा प्रवाह योध्यांच्या चौखूर उधळलेल्या घोड्यांप्रमाणे वेगाने आणि आवेगाने झेपावू लागतो. कोणती जादू आहे या तीन अक्षरांत? कोणते रसायन आहे या तीन अक्षरांत? खर तर जादू या तीन अक्षरांची नाही. ते रसायन या तीन अक्षरांचे नाही. ती जादू आहे, या तीन अक्षरांचे नाव धारण करणाऱ्या एका उज्वल आणि उदात्त चरित्राची.. ते रसायन आहे एका नैतिक आणि निरामय चरित्राचे.. तो माणसा माणसांना झपाटून टाकणारा प्रभाव आहे, विलक्षण सामर्थ्य आणि सुलक्षण शील यांच्या समन्वयाचा !!
शिवाजी महाराजांनी काय केले ? तर महाराजांनी जे झोपले होते ते जागे केले.. जे जागे होते ते उभे केले.. जे उभे होते ते चालायला लावले.. जे चालत होते ते धावायला लावले आणि जे धावत होते त्यांच्या खांद्यावर स्वराज्याचे निशान दिले आणि स्वराज्य निर्माण केले.
जातीयता मोडण्यासाठी शिवाजी महाराज यांनी आपल्या घोडदल आणि पायदळ तसेच नौदल यात सगळ्या जातीच्या लोकांना स्थान दिले तसेच आपल्या जवळच्या आणि निष्टावान मावळ्यात महार, मांग.. मुसलमान यासह सगळ्याच लोकांची महाराज समानेतेने वागायचे म्हणजे त्यांनी आपल्याला समतेचा पाठ घालून दिला आहे.
आज मात्र शिवाजी महाराज यांचे नाव घेणारे काही जातीवादी लोक भयंकर स्वरुपात जातीयता पाळत आहेत भेदाभेद पाळत आहेत आणि वरून शिवाजी महाराज यांचे नाव घेत आहेत, अशा भामट्या लोकांपासून आज समाजाला खूप मोठा धोका आहे त्यासाठी शिवाजी महाराज यांचे नाव घेणारा माणूस हा जातीयता पाळणारा आणि भेदाभेद पाळणारा शिवाजी महाराज यांचा खरा अनुयायी असूच शकत नाही.
चला तर मग आजपासून शिवाजी महाराज यांची यांची जयंती साजरी करून जातीयता गाढून टाकू आणि महाराज यांनी दिलेला समतेचा संदेश आचरणात आणू या ... (Thank u.. Vinayak Landage)
जय शिवराय… जय जिजाऊ… जय शंभुराजे
छत्रपती शिवाजी महाराज, यांच्या जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा !!

जात प्रतिबंध कायदा.(अॅट्रासिटी अॅक्ट) !!

SC,ST आत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989.
जात प्रतिबंध कायदा हे फार मोठे हत्यार SC, ST यांना दिले आहे. या कायद्यांची प्रखरपणे अंमलबजावनी व्हावी व दलितांवर आन्याय होउ नये यासाठी हा कायदा तयार केला. फक्त जाती वाचक बोलले म्हणजे अॅट्रासिटी लागते आसा गैरसमज आहे पण २१ मुद्द्यावर हे कलम लागू होते. माझा उद्देश असा आहे की लोकांना या कायद्यांची जानीव जागृती व्हावी व गुन्हा करनार्याला कायदा कळावा असे गुन्हे घडणार नाहीत हाच उद्देश.
कलम 3(1)1:- योग्य व अयोग्य पदार्थ खान्या- पिन्याची सक्ती करणे.
कलम 3(1)2:- इजा,अपमान करणे व ञास देने.
कलम 3(1)3:- नग्न धिंड काडने, मानवी अप्रतिष्ठा करणे.
कलम 3(1)4:- जमीनीचा गैर प्रकारे उपभोग करने.
कलम 3(1)5:- मालकीच्या जमिन, जागा पाणी, वापरात अडथळा निर्माण करने.
कलम 3(1)6:- बिगारीची कामे करन्यास सक्ती/भाग पाडणे.
कलम 3(1)7:- मतदान करण्यास भाग पाडणे, धाक दाखवणे.
कलम 3(1)8:- खोटी केस, खोटी फौजदारी करने.
कलम 3(1)9:- लोक सेवकास खोटी माहिती पुरवणे.
कलम 3(1)10:- सार्वजनिक ठिकाणी अपमान करने.
कलम 3(1)11:- महिलांचे विनयभंग करने.
कलम 3(1)12:- महिलेचे लैंगिक छळ करने.
कलम 3(1)13:- पिण्याचे पाणि दुषित करने किंवा घान करने.
कलम 3(1)14:- सार्वजनिक ठिकानी प्रवेश नाकारणे.
कलम 3(1)15:- घर, गांव सोडण्यास भाग पाडणे.
कलम 3(2)1,2:- खोटी साक्षा व पुरावा देने.
कलम 3(2)3:- नुकसान करन्यासाठी आग लावणे.
कलम 3(2)4:- प्रार्थना स्थळ अथवा निवार्‍यास आग लावणे.
कलम 3(2)5:- IPC नुसार 10 वर्ष दंडाची खोटी केस करने.
कलम 3(2)6:- पुरावा नाहिसा करने.
कलम 3(2)7:- लोकसेवकाने कोणताही अपराध करने.
एवढया प्रकारे जात प्रतिबंध कायदा लावता येतो.
फिर्याद नोंदवितांना घ्यावयाची काळजी..
फिर्याद दाखल करावयास आल्यानंतर ठाणेदाराने विना विलंब तक्रार नोंदउन घ्यावी. FIR मध्ये फिर्यादीचे व आरोपीचे नाव, जात, पत्ता काळजी पुर्वक स्पष्ट लिहावा. घटना कोणत्या कारणावरून घडली होती ते स्पष्ट नमूद करावे. फिर्याद उशीरा दाखल केली आसल्यास उशीराचे कारण लिहावे. जातीवाचक शिवीगाळ अथवा दुसरा कोणताही प्रकार आसेल त्याचा स्पष्ट उल्लेख करावा. आरोपीच्या जातीच्या पुराव्यासाठी त्याच्या TC दाखला, पोलिस पाटील, तलाठी, सरपंच, ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र. फिर्यादीची व आरोपीची वैद्यकीय तपासनी करून प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. गुन्हा नोंद झाल्या नंतर त्याच दिवसी जिल्हा पोलीस अधीक्षक , DOS, SDM, तहसिलदार व विशेष जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांना दुरध्वनी/फोन व्दारे संबंधित पोलीस स्टेशनने कळवावे.
जिल्हा समाजकल्याण अधिकारीयांच्याकडे खालील कागदपत्रे त्वरित पाठवावीत...
१) FIR
२) घटणा स्थळ पंचनामा.
३) आत्याचार ग्रसतांचा जातीचा दाखला.
४) अरोपीच्या जाती बाबत TC. तलाठी, ग्रामसेवक यांचे प्रमाणपञ.
५)अत्याचार ग्रसताचा वैद्यकीय तपासनी अहवाल व आरोपपत्र. आथिर्क मदतकसाठी वरील कागलपञ देने/ दाखल गरजेचे आहे.
धन्यवाद- सुप्रभा तायडे

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...