‘IVF’चा प्रवास ‘डिझायनर बेबी’पर्यंत

आयव्हीएफ तंत्रामुळे १९७८मध्ये जगातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी जन्मली. त्याच्या २० वर्षांनंतर, म्हणजे १९९८ मध्ये औरंगाबादेत पहिला टेस्ट ट्यूब बेबी बॉय जन्माला आला. तंत्रज्ञानाच्या अफाट प्रगतीमुळेच 'आयव्हीएफ'चा सक्सेट रेट ७ ते १० टक्क्यांवरून ६० ते ७० टक्क्यांपर्यंत पोहोचला असून, लवकरच विस्तारित पीजीडी तंत्रज्ञानामुळे पाहिजे त्या रंगरूप-उंची-आकार आणि अनुवंशिक गंभीर-दुर्धर आजार-विकार टाळून खात्रीशीर सुदृढ मूल जन्माला घालणे शक्य होणार आहे. पाश्चात्य देशांत हे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. भारतामध्येही अशा प्रकारची 'डिझानर बेबी' नजिकच्या भविष्यात कधीही जन्मू शकते, अशी परिस्थिती आहे. डॉ. रॉबर्ट एडवर्ड व डॉ. पॅट्रिक स्पेप्टो यांच्या अथक परिश्रमातून आणि शंभरपेक्षा जास्त प्रयोग अयशस्वी झाल्यानंतर १९७७मध्ये 'इन व्हिट्रो फर्टिलायझेशन' (आयव्हीएफ) तंत्र यशस्वी झाले आणि १९७८मध्ये लुईस ब्राऊन ही पहिली टेस्ट ट्यूब बेबी लंडनमध्ये जन्मली. १९९८ मध्ये आैरंगाबादेतील पहिली टेस्ट ट्युब बेेबी बॉय जिल्ला हॉस्पिटलमध्ये जन्मला. यासंदर्भात जिल्ला हॉस्पिटलच्या ज्येष्ठ स्त्रीरोग-वंध्यत्वतज्ज्ञ डॉ. मंजू जिल्ला 'मटा'ला म्हणाल्या, 'लुईस ब्राऊनला झालेली दोन्ही मुले ही नैसर्गिक प्रसुतीद्वारे झाली आहेत आणि अशी अनेक उदाहरणे आहे. त्यामुळे आयव्हीएफ तंत्राचा कुठलाही दुष्परिणाम होत नसल्याचे स्पष्ट झाले. पाश्चात्य महिलांमधील 'फॅलोपियन ट्यूब'च्या मोठ्या समस्येमुळे या तंत्राला प्रचंड मागणी होती व तंत्रज्ञान झपाट्याने विकसित गेले. स्त्री बिजकोषामध्ये थेट शुक्राणू सोडण्याच्या 'इक्सी' तंत्राने सक्सेस रेट वाढला. 'पीजीडी' तंत्रज्ञानाने शंभर टक्के निर्दोष गुणसूत्रांची निवड करणे शक्य झाले असून, त्यामुळे सक्सेस रेट ६० ते ७० टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. अर्थात, लॅबमधील अत्युच्च तंत्रज्ञान, तज्ज्ञांवर सक्सेस रेट अवलंबून असून, सर्वसाधारणपणे भारतात ५० टक्क्यांपर्यंत हा रेट आहे. आता तर जन्माला येणाऱ्या मुला-मुलीचा अपेक्षित रंग-केशरचना-उंची व इतर शरीररचनाही तीन प्रकारच्या पीजीडी तंत्रामुळे शक्य झाले आहे.'

इक्सी, लेझर अॅसिस्टेड तंत्र, लॅबमधील क्लास १०० तंत्र, औषधी-इंजेक्शनमुळे सक्सेस रेट ५० टक्क्यांपर्यंत आणणे शक्य झाले आहे. अर्थात, अजूनही तंत्रज्ञान विकसित होण्यास मोठा वाव आहे. वंध्यत्वाचे प्रमाण वाढत असताना हे तंत्रज्ञान मानवासाठी कल्याणकारी ठरत आहे.

ज्या गोष्टींचे जगाला काहीच नवल वाटत नाही अशा गोष्टींना भारतात डोक्यावर घेतले जाते.

इंग्रजी :-
जगात कुठेही नसेल इतके महत्व भारतात इंग्रजी भाषेला दिले जाते इंग्रजी बोलता येत नसेल तर तो अडाणी समजला जातो ... अरेरे !!!
गोरेपणा : -
गोरेपणाला भारतीय मुर्ख मंडळी एवढे भुललेत की या गोष्टीचा फायदा घेउन काही नामवंत कंपन्या गोरे बनवन्याच्या क्रिम तयार करुन दरवर्षी हजारो कोटी रुपये कमवतात !
रिअॅलिटी शो :-
यात तर सगळं ठरवुन केलं जातं आणि भारतीय मुर्खासारखे खरं समजुन बघत बसतात ! त्यामुळे वास्तविक खरोखर असणारे कलाकार पडद्यामागेच राहतात हेच खुप मोठे दुर्दैव आहे !
लग्नसमारंभ :-
बडेजाव आणि प्रतिष्ठा दाखवण्याचा सर्वात मोठा मार्ग काही मुलींच्या बापांना तर मुलगीच्या विदाई पेक्षा दिखावा महत्वाचा वाटतो !
इंजीनियरिंगची पदवी :-
७० % मुलांच्या बापांना आपल्या मुलाने समाजसेवक, नामवंत खेळाडु, देशभक्त बनन्यापेक्षा इंजीनियरिंग पदवी मिळवुन श्रीमंत बनावं असेच वाटते. बाकीच्या क्षेत्रात नोकरी करणे काय पाप आहे का ??
क्रिकेट :-
भारतात क्रिकेट हा खेळ नसुन धर्मच मानुन त्याची पुजा केली जाते ! लाखोंची सट्टेबाजी चालते ! भारतातील इतर अनेक खेळांना जगात डिमांड मिळते भारतात फक्त क्रिकेटच पाचवीला पुजलाय !
सोने -
जगात ज्या सोन्याचा सर्वांना कंटाळा येतो तेच सोने मिळवण्यासाठी भारतीय महिला जणु काय शपथच घेउन बैसल्यात ! त्याच सोन्याची भारतात जीवघेणी चोरी सुद्धा होते वा काय छान दुर्दैव आहे !
लोक काय म्हणतील ?
हे केले तर लोक काय म्हणतील... ते खाल्ले तर लोक काय म्हणतील... हे कपडे घातले तर लोक काय म्हणतील.... अरे काय चाललय ?? लोकांच्या म्हणण्याने चालाल तर मुर्ख बनाल ! आत्महत्या करणारे पऩ हाच विचार करतात लोक काय म्हणतील ??? मी तर यांना आर्धवटच म्हणतो
बोर्डाची परिक्षा :-
जगात कुठे इतके महत्व दिले जात नाही येवढे भारतात बोर्डाच्या परिक्षेला महत्व दिले जाते ! किती तरी मुलं तर बोर्डाची परिक्षा ऐकुनच येवढे घाबरतात की ते परिक्षेला सुद्धा जात नाहीत
परदेशी ब्रँड : -
ज्या वस्तु परदेशात कचर्यात टाकुन दिल्या जातात त्या गोष्टी भारतात लाखों रुपये मोजिन खरेदी केल्या जातात ! जे पदार्थ परदेशात जनावरांना खायला देतात तेच पदार्थ भारतात कधी कधी माणसांच्या नावावर खपवले जातात... कसले हे दुर्दैव !
भारतातील ज्या इतिहासाचा जगात आदर्श घेतला जातो तोच इतिहास भारतात चुकीचा आणि खोटा सिद्ध केला जातो !
कमाल आहे राव...

पुरूषांनो, एव्हढं करून दाखवा !

एव्हढं करून दाखवा,
पुरुषांनो, एव्हढं करून दाखवा
दरवर्षी शब्दांची तीच फोलपटं सांडवण्यापेक्षा
आमच्यासाठी....एव्हढं करून दाखवा
एका तरी पुरूषाने... .सती जाऊन दाखवा
आवडत्या(?) बायकोसाठी
बघायचंय आम्हाला
खाली जाळ लागताच.... बुडाला
कसे येताय केकाटत; टुण्णदिशी उडी मारून
सरणावरून, पेटलेले बुड घेऊन
हात जोडत; ही रूढी बदलण्यासाठी
एक करून दाखवा
आपल्या लाडक्या(?) लेकीला
स्वतः जन्म देऊन दाखवा... एकदातरी पुरुषाने
बघायचंय आम्हाला
कसे बोंबलत ठणाणा; मरणप्राय कळांनी
सहन करताय ते....की उलट
हात जोडत रडताय...नशीबाजवळ
हा निसर्गनियम बदलण्यासाठी
एक करून दाखवा
ईतिहासात जाऊन... थोबाडीत मारून दाखवा
युधिष्ठीराच्या आणि... समस्त पुरूषी बिनडोकांच्या
पत्नीपेक्षा धर्म श्रेष्ठ; हे ढोंग उगाळल्याबद्दल
करून दाखवा शीर धडावेगळे; दु:शासनाचे
त्याचवेळी.... वस्त्रे पुरवण्यापेक्षा
बघायचीय; तुमची मर्दुमकी(?) आणि प्रेम
एक करून दाखवा
झोपला असाल किंवा नसाल.... कोणा दुसरीसोबत
तरी..... वनात जाऊन दाखवा; काही वर्षं तरी
किंवा अग्नीपरिक्षा..
धोब्याने सर्टीफिकेट दिले तरी; आमच्यासाठी
बघायचंय आम्हाला....तुमचा त्याग, समर्पण
तडफड; आमच्यासाठी
आणि, नसाल करू शकत हे
ढोंग्यांनो; तर बंद करा हे नाटक
भाट बनून, एका दिवसापुरते..... थोतांड!
दिनाबिनाचे..... नाही गरज आम्हाला
या गायपोळ्याची..... आमच्या जन्मजन्मांच्या जखमांवर
शब्दांची झूल पांघरण्याची
माहित आहे आम्हाला; आमचे मोठेपण, महती
आम्ही आहोत; समर्थ आता....जगण्यास, जगवण्यास
आणि एक करून दाखवा
हे शेवटचे;
टाका हा ईतिहास गाडून; टाका त्या पोथ्या जाळून
करा तर्पण मूर्ख रूढ्यांचे, जाळा मढे अक्कलशून्य परंपरांचे
आणि द्या साथ; आम्हाला एक मित्र म्हणून
जगण्याच्या समान हक्कासाठी
निदान एव्हढे तरी
कराल ना....
आमच्यासाठी?
कवी- उमेश कोठीकर .

स्त्रिया

एक स्त्री आपल्या पर्समधून एक फुटकळ नोट काढून कंडक्टरकडून घरच्या परतीचे तिकीट मागत आहे
तिच्यावर अगदी आत्ताच ,काही वेळापूर्वी झाला आहे बलात्कार
त्याच बसमध्ये एक दुसरी स्त्री आपल्यासारख्याच लाचार
समवयस्क दोन-तीन स्त्रियांशी
पदोन्नती आणि महागाई भत्त्याविषयी बोलते आहे
कार्यालयातील तिच्या वरिष्ठांनी तिला आज पुन्हा मेमो दिला आहे
एक स्त्री जिने अखंड सौभाग्यवती राहण्यासाठी ठेवले आहे
करवा चौथचे निर्जल व्रत
ती पती वा सासूच्या हातून मारले जाण्याच्या भीतीने गाढ झोपेतूनच
किंचाळत उठते अचानक
एक स्त्री अर्ध्या रात्री बाल्कनीत उभी आहे बघत वाट
आपल्यासारख्याच असुरक्षित आणि असहाय कुण्या दुसऱ्या स्त्रीच्या घरून
परतणाऱ्या आपल्या दारुड्या नवऱ्याची
संशय-शंका , असुरक्षितता आणि भीतीने वेढलेली एक स्त्री मार खाण्याआधी
अतिशय दबल्या आवाजात विचारते आहे आपल्या नवऱ्याला की -
कुठे खर्च झाले तुमच्या पाकिटातल्या पगारातील अर्ध्यापेक्षा जास्त पैसे?
एक स्त्री आपल्या मुलाला आंघोळ घालताना रडू लागते उगीचच
हमसून हमसून
आणि मुके घेते त्याचे वेड्यासारखे पटापटा
आणि शोधू पाहतेय त्याच्या भविष्यात आपल्यासाठी एखादे शरणस्थळ
किंवा एखादी गुहा
एका स्त्रीचे हात पोळले आहेत तव्यात
एकीवर तेल पडले आहे कढईतले उकळते
इस्पितळात हजार टक्के भाजलेल्या स्त्रीचा कोळसा नोंदावातोय
आपल्या मृत्युपूर्व जबानीत की-कोणीही जाळले नाही तिला
तिच्याशिवाय बाकी सगळेच आहेत निर्दोष
अगदी चुकून तिच्याच हातून फुटले तिचे नशीब आणि भडकला स्टोव्ह
एक स्त्री नाकातून ओघळणारे रक्त पुसत बोलतेय
शपथ घेऊन सांगते ,माझ्या भूतकाळात कुठेच नव्हते प्रेम
तिथे होती एक पवित्र ,शतकांएवढी जुनाट धगधगती भयाण शांतता
ज्यात झिजत राहिला फक्त तुमच्याचसाठी माझा देह
एका स्त्रीचा चेहरा संगमरवरासारखा पांढराफटक
तिने कदाचित कुणालातरी सांगितले आहे आपले दु:ख किंवा तिच्या
हातून हरवला आहे एखादा दागिना
एक छताच्या वाशाला बांधते आहे ओढणी
तिच्या प्रियकराने सार्वजनिक केले आहेत तिचे फोटो आणि पत्र
एक स्त्री फोन पकडून रडतेय
एक स्वत:शीच बरळत कुठल्याशा भावनातिरेकात पळतच येते बाहेर
रस्त्यावर
अस्ताव्यस्त केसांसह , कोणत्याही कपड्यांविना
काही स्त्रिया बस स्थानकांवर किंवा रेल्वे फलाटांवर उभ्या आहेत विचारत
की त्यांना कोणत्या गाडीत बसून कुठे जायचे आहे या जगात
एक स्त्री हतबल होऊन म्हणते आहे की-तुला जे करायचे आहे माझ्याशी
ते कर पण मला कसं तरी जगू दे फक्त
एक सापडलीये मेलेली … शहराच्या अगदी गजबजलेल्या बागेत
आणि तिच्या शवापाशी बसून रडतो आहे तिचा दीड वर्षांचा मुलगा
तिच्या झोळीत मिळते दुधाची एक रिकामी बाटली ,
प्लास्टीकचा एक छोटासा पेला
आणि हिरव्या-पिवळ्या रंगाचा एक चेंडू
ज्याला हलवल्यावर आताही येतो आहे त्यातून
खुळखुळयासारखा आवाज
एक स्त्री जी यासिडने भाजली आहे,खूश आहे किमान वाचला आहे
तिचा उजवा डोळा
एक स्त्री तंदूर भट्टीत जळताना आपली बोटे हलवते आहे हळूहळू
ती चाचपून पाहते आहे बाहेरचा अंधार
एक फरशी पुसते आहे
एक भांडी घासते आहे
एक कपडे धूत आहे
एक मुलाला पोत्यावर झोपवून रस्त्यावर खडी पसरवते आहे
एक फरशी पुसता पुसता बघतेय राष्ट्रीय च्यानेलवरची फ्याशन परेड
एक वाचतेय बातमी की संसदेत वाढणार आहे त्यांची टक्केवारी
एका स्त्रीचं काळीज जे लप्पकन पोत्यातून पडलं आहे बाहेर
सांगतं आहे-फेकून कुठल्या तरी नाल्यात मला,लवकर परत ये
मुलांना शाळेसाठी उठवायचं आहे लवकर
नाश्ता त्यांना जरूर दे,कणिक मी मळूनच आले होते
राजधानीतल्या पोलिस चौकीच्या गेटवर बसल्यात दोन स्त्रिया जमिनीवर
एकमेकीला बिलगून गुपचूप
पण साऱ्या ब्रम्हांडात घुमतो आहे त्यांचा हाहाकार
हजारो लाख्खो दडून बसतात गर्भाच्या अंधारात
या जगात जन्म घ्यायला नाकारत
तिथेही त्यांना शोधून काढतात हेर ध्वनितरंग
तिथेही,जाते हत्यारी कट्यार स्त्री-अर्भकाच्या आरपार .

-उदय प्रकाश
अनुवाद-राहुल कोसंबी ,मुक्त शब्द एप्रिल २०१३' मधून

मुसलमान समाजात देखील खूप मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा आहेत

मुसलमान समाजात देखील खूप मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा आहेत आणि त्या अज्ञानापायी जोपासल्या जातात अनेक दर्ग्यात असले प्रकार आपल्याला पाहायला मिळतात त्यापैकीच एक म्हणजे एका बोटाने दगड उचलला जाणे होय, भक्तांनी केवळ आपले बोट लावले तरी तो दर्ग्यातला दगड उचलला जातो हा प्रकार करीम आली दर्ग्यात साताऱ्यात होत होता त्याची पोलखोल शेवटी अंनिस ने केली.. त्यात सामील असणारे बदमाश मात्र दगडाला बळ लावत असतात आणि भक्ताला वाटते केवळ एका बोटाने मोठा दगड उचलला जातोय... हीच आहे भोंदुगिरी..
अंधश्रद्धा सर्वच धर्मात आहेत... हल्ली प्रबोधानात जो निकष हिंदू धर्माला लावला जातो... तो इतर कूठल्या धर्माला लावला जात नाही त्यामुळे एका धर्मातील अंधश्रद्धेबद्दल बोलणं बरोबर नाही.. जेव्हा शिकलेला माणूस अशा गोष्टीवर श्रध्दा ठेवतो तेव्हाच ती अंधश्रद्धा होते.. चिकीत्सा ही सर्व धर्मांची झाली पाहीजे... जसे आपण हिंदू धर्मपुराणकथा, हे सर्व थोतांड आहे असे म्हणतो... अश्याच प्रकारचे थोतांड हे मुस्लीम-खिश्चन इतर धर्मात आहे.. त्याविरूद्ध बोलण्याची धमक सुद्धा आपणात असावी.. अन्यथा हे बेगडेपणच ठरेल...

अंधश्रद्धा सर्वच धर्मात आहे. कट्टरता देखील सर्वच धर्मात आहे. पण प्रत्येकाला वाटत की आपल्या धर्मातील अंधश्रद्धा फारशी घातक नाही पण दुसऱ्या धर्मातील अंधश्रद्धा मात्र फार घातक आहे त्यामुळे बहुतेक जण दुसऱ्या धर्मातील अंधश्रद्धेवर बोलतो.. माझाच धर्म सर्वश्रेष्ठ ही जगातील सर्वात मोठी अंधश्रद्धा !!
Dr tambe, Sattar Shaikh, sakya nitin, vaibhav kokat, nikesh jithe.

ताराबाई बापूजी शिंदे (१८५० - १९१०)

स्त्रीवादी दृष्टिकोनातून आपल्या संस्कृतीचा तर्कशुद्धपणे वेध घेणारी, स्त्री-पुरुष समानतेचा विचार मराठीतून सर्वप्रथम स्पष्टपणे मांडणारी एकोणिसाव्या शतकातील विचारवंत स्त्री म्हणून ताराबाई शिंदे परिचित आहेत. विधवांच्या प्रश्नांविषयी, पुनर्विवाहाविषयी आणि एकूणच त्या काळातल्या स्त्रियांच्या प्रश्नांविषयी त्यांनी अतिशय कणखर भाषेत मांडलेले विचार 'स्त्री-पुरुष तुलना' या ग्रंथातून १८८२ साली प्रसिद्ध झाले. काळाच्या बरंच पुढे जाऊन केलेलं, पुरुषी मानसिकतेवर घाव घालणारं त्यांचं हे लेखन त्या काळात प्रचंड खळबळ माजवणारं ठरलं. स्त्रीशिक्षणाचा फारसा प्रसार न झालेल्या त्या काळात ताराबाई शिंदे यांच्यासारख्या मराठा समाजातील एका स्त्रीने समाजाच्या ज्वलंत प्रश्नासंबंधी इतक्या परखडपणे आपले विचार या ग्रंथातून मांडावेत, ही अपवादभूतच कृती होती.
ताराबाई शिंदे यांचा जन्म वऱ्हाड(विदर्भ) प्रांतातील बुलठाणी(बुलढाणा) येथे एका सधन कुटुंबात झाला. त्यांचे वडील बापूजी हरी शिंदे हे श्रीमंत जमीनदार होते, तसेच ते डेप्युटी कमिशनरच्या कार्यालयात हेडक्लार्कची नोकरीही करत होते. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या 'सत्यशोधक समाजा'चेही ते कार्यकर्ते होते. त्यामुळे या चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांची त्यांच्या घरी ऊठबस असायची. बापूजी शिंदे यांना ताराबाई ही एकुलती एक कन्या आणि चार पुत्र होते. जन्मजात बुद्धिमान असलेल्या ताराबाई वडिलांच्या खूप लाडक्या होत्या. त्या काळाचा विचार करता ताराबाईंना त्यांच्या वडिलांनी चांगल्यापैकी शिक्षण दिल्याची नोंद आहे, पण त्यांचं नक्की शिक्षण कितपत झालं याची माहिती उपलब्ध नाही. ताराबाईंना मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत या भाषांचं उत्तम ज्ञान होतं. त्यांचं वाचन चौफेर होतं. त्या काळातली महत्त्वाची मराठी, इंग्रजी वृत्तपत्रं त्या नियमितपणे वाचत असत. महाकाव्यं, संस्कृत नाटकं, धर्मग्रंथ, काव्यग्रंथ यांचंही त्या भरपूर वाचन करीत. या वैविध्यपूर्ण वाचनामुळे त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत गेल्या, प्रगल्भ होत गेल्या.
ताराबाईंना लग्न करायची फारशी इच्छा नव्हती, परंतु त्या काळच्या चालीरीतींना अनुसरून त्यांच्या वडिलांनी त्यांचं लग्न ठरवून त्यांना घरजावई आणला. पण थोड्याशा अनिच्छेनेच केलेल्या या विवाहामुळे ताराबाईंना संसारसुख काही मिळालं नाही. त्यांना मूलही झालं नाही. त्यातच त्यांचं घराणं खानदानी असल्यामुळे त्यांच्याकडे गोषापध्दती होती. ती मात्र त्यांनी जुमानली नाही. कारण मुळातून त्या करारी, धाडसी आणि निर्भीड स्वभावाच्या होत्या. गावात आणि परिसरात त्यांचा दरारा होता. कोर्टकचेरीच्या कामासाठी त्या घोड्यावर बसून जात असत. शेतीचीही देखभाल त्या करीत. उत्तरायुष्यात त्यांना वैधव्य प्राप्त झालं; पण त्या काळातल्या प्रथेप्रमाणे 'सांदीचं खापर' होऊन जगण्याचं त्यांनी नाकारलं. अशा त्यांच्या धाडसी कृत्यांना त्यांच्या वडिलांनीही पाठिंबा दिला.
दरम्यानच्या काळात सुरत येथील विजयालक्ष्मी नामक ब्राह्मण विधवेने व्यभिचार करून गर्भपात केला म्हणून सुरत न्यायालयाने या विधवेला फाशीची शिक्षा सुनावली होती. तिने मुंबई न्यायालात अपील केल्यानंतर ही शिक्षा पाच वर्षांच्या सक्तमजुरीत बदलण्यात आली. 'टाइम्स ऑफ इंडिया' वृत्तपत्राच्या २६ मे १८८१ रोजीच्या अंकातील ही बातमी आणि त्यानंतर 'पुणेवैभव'सारख्या सनातनी वृत्तपत्रांनी स्त्रीजातीविरुद्ध उठवलेली टीकेची झोड या गोष्टी ताराबाईंना 'स्त्री-पुरुष तुलना' अथवा 'स्त्री आणि पुरुष यांत साहसी कोण' हे स्पष्ट करून दाखविणारा निबंध लिहिण्यासाठी निमित्त ठरल्या. नोव्हेंबर-डिसेंबर १८८१ मध्ये त्यांनी लेखनाला सुरुवात केली, आणि पुढे १८८२ मध्ये पुण्यातील शिवाजी छापखान्यात छापून हा बावन्न पानी निबंध पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला. हे पुस्तक प्रकशित होताच तत्कालीन समाजात एकच खळबळ उडाली. भारतीयच नव्हे तर जागतिक पातळीवर स्त्रियांच्या व्यथा-वेदनांना प्रथमच वाचा फोडणाऱ्या या ग्रंथावर त्या काळातल्या सनातनी विचारांच्या लोकांनी टीकेची प्रचंड झोड उठवली; पण थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले यांनी १८८५ मध्ये 'सत्सार'च्या दुसऱ्या अंकात या ग्रंथावर विस्तृत लेख लिहून ताराबाईंच्या विचारांचं जाहीर समर्थन केलं.
वरील विधवेची शोकांतिका ताराबाईंना हा ग्रंथ लिहिण्यासाठी निमित्त ठरली असली, तरी या निमित्ताने एकूण स्त्रीजातीवर घेतल्या जाणाऱ्या अनेक आक्षेपांचं खंडन करण्याच्या व्यापक हेतूनेच त्यांनी लेखणी उचलली, हे त्यांच्या या ग्रंथासाठी त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतून स्पष्ट होतं. त्यात त्या म्हणतात, ''…रोज पुरुषांचे साहस, धाडस व दगाबाजीची नित्य नवी भयंकर उदाहरणे दिसून येत असताही तिकडे कोणीच लक्ष न देता स्त्रियांवरच सर्व दोषांची गोणी लादतात, हे पाहून स्त्रीजात्याभिमानाने माझे मन अगदी खळबळून, तळतळून गेले. त्यामुळे मला निर्भीड होऊन असेच खडखडीत लिहिल्यावाचून राहवेना.'' कोण्या एखाद्या स्त्रीच्या हातून एखादा प्रमाद घडला की तिच्यावर अनेक कुत्सित आक्षेप घेण्याच्या व बायका या जात्याच घातकी आणि निसर्गत:च अनैतिकतेकडे कल असणाऱ्या असतात, असे ताशेरे झोडणारी त्या काळच्या समाजव्यवस्थेतील पूर्वापार चालत आलेली वृत्तीच सनातनी वृत्तपत्रांतील टीकेच्या रूपाने प्रकट झाली होती. या निबंधात ताराबाईंनी या वृत्तीचा परखड शब्दांत समाचार घेतला. स्त्रियांना दिले जाणारे सारे दोष स्त्रियांपेक्षा पुरुषांतच कसे जास्त आहेत आणि काही स्त्रियांत असे दोष आढळले तरी ते पक्षपाती शास्त्रनिर्बंधांमुळे, निर्दयी रूढींमुळे आणि प्रचलित पुरुषसत्ताक व्यवस्थेमुळेच कसे निर्माण झाले आहेत हे त्यांनी या ग्रंथात स्त्री आणि पुरुष यांची पदोपदी तुलना करून सप्रमाण मांडले. बाईचं पाऊल वाकडं पडतं याला पुरूषच बहुधा जबाबदार असतात, असा युक्तिवाद करताना त्या म्हणतात, ''टाळी एका हाताने वाजत नाही, पण त्यातून उजवे हाताचा जोर जास्त असतो.''
पुनर्विवाहाविषयी त्यांनी म्हटलंय, ''पुनर्विवाह न करण्याची चाल महारोगाप्रमाणे अनेक ठिकाणी व जातींत पसरली आहे. त्यामुळे किती लाखो व कोट्यवधी स्त्रिया वैधव्याचे असह्य दु:ख कसकसे भोगीत असतील व भोगतील व त्यापासून कसकसे अनर्थ होत आहेत व होत असतील याची कल्पनासुद्धा करिता येत नाही.'' वैधव्य आलेल्या स्त्रीचं दु:ख मांडताना त्या पुढे म्हणतात, ''वैधव्याचे गाठोडे पदरात बांधून आपल्या भर्त्याचे गुण-अवगुण वाणीत व सर्व घरच्या-दारच्यांचा जाच काढीत मरून जातात.'' पुनर्विवाहबंदीमुळे तरुण विधवांचे पाऊल वाकडे पडून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात भृणहत्या घडताहेत. एकट्या पुणे जिल्ह्यात पाच वर्षांत किमान एक हजार भृणहत्या होत असाव्यात असा अंदाज त्या काळात लोकहितवादींनी सरकारकडे पाठवलेल्या एका पत्रात व्यक्त केला होता. ताराबाई शिंदे यांनी व्यक्त केलेल्या भीतीला लोकहितवादींच्या या पत्रामुळे बळकटीच मिळते.
पुनर्विवाहबंदी तर्काला आणि वास्तवाला धरून कशी नाही हे स्पष्ट करताना त्या विचारतात, ''अरे, नवऱ्याआधी बायकोने मरावे किंवा नवऱ्याने बायकोआधी मरावे याचा तुमच्या बापजाद्यांनी देवांपासून काही दाखला आणला काय रे? मरणे किंवा जगणे हे तर त्या सर्व शक्तिमान नारायणाचे हाती.'
'एकदा सौभाग्य गेले म्हणजे स्त्रियांनी आपली तोंडे अगदी एखाद्या महान खुण्यापेक्षाही महाजबर अपराध्याप्रमाणे काळी करून सर्व आयुष्यभर आंधारकोठडीत राहावे?' हे त्यांना मान्यच नाही. पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेत अस्तित्वहीन झालेल्या स्त्रीला जगणं कसं अवघड होऊन बसलंय याविषयी त्यांनी अनेक मुद्दे या ग्रंथात मांडले आहेत. ही परिस्थिती बदलण्याची वेळ आली आहे असे सांगून न थांबता इंग्रज सरकारने विधवा पुनर्विवाहाचा कायदा करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
स्त्रीविषयी असलेल्या जातिवंत पोटतिडकीतूनच त्यांनी हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथातून ताराबाई शिंदे यांची बहुश्रुतता, समतोल विचार आणि शास्त्रीय दृष्टिकोन प्रकर्षाने समोर येतात. या ग्रंथात पोथ्या-पुराणांतील अनेक दाखले त्यांनी खऱ्याखोट्याची पारख करून, चिकित्सा करून दिले आहेत. यावरून ताराबाईंच्या चौफेर आणि चौरस वाचनाचा प्रत्यय येतो. त्या काळातल्या लोकप्रिय कथा-कादंबऱ्याही त्यांनी डोळसपणे वाचल्या होत्या. त्यातील पुरुषी मानसिकतेतून लिहिल्या गेलेल्या 'मुक्तामाला', 'मंजुघोषा', 'मनोरमा', 'विदग्ध स्त्रीचरित्र' आदी पुस्तकांत आलेल्या स्त्रियांच्या कामविव्हल प्रतिमाचित्रणावर त्यांनी आक्रमक हल्ले चढवले. त्यातील वर्णनं काल्पनिक, अवास्तव आणि स्त्रियांची बदनामी करणारी आहेत, असं परखड मत त्यांनी आपल्या लिखाणातून मांडलं.
'स्त्री-पुरुष तुलना' या ग्रंथात ताराबाई शिंदे यांनी वापरलेली भाषा आक्रमक आणि परखड असली तरी स्त्रीस्वातंत्र्याचा किंवा स्त्री-पुरुष समानतेचा अनिर्बंध पुरस्कार त्यांनी केलेला नाही. त्याचप्रमाणे पुरुषांना एकांगी दोषही दिलेला नाही.
या ग्रंथाची शैली अतिशय ओघवती आहे. या लिखाणाला परिणामकारकता आली आहे ती त्यांच्या जीवनानुभवाच्या परिघातीलच उपमानसृष्टीमुळे आणि त्या काळात स्त्रियांच्या तोंडी प्रसिद्ध असलेल्या अनेक लयदार म्हणी आणि वाक्प्रचार यांचा वापर केल्यामुळे. 'स्त्री-पुरुष तुलना' या मौलिक ग्रंथामुळे मराठीतील आद्य स्त्री लेखिका होण्याचा बहुमान मिळवलेल्या, लेखनाचे सुप्त गुण असलेल्या ताराबाई शिंदे यांनी नंतरच्या काळात काहीच लेखन कसं केलं नाही, हा प्रश्न मात्र अनाकलनीय आहे.
अधिक वाचनासाठी –
१. ताराबाई शिंदे-लिखित स्त्री-पुरुष तुलना (संपादक – विलास खोले), प्रतिमा प्रकाशन
२. ताराबाई शिंदे-कृत स्त्री-पुरुष तुलना (संपादक – डॉ. स. गं. मालशे), मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय
लेखन - महेंद्र मुंजाळ, युनिक फीचर्स.

सलाम अशा शिक्षकांना

रात्रशाळेत उजेड आणता-आणता ‘त्यांच्या’ आयुष्यात काळोख!
शाळेचे मुख्याध्यापक, क्लार्क अन् साफसफाई करणारे शिपाईही तेच, अशी तिहेरी भूमिका पार पाडणारे महापालिका रात्रशाळेतील प्रभारी मुख्याध्यापक एस. एच. काझी हे गेल्या २० वर्षांपासून २३९६ रुपये इतक्या तुटपुंज्या पगारावर राबत आहेत. सध्या शासनाच्या वतीने शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी धडपड सुरू आहे; तर दुसरीकडे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धडपडणारे काझी यांची मात्र महापालिकेच्या उदासीन भूमिकेमुळे परवड होत आहे.
कोल्हापुरात १९६१ मध्ये महापालिकेच्या राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या इमारतीत कर्मवीर भाऊराव पाटील रात्र प्रशालेची सुरुवात झाली. येथे आठवी ते दहावीपर्यंत सायंकाळी सात ते दहा वेळेत वर्ग भरतात. या शाळेत १९९५ ला एस. एच. काझी हे सहायक शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यावेळी शासनाच्या अनुदानासह आठवी ते दहावीपर्यंतच्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या चांगली होती. एक मुख्याध्यापक, पाच शिक्षक, एक लिपिक, दोन शिपाई असा स्टाफ होता. मात्र, या शाळेकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत गेले. शाळेच्या खर्चाचे वेळेत कधी लेखापरीक्षणच केले गेले नाही. त्यामुळे अनुदानाची रक्कम जमा होणे बंद झाले. सर्व गोष्टींवर याचा परिणाम होऊ लागला. यादरम्यानच काही शिक्षक, लिपिक व शिपाईही निवृत्त झाले.
पर्यायाने २००८ ला एस. एच. काझी यांची प्रभारी मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र, ते शाळेत एकमेव उरल्याने त्यांच्यावरच कामांची सर्व जबाबदारी आली. आपण शाळा सोडून गेलो तर शाळाच बंद पडणार, ही गोष्ट लक्षात घेऊन त्यांनी गेली आठ वर्षे पडेल ते काम करीत शाळा टिकविण्यासाठी धडपड सुरू केली. त्यांनी प्रथम शाळेचे लेखापरीक्षण करून घेतले. त्यामुळे २८ लाखांचे अनुदान मंजूर झाले. मात्र, अनुदान घेण्यासाठी लागणाऱ्या काही अटींची पूर्तता महापालिका प्रशासनाने न केल्यामुळे अनुदान शाळेला मिळालेच नाही. महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने काझी नियमित महापालिका प्रशासनाकडे अनुदानाच्या अटींची पूर्तता करण्यासाठी धाव घेत आहेत. मात्र, त्यांची कोणीच साधी दखलही घेत नाहीत. यावर्षीच्या सुरुवातीपासून (२९ जानेवारी २०१५) सुभाषनगर येथील संत रोहिदास विद्यामंदिर येथे ही शाळा भरत आहे.
या शाळेत सध्या २२ विद्यार्थी आहेत. ८ वीमध्ये ६, ९वीमध्ये ११ व १० वीमध्ये ५ विद्यार्थी शिकत आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये हॉटेल, सेंट्रिंग कामगार व रिक्षाचालकांचा समावेश आहे. १९९४-९५ पर्यंत प्रत्येक वर्गात सरासरी ३८-४० विद्यार्थी असायचे. २०१०-११ दरम्यान ही संख्या १५ ते १६ वर येऊन थांबली. शिक्षकांची संख्या कमी झाल्याने विद्यार्थी संख्याही घटत गेली.
काझी यांनी मराठी, हिंदी आणि समाजशास्त्र या तीन विषयांतून एम.ए. पूर्ण केले आहे. तसेच एम. एड., एम. फिल. या पदव्युत्तर पदव्याही घेतल्या आहेत. तसेच पुणे येथून ‘हिंदी पंडित’ ही पदवीसुद्धा त्यांनी घेतली आहे. तरीही काझी यांना गेली वीस वर्षे महिन्याला फक्त दोन हजार ३९६ रुपये इतकाच पगार मिळतो. शाळा उघडण्यापासून ती झाडणे, विद्यार्थ्यांना शिकविण्यापासून त्यांची शैक्षणिक कागदपत्रे तयार करण्याचे काम ते एकटेच करीत आहेत.
काझी शाळेच्या अनुदानाच्या कामासाठी जिल्हा परिषद किंवा महानगरपालिकेतील कोणत्याही कार्यालयात गेल्यानंतर त्यांची ‘नाईट स्कूल आले’ असे संबोधून टर उडविली जाते. मात्र, काझी यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी, गरीब विद्यार्थ्यांना काम करता-करता शिकता यावे, याच मुख्य हेतूने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करीत आपले काम सुरूच ठेवले आहे.
समाजातील वंचित व उपेक्षित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने ही रात्रशाळा सुरू आहे. या ठिकाणी मी एकटाच शिक्षक कार्यरत आहे. शासनाचे अनुदान मिळण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रयत्न करण्यासाठी अनेक वेळा प्रशासनाची दारे ठोठावली; मात्र कोणीच माझी दखल घेत नाही.
- एस. एच. काझी, प्रभारी मुख्याध्यापक
प्रदीप शिंदे- कोल्हापूर ( लोकमत )

मार्कशीट किंवा पदवी प्रमाणपत्र हरवल्यास त्याची डुप्लिकेट कॉपी कशी मिळवावी?

सध्या विविध कामांसाठी आपल्याला पदवी अभ्यासक्रमाची मार्कशीट आणि पदवी प्रमाणपत्र आवश्यक असते. कधी नोकरीसाठी तरी कधी अन्य कामांसाठी या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. पण अनेक वेळा जुनी मार्कशीट किंवा पदवी प्रमाणपत्र गहाळ झालेली असते. अशावेळी ही गहाळ मार्कशीट आणि पदवी प्रमाणपत्र नेमके कसे मिळू शकते, हा प्रश्न आपल्याला नेहमी सतावतो. नवीन मार्कशीट कशी मिळवायची किंवा पदवी प्रमाणपत्र कसे काढायचे, त्याबद्दल जाणून घेऊ या हेल्पलाइनद्वारे...
कशी मिळेल मार्कशीट...
मुळात एखाद्या विद्यार्थ्याची मार्कशीट हरविली अथवा गहाळ झाली असेल, तर त्यासाठी प्रथम त्या विद्यार्थ्याला नजीकच्या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करणे गरजेचे आहे. त्यानंतर हरविलेली मार्कशीट नेमकी कशी हरविली किंवा नेमके काय झाले, यासंदर्भात विद्यार्थ्यांना ५० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र तयार करणे गरजेचे आहे. त्यानंतर हे दोन्ही कागदपत्रे घेऊन संबंधितांनी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाशी संपर्क साधावा. याठिकाणी यासंदर्भात एक फॉर्म उपलब्ध असून, त्या फार्मसोबत एफआयआर आणि प्रतिज्ञापत्र ही कागदपत्रे सादर करावी. हा अर्ज सादर केल्यानंतर साधारणपणे १५ दिवसांच्या आत विद्यार्थ्यांना मार्कशीटची दुसरी प्रत उपलब्ध होते. ही दुसरी मार्कशीट देताना त्या विद्यार्थ्यांच्या निकालाची सर्व माहिती विद्यापीठाकडून पुन्हा एकदा तपासून मगच ती दिली जाते.
येणारा खर्च....
मुळात नवी मार्कशीट आणि पदवी प्रमाणपत्र
मिळण्यासाठी विद्यार्थ्यांकडून विद्यापीठ काही फी आकारते. संबंधितांची मार्कशीट किंवा पदवी प्रमाणपत्र जितके जुने असेल, तितकी फी आकारली जाते. यासाठी कोणतेही ठराविक शुल्क निश्चित करण्यात आलेले नसून, संबंधितांची मार्कशीट किंवा पदवी प्रमाणपत्र किती जुने आहे, यावर ते ठरविण्यात येते. कसे मिळेल नवे पदवी प्रमाणपत्र एखादा विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याची मार्कशीट आणि पदवी प्रमाणतपत्र वेळेनुसार विद्यापीठाकडून कॉलेजात पाठविण्यात येते. मात्र अनेक वेळा विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र मिळत नसल्याची तक्रारही पुढे येते. या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागात संपर्क साधल्यास त्यांना नवे पदवी प्रमाणत्र मिळू शकते. त्यासाठी एक विशेष अर्ज विद्यापीठाकडून भरून घेतला जातो. या अर्जासाठी विद्यापीठाकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
कसे मिळेल पदवी प्रमाणपत्र...
मुळात हरविलेली किंवा गहाळ झालेली मार्कशीट किंवा पदवी प्रमाणपत्र मिळण्याची पद्धत जवळपास एकसमानच आहे. यासाठी विद्यार्थ्यांना पोलिस ठाण्यातील एफआयआरची प्रत आणि प्रतिज्ञापत्रासह नव्या पदवी प्रमाणपत्रासाठीचा अर्ज भरावा लागतो. साधारणपणे २५ दिवसांत विद्यार्थ्यांना त्यांचे पदवी प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले जाते. पदवी प्रमाणपत्रांचे हे प्रमाणपत्र जेवढे जुने असेल तेवढे ते मिळण्यास उशीर लागतो. मार्कशीट आणि पदवी प्रमाणपत्रांचे डिमॅटिंग विद्यार्थ्यांची सोय आणि वाढते कम्प्युटरायझेशन लक्षात घेता मुंबई विद्यापीठाने नॅशनल अकॅडमिक डिपोझटरी योजना म्हणजे, मार्कशीट आणि पदवी प्रमाणपत्रांचे डिमॅटिंग सुरू करण्याचा निर्णय गेल्या वर्षी घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला आता गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र सुरक्षितरित्या ऑनलाइन पद्धतीने डाऊनलोड करता येणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षांपासून ही सेवा उपलब्ध केली जाणार आहे. सीडीएसएलच्या माध्यमातून शैक्षणिक कागदपत्रांचे जतन केले जात आहे. कागदपत्रे डाऊनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना विशिष्ट लिंक उपलब्ध होणार असून लॉगइन आयडी आणि पासवर्ड दिला जाणार आहे. लॉगइन आयडी आणि पासवर्डच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना ती कागदपत्रे डाऊनलोड करता येणार आहे. विशेष म्हणजे गुणपत्रिकांवर डिजिटल स्वाक्षरी असणार आहे. जेणेकरून पडताळणी करणे सोपे जाईल.
कशी असणार डिमॅट पद्धत...
या माध्यमातून विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर
झाल्यावर नॅशनल अकॅडमिक डिपोझिटरीमध्ये माहिती अपलोड केली जाणार आहे. त्यानंतर हा सर्व डेटा डिजिटल स्वाक्षरीद्वारे उपलब्ध करून दिला जाणार आहे. गुणपत्रिका डाऊनलोड करण्यासाठीच्या सर्व सूचना आणि त्याची एक लिंक विद्यापीठाच्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाणार असून, मार्कशीटवर परीक्षा नियंत्रकाची डिजिटल स्वाक्षरी असेल. तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी संबंधित संस्थेतर्फे ईमेल पाठवला जाईल.
Thank u- सौरभ शर्मा हेल्पलाइन

देवाला सोडलेला 'मरीबा पोतराज' बनलाय लालासाहेब..

उस्मानाबाद : स्वत:च्या अंगावर आसुडाचे फटके ओढत आत्मक्लेश करुन घेणारा पोतराज रस्त्यावर आपण अनेक वेळा पाहिलाय. पोतराजांना अंधश्रद्धेच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी मानवी हक्क अभियान संघटनेनं पुढाकार घेतलाय. पोतराज प्रथा मुक्ती कार्यक्रम संघटनेनं राबवलाय.
सामान्यांचं जगणं नाकारणारी पोतराज प्रथा... पुत्रप्राप्तीच्या नवसापोटी देवीच्या नावानं सोडलेला मुलगा म्हणजे पोतराज... कपाळावर हळद, कुंकवाचा मळवट, तोंडाला शेंदूर, कंबरेला विविध रंगांच्या कपड्याच्या चिंध्या... पायात विशिष्ट पद्धतीचा चाळ आणि डोक्यावर वाढलेले केस अशा अवतारात
पोतराज आपल्यासमोर येतो... स्वत:च्या अंगावर आसुडाचे फटके ओढत आत्मक्लेश करुन घेणारा असा पोतराज रस्त्यावर आपण अनेक वेळा पाहिला असेल... पण आसुडाच्या फटक्यांमुळे होणाऱ्या जखमाही त्याला पोटभर अन्न देऊ शकत नाही. त्याचबरोबर शिक्षणाचा अभाव... देवीच्या कोपाच्या भितीमुळे त्यातून बाहेरही पडता येत नाही... म्हणूनच पोतराज प्रथा मुक्ती कार्यक्रम मानवी हक्क अभियान संघटनेनं राबवलाय. पोतराज निर्मूलनाचे उद्देश, मातंग समजात पोतराज प्रथेच प्रमाण जास्त आहे. त्यानं हे अपमानित जगणं सोडावं म्हणून, या प्रथेतून बाहेर पडावे हाच या पोतराज निर्मुलन अभियानाचा उद्देश आहे, असं संघटनेचे कार्यकर्ते बजरंग ताटे
सांगतात.
उस्मानाबादमधल्या मरीबा लक्ष्मण डोंगरेलाही मानवी हक्क अभियान संघटनेनं नवीन आयुष्य दिलंय. खरं तर मरीबाला शाळेची खूप आवड... पण डोक्यावरचे लांबसडक केस पाहून वर्गातली मुलं त्याला चिडवायची... रस्त्यावर येता-जाता त्याला टोमणेही मारायची. त्यामुळे सहावीच्या वर्गातून मरीबानं शिक्षण अर्धवट सोडलं. त्याची कुठलीही चूक नसताना केवळ आई- वडिलांनी देवीला बोललेला नवस पूर्ण करण्यासाठी त्याला पोतराज म्हणून देवीला सोडलं होतं. 'शाळेमध्ये गेलो की मुले चिडवायची, दगड मारायची. केसं मुळ लाज वाटायची. मग, दोन वर्ष शाळा बुडाली' असं मरीबा डोंगरे सांगतो...
तर, माझ्या पत्नीला या मुलाच्या जन्माच्या वेळी खूप त्रास होत होता, त्यावेळी मी लक्ष्मी देवीला नवस बोलला होता कि जो मुलगा होईल तो देवीला पोतराज म्हणून सोडला जाईल. म्हणून आम्ही मुलाची केस वाढवली आणि पोतराज म्हणून सोडलं, आता केसामुळे त्याला मुले चिडवायची. त्याने दोन वर्षा पासून शाळा सोडली. त्याला तिथं इतर मुलं त्रास देत होती, असं मरीबाचे वडील लक्ष्मण डोंगरे सांगतात.
मानवी हक्क अभियान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मरीबाचं आणि त्याच्या पालकांचं प्रबोधन केलं... आणि त्याचे केस कापले. त्याचं मरीबा नाव बदलून लालासाहेब असं ठेवलं... आज त्याच्या आयुष्याला नवी ओळख मिळालीय. 'आता खूप चांगल वाटतेय, फ्रेश वाटतेय, २ वर्ष बुडालेली शाळा भरून काढणार, अधिकारी होणार' अशी स्वप्न रंगवण्यात लालासाहेब व्यस्त आहे. अशिक्षित, गरीब आणि मागासलेल्या समाजात, अंधश्रद्धा आजही आपलं अस्तित्व टिकवून आहेत. अंधश्रद्धेचं अस्तित्वच मिटवायचं असेल तर प्रबोधनानं मानसिकता
बदलण्याची मोठी गरज आहे.
Thank u.. झी २४ तास

गाव

कुटुंबाच्या आदमुसल्या दमाने
अन झरनाऱ्या घामाने
घरचा पोरगा शिक्षण घेतो,
आधी करतो
परिवर्तनाचा जयघोष
विषमतेविरुद्ध आक्रोश.
बाबासाहेबांच्या आधाराने
तो साहेब होतो
आणि गावाला कायमचा निरोप देतो.
आजन्म घामात भिजलेली
अन फाटक्या गोधडीत निजलेली
माय त्याची वाट पाहते.
मोडक्या कुडांना आधार देता देता
बाप मोडून पडतो,
तो मात्र बिझी असल्याचा निरोप धाडतो.
त्याची शिकलेली बायको
गावात येत नाही,
अन सोफीस्टीकेटेड नातवंड
आजीचे नावही घेत नाही.
सुख दु:खाच्या
एखाद्या अनिवार्य प्रसंगी
लाजी खातर तो गावात येतो
तुटलेल्या सवंगड्याच्या
फाटलेल्या जिंदगीवर
तो मारतो शेरा
अन उगाच मिरवतो
शहरात बांधलेल्या बंगल्याचा तोरा
तेंव्हा बाजूच्या बुढयाला
बोलण्याची उबळ येते
सात्विक संतापाने त्याचे ओठ हलते
जणू त्याच्या वाणीने सारेच गाव बोलते.
आगा, गावाच्या घराचे जरा हाल पाय
मजुरी करत जगते तुही थकलेली
माय..
जवान बहिण आणखी उजवाची हाये.
कर्जाचे सारेच उखीर बुजवायचे हाये.
तुह्यासाठीच सुटली तुह्या भावंडाची
शाळा..
आन पुतण्याच्या हाती आला
निन्द्ण्याचा इळा..
सोपं असतं गड्या देणं
समतेवरचं भाषण,
तुमच्या सारख्या आवलादीनच
हा मोहला झाला मसन.
आरे, परिस्थितीन आमी
कफल्लक असलो तरी
बाबासाहेबाच्या इचाराचे
सच्चे पाईक हाओत,
आन तुमचा आवाज मोठा करणरे
आमीच माईक हाओत...
कवी- हेमंतकुमार कांबळे
('गाव' या दीर्घ कवितेतून)
धन्यवाद- प्रशांतजी वंजारे सर

कसं वाटत असेल?

पायाला ठेच लागली, जीव किती तळमळतो
दगडांनी ठेचून मारतात... कसं वाटत असेल?
साधा चटका बसला, जीव किती चरफडतो
साले जिवंत जाळून मारतात... कसं वाटत असेल?
बोटाला सुई टोचली, माणूस किती कळ्वळतो
सुरे-तलवारी खसाखस भोसकतात... कसं वाटत असेल?
नकळत पदर ढळला, बाई किती शरमते
नग्न धिंड काढतात... कसं वाटत असेल?
किती अपमान, किती अवहेलना,
किती यातना, किती वेदना... कसं सोसत असेल?
किती काळ हे असंच चालायचं?
किती काळ सारं निमूट झेलायचं?
आता ठरवलंय... ठेवलेलं हत्यार खोलायचं
माणसातलं जनावर आरपार सोलायचंच
करायचीच माणसं आतून बाहेरुन शुद्ध
अन जागवायचा आता प्रत्येक माणसात
एक बुद्ध... एक बुद्ध... एक बुद्ध...
कवी-बबन सरवदे
काव्यसंग्रह-आता सुर्यच आमचा आहे

किमान खर्चांमध्ये कमाल संरक्षण !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारने गेल्या काही दिवसात अनेकविध योजना सादर केल्या आहेत. या योजनांमध्ये दोन विमाविषयक योजनांचा समावेश आहे. आर्थिकदृष्ट्या वरच्या स्तरातील लोकांना या योजना आपल्याशा वाटत नसतीलही; मात्र अल्प उत्पन्न गटातील लोकांचे भविष्य साकारण्यासाठी या योजना वरदान ठरतील, यात शंकाच नाही.

अटल पेन्शन योजना

लाभ काय : प्रति महिना ₨ १,००० ते ५,००० पेन्शन

किती खर्च : चाळीस वर्षाच्या प्रौढ व्यक्तीला प्रति महिना १,००० रुपयांच्या पेन्शनसाठी वीस वर्षे दरमहा २९१ रुपये गुंतवावे लागतील. मात्र, अठरा वर्षाच्या व्यक्तीला चाळीस वर्षांसाठी दरमहा ४२ रुपये गुंतवावे लागतील. 

अर्हता काय : वय वर्षे १८ ते ४० दरम्यानची व्यक्ती, वय वर्षे साठपर्यंत गुंतवणूक करू शकतो.

कोणासाठी उपयुक्त : ही योजना प्रामुख्याने तुमच्याकडे घरकाम करणाऱ्या नोकरांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. ठरा​विक वर्षांनी काम सोडल्यानंतर अशा व्यक्तींकडे पाहणारे दुसरे कोणी नसते.


पंतप्रधान सुरक्षा विमा योजना

लाभ काय : अपघाती विमा आणि दोन लाखांपर्यंत अपंगत्व विमा.

किती खर्च : वार्षिक १२ रुपयांचा प्रिमियम

अर्हता काय : ही योजना असणाऱ्या कोणत्याही बँकेत बचत खाते असणारी व्यक्ती.

कोणासाठी उपयुक्त : ही योजना सर्वांसाठी उपयुक्त आहे. विशेष करून ड्रायव्हर, सुरक्षा रक्षक, वृत्तपत्रविक्रेते, फळ-भाजीपाला विक्रेते. शिवाय ज्या व्यक्ती जिवावर उदार होऊन कामे करतात, त्यांच्यासाठी ही योजना अतिउपयुक्त.


पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना

लाभ काय : पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर वारसदाराला दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण.

किती खर्च : वार्षिक ३३० रुपयांचा प्रिमियम

अर्हता काय : वय वर्षे १८ ते ७० दरम्यानची कुणीही व्यक्ती; जिचे बँकेमध्ये बचत खाते आहे.

कोणासाठी उपयुक्त : तुमच्याकडे कार्यरत कुणीही नोकरदार.. ज्याच्या कुटुंबातील एकमेव कमविणारी व्यक्ती ती स्वतः आहे. तिच्यावर अथवा त्याच्यावर संपूर्ण कुटुंब अवलंबून आहे.


पंतप्रधान जनधन योजना

लाभ काय : झीरो बॅलन्सचे बचत खाते मिळते, खातेधारकाला 'रुपे डेबिट कार्ड' मिळते, शिवाय एक लाख रुपयांपर्यंत अपघाती विमा आणि तीस हजार रुपयांपर्यंतचा जीवनविमा.

किती खर्च : शून्य

अर्हता काय : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुणीही. भविष्यातील सर्व कल्याणकारी आणि अनुदानाशी संबंधित योजनांसाठी अत्यंत उपयुक्त योजना असल्याने तुमच्या नोकरदारांना अवश्य लाभ करून द्यावा.

कोणासाठी उपयुक्त : असंघटित क्षेत्रात कार्यरत प्रत्येकासाठी अत्यंत उपयुक्त. तुम्ही तुमच्या नोकरदारांचे वेतन थेट त्यांच्या बँक खात्यात वर्ग करू शकता. त्यांना बँकेच्या व्यवहारांची माहिती देण्यासाठी उपयुक्त.


आरोग्यविमा योजना

लाभ काय : आजारी पडल्यामुळे किंवा शस्त्रक्रियेमुळे होणारे हॉस्पिटलायझेशनचे सर्व खर्च भरून निघतात.

किती खर्च : वय वर्षे १८ ते ४० दरम्यानच्या व्यक्तीसाठी ५०,००० रुपयांपर्यंतच्या संरक्षणासाठी वार्षिक ७०० ते ८०० रुपयांचा प्रिमियम.

अर्हता काय : सर्वचजण पात्र.

कोणासाठी उपयुक्त : आधीच आर्थिकदृष्ट्या अडचणीत असणाऱ्यांना वैद्यकीय खर्च परवडत नाहीत. आयुष्यभराची पूंजी हॉस्पिटलवर खर्च करण्याची वेळ आलेल्यांसाठी योजना उपयुक्त.


सुकन्या समृद्धी योजना

लाभ काय : केलेल्या गुंतवणुकीवर वार्षिक ९.२ टक्के दराने परतावा.

किती खर्च : किमान वार्षिक गुंतवणूक ₨ १,०००, कमाल वार्षिक गुंतवणूक ₨ १,५०,०००

अर्हता काय : दहा वर्षांखालील मुली

कोणासाठी उपयुक्त : घरकाम करणाऱ्या बहुतांश घरकामगार मुलींना शिकवण्याऐवजी संसाराला हातभार म्हणून कामाला जुंपतात. मुलीच्या नावे पैसे गुंतवल्यास तिचे शिक्षण आणि लग्न यासाठी काही रक्कम टप्प्याटप्याने दिली जाते.


किसान विकास पत्र

लाभ काय : केलेल्या गुंतवणुकीवर वार्षिक ८.७ टक्के दराने व्याज आणि शंभर महिन्यांमध्ये ठेव रक्कम दापदुप्पट मिळण्याची खात्री.

किती खर्च : किमान एक हजार रुपयांची ठेव ठेवावी लागते. कमाल मर्यादा नाही.

अर्हता काय : कुणीही.

कोणासाठी उपयुक्त : सर्व वयोगटातील घरकामगार, वृत्तपत्रविक्रेते, मध्यम उत्पन्न गटातील कुणीही, अल्पकालीन गुंतवणुकीची इच्छा असणाऱ्यांसाठी.


टपाल खाते, बँकांच्या मुदत ठेवी

लाभ काय : एक ते चार वर्षांसाठीच्या मुदत ठेवींवर वार्षिक ८.४ टक्के दराने व्याज, पाच वर्षांच्या मुदतठेवींवर साडेआठ टक्के दराने व्याज, वयोवृद्ध घरकामगाराच्या अथवा ज्येष्ठ नागरिकांच्या नावे पैसे गुंतवल्यास वार्षिक ९ ते ९.२५ टक्के दराने व्याज मिळण्याची हमी.

किती खर्च : टपाल खात्यामध्ये गुंतवणूक करण्याची किमान मर्यादा ₨ २००, ​कमाल मर्यादा नाही.

अर्हता काय : आधार कार्ड किंवा बँक खाते असणारी कुणीही व्यक्ती.

कोणासाठी उपयुक्त : घरकामगारांच्या अल्प मुदतीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त योजना. असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी घरांचे डाउन पेमेंट करण्यासाठी, कोचिंग क्लासेसची फी भरण्यासाठी उपयुक्त रक्कम जमविण्यासाठी.


सर्वच योजनांचा एकत्रित वार्षिक हप्ता... (तुमच्याकडे कार्यरत घरकामगार महिला अथवा पुरुषाचे वय ४० वर्षे असल्याचे गृहित धरण्यात आले आहे. ती व्यक्ती मासिक १,००० रुपयांच्या पेन्शन योजनेत सहभागी झाल्याचे गृहित धरण्यात आले आहे.)

पंतप्रधान जनधन योजना ० + पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना ₨ ३३० + पंतप्रधान सुरक्षा विमा योजना ₨ १२ + अटल पेन्शन योजना ₨ ३,४९२ + आरोग्य विमा ₨ ८०० + सुकन्या समृद्धी योजना ₨ १,००० + किसान विकास पत्र ₨ १,००० + टपाल खाते, बँक ठेवी ₨ २०० = ₨ ६,८३४.

भारतीय इतिहासातील सुवर्णक्षण शिवराज्याभिषेक !!

मध्ययुगीन भारताच्या विशेषत: महाराष्ट्राच्या २५०० वर्षाच्या इतिहासातील एक अनन्यसाधारण अशी घटना म्हणजेच शिवराज्याभिषेक होय. या शिवराज्याभिषेकानंतरच 'स्वराज्यास' एक ता‌त्त्विक बैठक मिळून शिवरायांचे हे एक केवळ 'मराठ्यांचे बंड' नसून सार्वभौम राज्याची स्थापना आहे हे या राज्याभिषेकाने पटवून दिले. भविष्यात पाकिस्तानातील 'अटक' शहराच्या पुढेही मराठ्यांचा वारू चौखुर उधळला याची यशस्वीपणे पायाभरणी करण्याचे कार्य शिवाजी महाराजांनी केले. शिवरायांनी त्यावेळच्या तरूणांना एकत्रित केले. त्यांना आश्वासक नेतृत्व देण्याबरोबरच त्यांची बलस्थाने ओळखून त्यांच्यावर योग्य त्या जबाबदाऱ्या सोपविल्या.
मध्ययुगाच्या आरंभापासून संपूर्ण भारतवर्ष परकीय इस्लामी, जुलमी शासकांच्या प्रचंड अत्याचाराखाली भरडला जात होता. दक्षिण भारतात अल्लाउद्दीन शिलजीच्या स्वारीनंतर पुढील ३०० वर्षात महाराष्ट्राला मोगल, आदिलशहा, निजाम शहा, सिद्ध‌ी या परकियांनी गुलाम केले. इ.स. १३१७च्या दिल्ली सुलतान अल्लाउद्दीनपुत्र मुबारक खिलजी याने देवगिरीच्या यादवांचे मराठी राज्य कायमचे नष्ट केल्यानंतर महाराष्ट्रावरती साडेतीनशे वर्ष पारतंत्र्याची काळी छाया होती. संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचंड निराशा, पारतंत्र्य, गुलामी, अवहेलना, दु:ख आणि संकटांचा भीषण काळोख पसरला होता. या भीषण काळोखाला छेद देणारी पहिली मशाल सह्याद्रीच्या कुशीत शहाजीराजे भोसले यांचे सुपुत्र शिवाजी महाराज यांनी पेटविली. आणि सह्याद्री पर्वतरांगात असलेल्या अजिंक्य, अभेद्य, बुलंद, बेलाग दुर्गाच्या आश्रयाने, गनिमी काव्याच्या युद्ध तं‌त्राने महाराष्ट्रातील गोरगरीब सर्वसामान्य, अठरा पगड जातीच्या भूमीपूत्र मावळ्याच्या सहाय्याने शिवरायांनी परकीय सत्ताधिशांविरुद्ध स्वतंत्र ढा आरंभ करुन गुलामगिरीत पिचलेल्या महाराष्ट्रातील जनतेची मने आणि मनगटे स्वतंत्र, स्वराज्याच्या प्ररणेने जिवंत बनवली. त्यावेळच्या तरूणांना त्यांनी एकत्र केले. त्यांच्यासोबत जसे तरूण होते तसे वर्षानुवर्षे परकीयांच्या सेवेत असलेले नामवंत सरदारही होते. मात्र या सर्वांसमोर त्यांनी आपल्या नेतृत्वगुणांनी आपलेसे केले, वचक बसवला, प्रसंगी शिक्षा दिल्या आणि प्रेमही दिले. स्वराज्य स्थापनेच्या उदात्त ध्येयपूर्तीमध्ये अनेक प्रचंड बलाढ्य शत्रुंचे अडथळे शिवाजी महाराजांनी केले होते. त्यांचे शत्रुही त्यांच्यापेक्षा कित्येक पट बलशाही होते. त्यात केवळ हिदुस्थानातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील क्रमांक एकचे विशाल आकारमानाचे मोगल सत्ताधीश, दक्षिणेतील भक्कम आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही यांच्या जोडीलाच गोव्यातील पोर्तुगीज, सुरतेचे इंग्रज, फ्रेंच, जंजिऱ्याचे सिद्धी, कोकणातील छोटी छोटी राज्ये आणि यांच्या जोडीलाच स्वकीयांचेही शिवरायांच्या कार्यात प्रचंड अडथळे होते. पण शिवाजींनी आपल्या प्रत्येक शत्रुचा संपूर्ण शास्त्रशुद्ध अभ्यास करुन त्याच्या बलस्थानाबरोबरच दुर्बल स्थानांचाही विचार करुन आपल्या उत्कृष्ट सेनापतीत्वाखाली सर्व शत्रुंना नामोहरम करुन स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्याच्या या कार्यात त्यांच्या जीवाभावाचे सखेसोबती, हजारो मावळ्याच्या, सर्वसामान्यांच्या बलिदानातून महाराष्ट्रभूमी पावन झालीच व स्वराज्याचेही स्वप्न साकार झाले. स्वराज्याच्या या स्वतंत्र, सार्वभौम राज्याला बळकटी देण्याच्या उद्देशाने व स्वकीयांच्या प्रचंड आग्रहामुळे किल्ले रायगडवरती प्राचीन 'राज्याभिषेका'च्या प्रथेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी व बलाढ्य शत्रुंनाही वचक बसविण्यासाठी त्यांनी ६ जून १९७४ रोजी स्वत:स मोठ्या वैभवात राज्याभिषेक करुन घेऊन एक सार्वभौम राज्य निर्माण झाल्याची द्वाही फिरवली. स्वराज्य निर्माण करुन त्यांनी जर राज्याभिषेकच केला नसता तर ते एक मराठ्यांचे यशस्वी बंड ठरले असते.
शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकावेळी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. स्वतंत्र राज्याची 'राज्याभिषेक शक' ही नवीन कालगणना सुरू केली. आर्थिक व्यवहारासाठी शिवराई आणि होन अशी मोडी (मराठी) लिपीतील नाणी चलनात आणली. पूर्वीची मुसलमानी पद्धतीची लेखनपद्धती बदलून हिंदु पद्धतीची लेखनपद्धती विकसित करून लेखनप्रशस्ती, राज्यव्यवहारकोष हे मराठीतील ग्रंथ निर्माण करून घेतले. परकियाच्या तावडीतून सोडविलेल्या गडकोट किल्ल्यांना पूर्वीही मराठी नावे दिली व आपल्या लोककल्याणकारी स्वतंत्र राज्याचा विचार महाराष्ट्रापुरताच मर्यादित न ठेवता संपूर्ण भारत-जगभरात पोहोचविण्यासाठी राज्याभिषेकानंतर परकीय सत्ताधिशाविरुद्ध आक्रमणे, मोहिमांचा धडाका आरंभ केला.
हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे महत्व सर्वत्र पोहोचावे, शिवछत्रपतीच्या उदात्त कार्याचा आदर्श भावी पिढीने घेऊन उत्तुंगपणे मार्गक्रमण करावे. या उद्देशाने शिवराज्याभिषेक दिन, विविध उपक्रमाने साजरा केला जातो. इतक्या वर्षानंतरही तरूण पिढीला हा राजा आपला वाटतो. आता ‌गरज आहे ती खऱ्या अर्थाने विचार समजून घेण्याची. शिवरायांनी केवळ मैदानावरच्या लढाया खेळल्या नाहीत तर आपल्या लेखणीने आणि वाणीने अनेक लढाया जिंकल्या हे समजून देण्याची वेळ आली आहे.
By... प्रा. धीरज शिंदे

महिला आणि अंधश्रद्दा?

महिलांना त्यांच्या शरीरावरील कान नाक गळा पाय हातातील आभूषणे हे अंद्धश्रद्धे च्या गुलामगिरीच्या बेड़या वाटत नाही यामागे नक्कीच हजारो वर्षापुर्वी चा मानसिक पगडा असावा त्याच प्रमाणे पूर्वी स्वातंत्र्य लढाईत तरुण लोक आनंदाने फासावर जात कारण त्याना तो फास हा फास न वाटता स्वातंत्र्य देवी ने आपल्या साठी जनु फुलाचा हार विनला आहे असे वाटे आणि तो फास ते गळ्यात आनंदाने घालत.
याचप्रमाणे महिला ना अंधश्रद्देबेडया या बेड्या न वाटता ते अभुषणच आहे आणि त्या अंगावर मिरवतात त्या वेळी महिलांच्या अंधश्रद्धेच्या क्षेत्रातील लढाई बिकट बनते गुलामाला गुलामगिरी ची जाणीव करुण दिल्या शिवाय तो पेटुन् उठनार नाय. पण आपण गुलाम नाही अशीच त्यांची धारणा असते तेव्हा तर ती लढ़ाई अवघड होते पण या लढाई विरुध्द सातत्याने लढावे लागणार च नविन पद्धतीने अनेक वर्ष. शेवटी सत्याचा विजय होतो सत्य हे आपल्या बाजुला आहे म्हणून आपलाच विजय होणार.
By.. विवेकभाई पूनावाला

वटसावित्री !!!

वडाचे झाड तसे पुजनीयच आहे म्हणा ,त्याची पूजा केलीच पाहिजे, कारण ते २४ तास प्राणवायू ऑक्सिजन देते. परंतु सात जन्मी हाच पती मिळावा म्हणून सुशिक्षित स्त्रिया जेव्हा त्याला दोरा गुंडाळून पूजा करतात तेव्हा मात्र त्यांच्या भाबडेपणाची व साक्षरतेची कीव करावीशी वाटते !
सत्यवान आणि सावित्री उन्हातून रस्त्याने जात असतांना प्रखर उन्हामुळे त्याला मूर्च्छा आली आणि तो बेशुद्ध होवून खाली कोसळला, सावित्रीने त्याला ओढत-ओढत बाजूच्या वडाच्या झाडाच्या सावलीत आणले. सावलीमुळे त्या सत्यवानाच्या शरीराचे तापमान सामान्य होऊन व त्याला मुबलक प्रमाणत प्राणवायू ऑक्सिजन मिळाल्यामुळे तो शुद्धीवर आला आणि सावित्रीने यमाला याचना करून आपला पती परत मिळविला म्हणून आजही अगदी सुशिक्षित स्त्रिया सुद्धा सात जन्मी हाच पती मिळावा ह्याच हेतूने वटसावित्रीला वडाच्या झाडाचे पूजन करतात.
मग त्या सावित्रीचे काय ?
जिने तुम्हाला शिकवून साक्षर करण्यासाठी शेण,माती, चिखल, दगड, शिव्या यांचा मार सहन केला? तो याच तुमच्या भोळ्या भाबड्या अंधश्रद्धा जोपासण्यासाठी का ? त्या वडाच्या झाडाला दोरा गुंडाळत बसण्यापेक्षा प्रत्येकीने दरवर्षी एक नवीन वडाचे झाड जर लावण्याचा कार्यक्रम केला असता तर किती बरे झाले असते नाही का?
सात जन्मी हाच पती मिळावा म्हणून, मग तो कसाही असो व्यभिचारी असो, की दारुडा असो, रोज दारू पिवून तुम्हाला मरेस्तोवर मारणारा असो तुमच्या आईवडीलासह शिव्या देणारा असो, माहेरून पैसे आण्यासाठी तगादा लावणारा असो हुंड्यासाठी तुम्हाला छळणारा असो जाळणारा असो कसा ही असो पण सात जन्मी हाच पती लाभो म्हणजेच त्याचे अन्याय अत्त्याचार सोसण्यास एक जन्म अपुरा आहे म्हणून सात जन्मी हाच पती मिळावा का? आणि वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून पूजा करून कधी सात जन्मी तोच पती मिळतो का? कुणाला आजवर
मिळाला आहे का? कुणाला आपला पुनर्जन्म आठवतो का?

चंदनभाऊ बुटे

अकलूज गावचा एक माणूस गेली ३० ते ३५ वर्षे सीताफळांच्या बिया साठवतो. मुंबईला, पुण्याला कामानिमित्त जावं लागतं. तो पिशवी भरून त्या घेतो आणि जाताना घाटात गाडी थांबते तिथं तिथं दरीत फेकून देतो. हल्ली त्या घाटावर पाट्यांमध्ये पिकलेली सीताफळं घेऊन अनेकजण विक्रीला बसलेले असतात.

अलीकडे या माणसानं खास त्यांच्याकडे जाऊन विचारलं,
'कुठून आणता ही सीताफळं? तुमचे मळे आहेत का?'

'कुठले मळे साहेब? आम्ही गरीब माणसं. लोक घाटात शेकड्यानं बिया टाकतात. झाडं उगवलीत दरीत. सारं फुकटच. आम्ही फळं गोळा करतो. पिकवतो आणि तुम्हाला विकतो. शेकडो गरीब कुटुंब चालतात यावर इकडची.'

त्या विक्रेत्याकडं गहिवरल्या डोळ्यानं पहात ही व्यक्ती डझनभर सीताफळं विकत घेते. पुन्हा बिया गोळा करून घाटात फेकण्यासाठी!

बारमाही काम करता येईल असा हा देश.
बिया फेकल्या तरी अमृतासमान चव असणारी फळे पिकवणारी इथली माती.
बिया साठवून एखादा जरी घाटावरून त्या दरीमध्ये फेकणारा भेटला तरी हजारो कुटुंबांची तो सोय करून जातो.

वर वर किरकोळ वाटली तरी ही घटना अंतर्मुख करते.
ही दृष्टी किती लोकांची असते? जर प्रत्येकानं असा एखादा छंद बाळगला तर काळ बदलून जाईल.

हिंदूंनो बाबासाहेब आपले आहेत... लेख काळजीपूर्वक वाचा !!

ते नाहीत एका जातीचे.. ते नाहीत एका धर्माचे 
ते भारत देशाचे पुञ आहेत.. हिंदूंनो बाबासाहेब आपले आहेत...


एखाद्या सभेत बाबासाहेबांच नाव घेऊन कोणीतरी हिंदू समाजावर टिका करतो आणि हिंदूंचा समज होतो की बाबासाहेब आपल्या विरोधी आहेत पण तस नाही...


देशाचा ध्वज भगवा असावा यासाठी प्रयत्न करणारे बाबासाहेब... त्यांनी राज्यघटना लिहिली ती प्रत्येक नागरिकांसाठी... प्रत्येक भारतीयांच्या साठी...

कोलंबिया विद्यपिठाने जाहिर केल. शेकडो वर्षात असा बुद्धिमान विद्यार्थी झाला नाही.. तो भारतीय विद्यार्थी म्हणजे बाबासाहेब...
शेतकऱ्यांनो जाती पाती सोडून शेतकरी म्हणून एक व्हा... हे सांगणारा शेतकऱ्यांचा नेता म्हणजे बाबासाहेब...

गरोदर स्त्रीयांना बाळंतपणात पगारी रजा मिळावी याचा आग्रह धरणारे बाबासाहेब...

शिकलेल्या आदीवासीचा शिक्षणाचा पुरावा सर्व ग्राह्य धरला जावा असे सांगणारे बाबासाहेब...
शिक्षक देशाचा कणा आहेत त्यांना जास्त पगार मिळावा हे मांडणारे बाबासाहेब...
कोळश्याची विज देशाला परवडणार नाही. जल विद्युत प्रकल्प राबवा. सौरउर्जेचा वापर करा हे सांगणारे बाबासाहेब...
भाक्रा नांगर धरण, हिराकुड प्रकल्प पुर्ण करणारे बाबासाहेब...
कोसी नदीवर धरण बांधा... बिहार मधे कधी पुर येणार नाही. हे कळकळून सांगणारे बाबासाहेब...
पुस्तकासाठी घर बांधणारे विद्या प्रेमी बाबासाहेब...
संस्कृत भाषेचा आग्रह धरणारे संस्कृत प्रेमी बाबासाहेब...
मुलीच्या गर्भ पात करू नका हे सांगणारे द्रष्टे बाबासाहेब...
देशाला उपराजधानी असावी हे सांगणारे बाबासाहेब...
मला कायदेमंञीपद नको.. कृषी मंत्री व्हायचे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून शेतकऱ्यांच राज्य आणायचय अशी तळमळ असणारे शेतकऱ्यांचा राजा बाबासाहेब...
कोकणात खोतीच आंदोलन करणारे बाबासाहेब...
लोकमान्य टिळकांच्या मुलाने (श्रीधरपंत टिळक) २५मे १९२८ ला शिवाजी नगर येथे पुजा मेल खाली आत्महत्या केली..त्या वेळी भावपुर्ण लेख लिहून भविष्यात कोणी आत्महत्या करू नका हे सांगणारे बाबासाहेब...
रघुनाथ कर्वे यांच्या पाठीशी भावाप्रमाणे उभे राहणारे बाबासाहेब...
भारतीय सैन्यात तीन लष्करी प्रमुखांनी एकत्र भेटू नये. हे लोकशाहीला घातक आहे हे सांगणारे बाबासाहेब...
भारतीय लोक शाहीला जीवंत ठेवणारी संजीवनी म्हणजे बाबासाहेब...
हिंदू कोडबिल आणणारे बाबासाहेब...
कामगार.. शेतकरी.. महिला.. तरूण.. बालक या सर्वांचे बाबासाहेब...
माझ्या हिंदूंनो बाबासाहेब समजून घ्या. कुणी बाबासाहेबांच्या नावाने जातीयवाद धर्म वाद करत असेल या गोष्टींना बळी पडू नका. आपण सर्व भारतीय आहोत एकमेकांचे भाऊ आहोत. भावाप्रमाणे राहू. जाती पाती सोडून भारत देशासाठी एक होऊ.
सर्व भारतीयांना आपल्या बाबासाहेबांच्या जयंतीच्या हार्दीक शुभेच्छा ।
धन्यवाद-दत्ता सोनवणे देशमुख.

कधीतरी कुणीतरी शेणाचे आणि दगडाचे वार सहन केले आहेत हे विसरू नका

स्त्यावरुन जर कोणी मुली जात असल्या तर मी त्यांना नेहमी सांगतो... अर्थात ओळखीच्या असतील तर,...... कि मुलीँनो आज जरी तुम्हि मुक्त पणे फिरत असाल, काँलेजला जात असाल पण या साठी कधीतरी कुणी शेणाचे आणि दगडाचे वार सहन केले आहेत हे विसरु नका.
- पु.लं.देशपांडे.
संदर्भ - पुलं यांनी school of indian music चे संचालक देवधर यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या भाषणातिल अंश आहे.

बाबासाहेब आंबेडकर आणि जातीयवादी आडनावे !!

आडनाव ही संस्था उदबोधक अदभूत आणि संस्मरणीय आहे. प्रचलित समयी आपल्या वर्तमान नाव किवा आडनावावरून ती व्यक्ती समाजामध्ये ओळखली जाते. आडनावामुळे आपण जीवनाच्या सातत्याचा अविभाज्य घटक आहोत, याचे प्रत्यंतर येते. भारतात आणि महाराष्ट्रामध्ये व्यक्तीला स्वत:ची ओळख सिद्ध करण्यासाठी प्रथम नाव आणि आडनावाची अत्यंत आवश्यकता असते. माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचे स्वरूप व्यापक करण्यासाठी नाव आणि आडनाव वापरले जाते. आडनावातून व्यक्तीचा आविष्कार प्रकट होतो. दोन व्यक्ती किवा कुटुंबीयांमध्ये आडनावांचे साधर्म्य असेल तर त्यांच्यामध्ये त्वरित ऋणानुबंध प्रस्थापित होतो; एवढे सामर्थ्य आडनावामध्ये समाविष्ट आहे.
समाजामध्ये एकाच नावाच्या अनेक व्यक्ती वावरत असतात. त्या व्यक्तींचा निर्देश अधिक निश्चितपणे करता यावा म्हणून आडनावांची उत्पत्ती फार वर्षांपूर्वी झाली असावी, असे आडनावांचे वर्णन ज्ञानकोषकार डॉ. श्रीधर केतकर यांच्या 'महाराष्ट्रीय आडनावांची उपयुक्तता' या ज्ञानकोशात वाचावयास मिळते. याशिवाय पं. महादेवशास्त्री जोशी यांच्या भारतीय संस्कृती कोशात अनेक आडनावांची माहिती उपलब्ध आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबावडे या गावी सकपाळ घराण्यामध्ये १४ एप्रिल, १८९१ रोजी एका बालकाचा जन्म अस्पृश्य कुटुंबात झाला. मुलाच्या शिक्षणासाठी रामजी सकपाळ यांनी महू येथून सातारा येथे स्थलांतर केले. रामजी यांनी भीमराव यांना सातारा येथील प्राथमिक शाळेत भीमराव रामजी सकपाळ या नावाने दाखल केले. जातीयवादाचे आणि गरिबीचे चटके सहन करीत भीमराव शाळेतील ओसरीवर बसून शिक्षण घेत होते. भीमराव शिकत असलेल्या वर्गामध्ये आंबेडकर नावाचे पुरोगामी विचार असलेले ब्राम्हण शाळामास्तर होते. भीमराव बालपणापासून हुशार आणि आणि तल्लख बुद्धीचे होते. आंबेडकर मास्तर भीमरावाच्या अभ्यासावर लक्ष देत असत आणि त्यांच्यावर त्याचे खूप प्रेम होते. भीमराव सकपाळ या बुद्धिमान विद्यार्थ्याला संकपाळ या नावाने संबोधणे आंबेडकर मास्तरांना संकोचल्यासारखे वाटत होते. म्हणून त्यांनी रामजी यांची संमती घेऊन स्वत:चे आडनाव भीमरावला प्रदान केले. तेव्हापासून भीमराव रामजी आंबेडकर या नावाने ते सर्वांना परिचित झाले.
प्रखर बुद्धिमत्ता आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची जिद्द यामुळे डॉ. आंबेडकर अस्पृश्य समाजाचे नेते म्हणून सर्वांना ज्ञात झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाच्या जागृतीसाठी विदर्भ, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र वगैरे ठिकाणी अनेक दौरे केले. प्रस्तुत विभागामध्ये दौरे करताना एक गोष्ट त्यांच्या प्रकर्षाने निदर्शनास आली की, अनेक अस्पृश्य समाजातील व्यक्तींची आडनावे जातीवाचक स्वरूपाची आहेत. उदाहरणार्थ दगडू धोंडिबा महार, पिराजी भैरू मांग, कचरू चिमाजी चांभार अशा स्वरूपाची जातीवाचक आडनावे असलेल्या व्यक्तींची नावे श्रवण करताना ते दु:खी, व्यथित आणि अस्वस्थ होत असत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजजागृतीच्या संबंधाने नागपूर येथे २/४/१९३४ रोजी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. आंबेडकर म्हणाले, मनू हा अत्यंत निष्कृष्ट आणि हीन वृत्तीने ग्रासलेला पुरुष होता. त्याने माणसामध्ये विषमतेच्या, जातीभेदाच्या आणि वर्णव्यवस्थेच्या भिती निर्माण केल्याच; तथापि उच्चवर्णीय ब्राम्हण समाज आणि बहुजन समाजामध्ये आडनावांचे वर्गीकरणसुद्धा मोठ्या चाणाक्षपणे केले आहे. सन्माननीय आणि प्रतिष्ठित स्वरूपाची अनेक आडनावे ब्राम्हण समाजामध्येच निदर्शनास येतात. आडनावामुळेच प्रस्थापित समाजव्यवस्थेतील जातीयतेचे ओंगळ, हिडीस दर्शन प्रकर्षाने प्रत्ययास येते. अस्पृश्य समाजामध्ये ज्या व्यक्तींना आडनावे नाहीत किवा ज्यांची आडनावे जातीयवादी स्वरूपाची आहेत, त्यांनी स्वत:ची आडनावे बदलावीत आणि ब्राम्हण समाजामध्ये सन्माननीय आणि प्रतिष्ठित संबोधिली जाणारी आडनावे धारण करावित.
डॉ. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनपर भाषणामुळे विदर्भातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूर्वाश्रमीच्या महार मंडळींनी आपल्या आडनावांमध्ये परिवर्तन केले आहे. ब्राम्हण समाजामध्ये सन्माननीय असलेली पटवर्धन, वैशंपायन, गोडबोले, गोखले, टिळक, अभ्यंकर, साने, परांजपे वगैरे स्वरूपाची प्रतिष्ठित आडनावे अस्पृश्य मंडळींनी धारण केल्यामुळे त्यांची प्रतिष्ठा आणि अस्मिता वृद्धिगंत झाली असून जातीवाचक आडनावांमुळे हीनत्वाची आणि न्यूनगंडाची भावना संपुष्टात आली आहे.
धन्यवाद- लक्ष्मण वाघ/पुणे

सत्यशोधक विवाह कसे करावे?

मित्रांनो..मैत्रिणिनो या देशातील पहिला सत्यशोधक विवाह म.फुलेंनी घडवुन आणला. पुरोहिताशिवाय लावलेला हा विवाह २५ डिसेंबर १८७३ रोजी पार पडला. वराचे नाव सीताराम जबाजी आल्हाट तर वधु राधा ही बजुबाई निंबणकरांची कन्या या विवाहाचा खर्च स्वत: सावित्रीमाईंनी केला. त्याकाळी त्यांना किती विरोध झाला असेल याची कल्पना न केलेलीच बरी. त्यांच्यावर खटला सुद्धा भरण्यात आला. मात्र जोती-सावित्री जराही डगमगले नाहीत. क्रांतीसुर्य व क्रांतीज्योतिच ते!

आजही सत्यशोधक विवाह ही काळाची गरज आहे. अतिशय साधी, सरळ व सोपी विवाह पद्धत आम्हाला म.फुलेंनी १९ व्या शतकातच दाखवुन दिली. आम्हा बहुजनांना ती आजही माहीती नाही, कळली नाही; वळली नाही... माहीती होऊ दिली नाही.

म. फुले म्हणतात,
''वधु-वराचे जातीस नीच, हलकट मानना-या धुर्त, कपटी आर्य-भटाची या कामी सावली सुद्धा पडु देऊ नये. म्हणजेच बामन, पुरोहित अर्थात, कर्मकांड गायब. म्हणजे देवकुंडी नको, मारोती नको.[पटत असेल तर]
आपल्या गावातील म.फुले, सावित्रीमाई फुलेंच्या पुतळयास अभिवादन करावे. अक्षदा धान्याऐवजी फुलांच्या पाकळ्या कराव्या. कारण मित्रांनो आपल्या देशात दरवर्षी जवळपास २५ कोटी लग्न होतात.प्रत्येक लग्नात सरसरी १० किलो धान्य आम्ही फेकतो.[करा हिशोब] एकीकडे अद्यापही काही लोक असे आहेत की, जे एक सांजी उपासी पोटी झोपतात.[करा विचार] मंगलष्टके म. फुलेंनी लिहिलेलीच म्हणावे. आर्थिक बळ असेल तर ती छापावी सोबत म.फुलेंचे विचार सुद्धा टाकता येतात.

वरमुलगा वधु मंडपात आल्यावर वर-वधुं सोबत त्यांचे आई वडील घेऊन सावित्रीमाई व म.फुलेंच्या फोटो प्रतिमांचे अभिवादन करावे. उपस्थितांना थोडावेळ म.फुलेंचे विचार सांगुन प्रबोधीत करावे. या नंतर वधु-वरांच्या मध्ये अंतरपाट धरुन म. फुलेंनी लिहिलेल्या सुंदर मंगलाष्टकांचे गायन करावे. म.फुलेंनी लिहीलेली शपथ वर-वधुस द्यावी. वर-वधुंनी एकमेकांच्या गळ्यात पुष्पमाळा घातल्यानंतर त्यांच्या वस्त्राची महासत्यगाठ बांधावी. सर्व उपस्थितांनी सत्यलग्न लावावे.

भोजनाचा सगे-सोयरे, मित्र परीवारांनी आनंद घ्यावा. दुसरे दिवशी वराकडे वरात पंगत [रिसेप्शन] देण्याची पद्धत आहे. त्यावेळी सुद्धा आपण फुले दांम्पत्यांच्या फोटो प्रतिमांचे अभिवादन करुन त्यांच्या जीवन कार्याविषयी थोडक्यात मार्गदर्शन केले तर अधिक उत्तम होईल. बाकी सर्व आनंद ईतर लग्नाप्रमाणे साजरा करावा.

मित्रांनो..मैत्रिणिनो, म.फुलेंचे विचार सांगायलाच कोणाची फारशी हिंम्मत होत नाही. त्यांच्या विचारावर प्रत्यक्ष कृती करणे किती कठीण आहे हे आपण समजु शकतो. तरी करु या सुरुवात होऊ या सत्यशोधक !!

Thank u.. Umesh Ghogale

स्त्रियांना मिळाला जगण्याचा अधिकार!

आपल्याकडे पूर्वी महिलांना विचार करण्याचं स्वातंत्र्य नव्हतंच, परंतु जगण्याचाही अधिकार ख-या अर्थाने नव्हता. प्रजासत्ताकाने स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला. त्यांच्यातील योग्यतेनुसार ग्रामपंचायत सदस्यापासून ते राष्ट्रपती पदापर्यंतचा मान मिळवून दिला. विधवांनाही समाजात कोणतेही अधिकार आणि स्थान नव्हतं. परंतु आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेनं कोणताही भेदाभेद न मानता, इंदिरा गांधींना पंतप्रधानपद दिलं. याद्वारे जगण्याविषयीचा विस्तृत दृष्टिकोनच घटनेनं आपल्या सर्वाना दिला. काहींना प्रजासत्ताकाचा अर्थही कळत नाही, उलट त्याचा गैरवापर होताना दिसतो. मग अण्णाभाऊ साठेंनी जे म्हटलं होतं, ‘ये आजादी झुठी हैं, देश की सत्ता भुखी हैं!’ ही परिस्थिती आजही तशीच आहे. दारूचे दुष्परिणाम, प्रेमप्रकरणांमधून समोर येणारी हिंसक वृत्ती, तरुणांमधली निष्क्रियता अशा समाजविघातक गोष्टींनी अंत:करण दुखावतं. म्हणून देशभर काही प्रासंगिक विषयांवरही सप्त खंजिरी वादन, गाणी या माध्यमातून माझं प्रबोधन सुरू असतं. क्रिकेटच्या विरोधात मी प्रबोधनाची मोहीमच सुरू केली आहे. क्रिकेटचे सामने भरवण्यापेक्षा, खरी गरज ही वर्षानुर्वष अर्धवट राहिलेले प्रश्न, समस्या, नसलेल्या सेवासुविधा पूर्ण करण्याची, असं मला वाटतं. कायदा कडकच आहे, त्याचा चुकीच्या पद्धतीनं वापर करून घेणारे नालायक आहेत. कायदा आहे म्हणून आसाराम बापू, तरुण तेजपाल आज न्यायालयीन कोठडीत आहेत. धर्माचा किंवा कुठल्याही प्रकारचा धाक आज न उरल्यामुळे बळावत चाललेल्या वाईट वृत्तीतून ही कृत्य घडतात. म्हणूनच घरच्यांचा, मोठ्यांचा धाक हा हवाच!
- सत्यपाल महाराज (सप्तखंजिरी वादक)

अग्निपुत्र : भाग ३

आपल्या सर्व अनुयायांना जगभरातील विविध ठिकाणी पाठविल्यावर रुद्रस्वामी पूर्वेच्या दिशेने जातात. प्रचंड अंतर पादांक्रांत केल्यानंतर रुद्रस्वामी आपल्या विश्वसु अनुयायी आणि काही विद्वानांसह  समुद्रमार्गे पूर्वेला पोहोचतात. ​बोटीतून किनाऱ्यावर उतरताच त्यांना तिथले लोकजीवन दिसते. अर्ध-भटकी जीवनशैली, शिकार करून जगणे, पाण्यावरील लाकडीघरे व अविकसित शेती ही तिथली जीवनपद्धत त्यांना स्पष्टपणे दिसत होती. बारीक डोळे असलेले आणि चेहऱ्यावर सतत आनंद असलेले मनुष्य पाहून सोबत असेलेले सार्वजन आनंदी झाले.

"स्वामी, आता आपल्याला काय करावयाचे आहे?" एक अनुयायी प्रश्न विचारतो.

स्वामी वर आकाशाकडे बघतात, पक्षी मोठमोठे थवे करून समुद्राहुन जमिनीच्या दिशेने उड़त होते. स्वामींना नैसर्गिक आपत्तीची कल्पना आधीपासूनच होती. ते आपल्या बरोबर असलेल्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करतात. सर्वजण एका उंच ठिकाणी जातात आणि काही क्षणातच त्या भागाला त्सुनामिची मोठी धड़क बसते. अनेक पशु, वनस्पती आणि मनुष्य आणि त्यांची घरे वाहून जातात. क्षणात होत्याचं नव्हतं होतं. सर्व अनुयायी हा प्रकार आपल्या डोळ्यांनी बघत असतात. थोड्या वेळापूर्वी आनंदाने आपली कामे करणारे आता मृतावस्थेत पडलेले होते.

"स्वामी, हे काय आहे? निसर्गाचं इतकं रौद्र रूप आम्ही कधी पाहिलं नव्हतं. आपल्याला याची कल्पना होती का?" एक विद्वान विचारतात.

"होय, आम्हाला या आपत्तीची पूर्ण कल्पना होती." रुद्रस्वामी त्याच्याकडे न बघतच उत्तर देतात.

"स्वामी, मग आपण त्या निष्पाप मनुष्यांना का नाही वाचवले? आपण त्या सर्वांना वाचवू शकला असता."

"आपण ज्या ठिकाणी आलो आहोत ते ठिकाण म्हणजे मृत्यूचे माहेरच आहे.इथे पावलापावलावर तुम्हाला मृत्यू दिसेल. इथल्या मनुष्यांना मृत्यूची सवय आहे. भूकंप, त्सुनामी, चक्रीवादळ, हिंस्त्र पशुचा हल्ला अशी अनेक कारणे आहेत की जरी ह्या प्रदेशावर सर्वप्रथम सूर्यकिरणे पडत तरी सर्वात हिंस्त्र भूमी फक्त हीच आहे." स्वामी खाली बघतात तेव्हा त्यांना सर्व शांत झालेले दिसते. ते पुढे म्हणतात, "आता प्रत्येकाने कमीत कमी दोन व्यक्तींचे शव आपल्याबरोबर घेऊन चला. मला १०० मृत माणसे हवी आहेत."

विद्वानाला स्वामींच्या मनातील समजते. ते सर्व वाटेने मिळतील तितके शव घेऊन ज्वालामुखी पर्वताच्या दिशेने निघतात. आणखी वाचा

भाषावार प्रांतरचना आणि बाबासाहेब !!

आंध्र प्रदेशामधून तेलंगणा हे वेगळे राज्य झाले. भारतात लहान राज्ये व त्यांच्या विकासाचे प्रश्न नव्याने ऐरणीवर येतच आहेत. त्याअनुषंगाने आजच्या परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषावार प्रांतरचनेबाबत व भारताची एकात्मता आणि सुरक्षेबाबत काय विचार होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरावे.
भारत सरकारने आंध्र प्रदेश राज्यातून तेलंगणा वेगळे राज्य केले आहे. त्याचबरोबर भारतातील लहान राज्ये व त्यांच्या विकासाचे प्रश्न, प्रांतीय व भाषीक अस्मितेच्या प्रश्नांची नव्याने मांडणी होणे आवश्यक झाले आहे. पुढील काळात बर्‍याच राज्यांतून लहान राज्यांची स्वतंत्र मागणी होणार आहे. त्यापार्श्‍वभूमीवर आजच्या परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषावार प्रांत रचनेबाबत व भारताची एकात्मता व सुरक्षेबाबत काय विचार होते व ते आज कसे महत्त्वाचे आहेत, यांचा ऊहापोह होणे गरजेचे आहे.
गेल्या दशकापासून भारतात भाषा, प्रांतीय प्रश्न, विभागीय असमतोल, सांस्कृतिक भेदभावाचे प्रश्न जटिल होत आहेत व यापुढेही तो गुंता वाढणार आहे, हे आपल्याला तेलंगणा, विदर्भ व इतर ठिकाणी लहान राज्यांची मागणी व भाषेवर आधारित प्रश्नांमुळे लक्षात येत आहे. भारतात भाषा आणि प्रांताचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्वत:ची अस्मिता जपण्यासाठी, किंबहुना त्या अस्मितेचा वापर राजकीय फायद्यासाठी भारतातील सर्वच राजकीय पक्ष कमी अधिक प्रमाणात करीत आहेत. त्यामुळे भारतातील भाषावार प्रांतरचनेचे मूळ प्रश्न काय आहेत व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महामानवाने या विषयाकडे कसे पाहिले, याचे त्यांच्या जन्मदिनी स्मरण करणे औचित्यपूर्ण आहे व त्यांच्या विचारांचे आजच्या संदर्भात काय महत्त्व आहे, याबाबतचा ऊहापोह होणे गरजेचे आहे.
भाषावार प्रांतरचनेच्या प्रश्नावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दोन पुस्तके प्रकाशित आहेत. भाषावार प्रांतरचना या विषयावर ‘जनता’मध्ये बाबासाहेबांनी दोन लेख लिहिलेले आहेत. १९४८ आणि १९५५मध्ये लिहिलेल्या पुस्तकांत काही विधानांबाबत विसंगती जाणवते; परंतु याच पुस्तिकेत ‘जबाबदार व्यक्तीला चुकीची दुरुस्ती करता आली पाहिजे, पुनर्विचार करण्याचे आणि तद्नुसार मतांतर करण्याचे धाडसही त्याच्या अंगी असावे लागते,’ असे स्पष्टीकरण बाबासाहेबांनी दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षिततेचा आणि अखंडतेचा विचार करताना राज्यघटनेच्या निर्मितीच्या प्रक्रियेत अनेक महत्त्वाच्या सूचना केल्या होत्या. त्यांपैकी काही सूचना घटना परिषदेने मान्य केल्या; परंतु काही सूचनांची जबाबदारी स्वातंत्र्यानंतर प्रस्थापित होणार्‍या नव्या सरकारवर सोपवली. जगातील सर्वच घटनाकारांसमोर आपापल्या देशाला एकसंध कसे ठेवायचे आणि राष्ट्राचे विघटन कसे होणार नाही, यासंबंधी घटनात्मक विनिमयाद्वारे काही खंबीर तरतुदी कशा करायच्या, हा एक जटिल प्रश्न असतो. भारतासारख्या देशात या प्रश्नाने अतिशय गंभीर आणि उग्र रूप धारण केले होते. एक तर भारतात अनेक संस्थानिकांची राज्ये होती आणि त्यांपैकी अनेक स्वत:ला सार्वभौम समजत होती. त्यामुळे ती सतत त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाची मागणी करीत होती. काश्मिरचा राजा हरिसिंह आणि हैदराबादचा निजाम ही त्यांची ठळक उदाहरणे आहेत. हे सर्व प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने डॉ. आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेद्वारे जे संघराज्य स्थापन केले, त्याचे स्वरूप परंपरागत संघराज्याच्या कल्पनेपेक्षा पूर्णपणे वेगळे होते.
ज्या काळात भारतीय राज्यघटनेची निर्मिती चालू होती, त्या काळात अमेरिकन संघराज्य हे एक आदर्श संघराज्य मानले जात होते. अमेरिकेच्या राज्यघटनेत तेथे असलेल्या राज्यांचे स्वतंत्र अस्तित्व मान्य केलेले होते आणि अशा स्वतंत्र राज्याचे एक संघराज्य बनविले गेले होते. म्हणूनच आपण अमेरिकन राज्यघटनेत राज्यांना अधिक अधिकार आणि स्वातंत्र्य दिलेले पाहतो. याउलट भारतात एक तर उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांत सांस्कृतिक दरी मोठी होती आणि दक्षिणेकडील राज्यांना उत्तरेकडील राज्यांच्या राजकीय आणि सांस्कृतिक वर्चस्वाची सतत भीती वाटत होती. उत्तरेकडील उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि राजस्थान यांसारख्या विस्तीर्ण भूप्रदेश आणि मोठी लोकसंख्या असलेल्या राज्यांची भाषा एक तर हिंदी होती किंवा हिंदीला जवळ असलेली अन्य भाषा होती. याउलट, दक्षिण भारतातील प्रमुख राज्ये म्हणजे कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू ही आकाराने लहान आणि संख्येने कमी होती. त्यामुळे दक्षिण भारताच्या मनातील भीती अगदीच निराधार नव्हती. त्यामुळे बाबासाहेबांनी राज्यघटनेत संघराज्य Federation असा शब्द न वापरता Union of the states असा शब्द वापरला आहे. याचा अर्थ भारत हा मुळातच एकसंध देश आहे आणि त्यातील राज्यांची निर्मिती ही प्रशासकीय सोयीसाठी केलेली आहे. त्यामुळे भारतीय राज्यघटनेत आपण केंद्र आणि राज्य यांच्यात झालेल्या अधिकार विभागणीत केंद्राला जास्त अधिकार मिळाल्याचे पाहतो. भविष्यकाळात घटकराज्यांनी या ‘राज्यांच्या’ संघातून, Union of the statesमधून फुटून निघू नये म्हणून केलेली ही तरतूद आहे. राज्यघटनेत ‘संघराज्य’ या शब्दाऐवजी ‘राज्याचा संघ’ ही शब्दरचना जाणीवपूर्वक केली आहे; परंतु त्यामुळे अनेकांनी आंबेडकरांना टीकेचे लक्ष्य बनवले. घटना समितीचे एक सदस्य तर भारतीय संघराज्याबद्दल बोलताना असे म्हणाले होते, की ‘डॉ. आंबेडकरांनी राज्यघटनेत राज्यांना नगरपालिकांच्या दर्जावर आणून ठेवले आहे.’ या टीकेत काहीप्रमाणात तथ्यांश असला, तरी स्वातंत्र्योत्तर भारतात राज्याच्या अस्मितेचा पुरस्कार करणार्‍या अनेक चळवळी झाल्या; परंतु कोणत्याही राज्याला भारतातून फुटून आपले स्वतंत्र अस्तित्व, स्वतंत्र देश म्हणून प्रस्थापित करता आले नाही.
भारताच्या सुरक्षिततेसाठी आणि एकात्मतेसाठी भारताची दक्षिण आणि उत्तर अशी जी विभागणी झाली, तिला डॉ. आंबेडकरांचा विरोध होता. त्यांच्या मतानुसार, भारताची एकता आणि अखंडता अधिक प्रभावी करण्यासाठी जोपर्यंत प्रत्येक भारतीयाने प्रांतीय, विभागीय व भावनात्मक गोष्टी आहेत, त्या दूर केल्या पाहिजेत व त्यासाठी भारताच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यांची पुनर्रचना करणे गरजेचे आहे. केवळ एकच भाषा जास्त बोलणार्‍या लोकसंख्येसाठी एक स्वतंत्र राज्याची संकल्पना बाबासाहेबांना मान्य नव्हती. एकभाषीय लोकसंख्येमुळे वांशिक, भाषिक असे स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व ते निर्माण करतील व त्यातून विभागीय असमतोल व भाषीय, प्रांतीयवाद निर्माण होईल. भारताच्या विकासावर त्याचा विपरीत परिणाम होईल व त्यातून अंतर्गत सुरक्षा निवारण आणि व्यवस्थापनाबाबतीतही विविध प्रश्न निर्माण होतील. आजही बिहारमधून आलेल्या लोकांना किंवा युवकांना महाराष्ट्रात किंवा आसाममध्ये विरोध होतो, याचे मूळ कारण विकासाचा असमतोल हे माहीत असूनसुद्धा आमची राजकारणी मंडळी प्रांतीय आणि भाषिक वादावरच अधिक चर्चा करतात व मूळ प्रश्न बाजूला ठेवतात. बाबासाहेबांच्या मते, एकच भाषा बोलणार्‍यांची जर विविध प्रांतांत विभागणी केली, तर त्यांच्यात प्रांतीय व भाषीय अशी एकभावना निर्माण होणार नाही. परिणामी, त्यामुळे राष्ट्राचा विकास चांगला होऊ शकतो. शिवाय, जी मोठी राज्ये पुनर्रचना आयोगाद्वारे निर्माण केली आहेत, त्या राज्यांचीही लहान राज्यांत निर्मिती करावी म्हणजे प्रशासकीय कामे सोपी होतील. शिवाय, त्यांच्या मनामध्ये राष्ट्राच्या एकात्मतेची भावना अधिक निर्माण झाल्यामुळे ती लहान राज्ये केंद्र सरकारला आव्हान देऊ शकणार नाहीत. म्हणून बाबासाहेबांनी लहान राज्ये निर्माण करावीत, अशी सूचना राज्य पुनर्रचना आयोगास केली होती.
राज्यांचा आकार आणि विभागणी : ब्रिटिश सरकारने आपल्या राज्यकारभारासाठी त्यांना उपयुक्त ठरतील, अशा पद्धतीने प्रांतीय विभागणी केली. त्यात बिहार, सिंध, आसाम, ओरिसा यांचा सहभाग आहे. ज्या वेळेस भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्या वेळेस जवळजवळ ५00 संस्थाने होती व त्यांना राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणणे व राष्ट्राची एकात्मता टिकवणे हे फार कठीण काम होते. शिवाय ५00 संस्थानांच्या विलीनीकरणाबरोबरच नवीन राज्ये निर्माण करणे व त्यांच्या सीमा निश्‍चित करणे हे मोठे जिकिरीचे काम होते. त्यामुळे भारताची प्रशासकीय दृष्टीने विविध झोनची निर्मिती करणे किंवा प्रशासकीय बाबींसाठी भारताची विविध प्रांतीय भागांत विभागणी करणे, आवश्यक होते. ती भारताच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय फायद्यासाठी उपयुक्त ठरेल व दुसरे म्हणजे भारत हा बहुभाषिक, बहुप्रांतीय, बहुसंस्कृती देश असल्याकारणाने भाषावार प्रांताची रचना करावी, अशी भूमिका घेण्यात आली.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते १९२१-२२पासून भाषावार प्रांताची रचना करावी, अशी मागणी करत होते; पण नंतर काँग्रेसने आपली भूमिका बदलली व भारतीय नागरिकत्वाची भूमिका घेतली; पण त्याचवेळी मुस्लीम नेत्यांनी फुटीरतावादी भूमिका घेऊन द्विराष्ट्रवादाची संकल्पना मांडली. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने तो मुद्दा व स्वातंत्र्याच्या वेळी भाषावार प्रांताची भूमिका हे दोन्हीही बाजूला ठेवण्यात आले. पण, त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९२८ ते १९५६ या कालावधीत भारताच्या राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडतेसाठी जे विविध क्रांतिकारी बदल सुचविले होते, ब्रिटिश कालावधीत बाबासाहेबांनी १९२८मध्ये सायमन कमिशनपुढे साक्ष देताना भाषावार प्रांताची भूमिका फेटाळून लावली होती. त्याचबरोबर त्यांनी भीती व्यक्त केली, ती म्हणजे भाषावार प्रांतामुळे स्थानिक राष्ट्रवाद प्रांतीय किंवा विभागीय वाद व स्थानिक लोकांमध्ये स्वत:चे जे अस्तित्व आहे, ते जोपासण्यासाठी चढाओढ लागेल व त्यामुळे भारताच्या स्थैर्याला आणि विकासाला खीळ बसेल व त्यामुळे आपण सर्व भारतीय एक आहोत, अशी एकतेची भावना आपल्यामध्ये निर्माण होणार नाही.
बाबासाहेबांनी भाषावार प्रांतरचनेला दोन कारणांसाठी विरोध केला होता, एक म्हणजे विभागीय जागरूकता निर्माण होऊन राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो व दुसरे म्हणजे एका जातीच्या लोकांकडे राज्याची सत्ता किंवा सरकारे हस्तांतरित होऊ शकतात, बाबासाहेबांनी राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनाचा विचार करून मांडले होते, तेच आजही आपल्याला प्रेरणादायी आहे हे चिार ती कारण आजही भारताच्या अंतर्गत सुरक्षेचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा प्रांतीय व भाषावादामुळे किंवा राज्या-राज्यांमधील सीमा प्रश्न, पाणीवाटप व केंद्र सरकारद्वारे दिली जाणारी आर्थिक मदत यांवर विविध विरोधाभासी भूमिका आपल्याकडे आढळते. आजही काही राज्यांची सरकारे एका विशिष्ट जातीच्या गटाच्या लोकांकडेच आहेत. त्यामुळे लोकशाहीच्या प्रक्रियेत सामान्य माणसाच्या मूल्याचे जातीपातीच्या राजकारणात पतन होत आहे. स्वातंत्र्यानंतरही बाबासाहेबांनी या विषयाबाबत चिंतन, मनन करून भाषावार प्रांतरचनेबाबत आपले मत प्रदर्शित केले होते. बाबासाहेबांचे या संदर्भातील विचार. आजही चिंतन करावेत असेच आहेत.
लेखक- डॉ. विजय खरे. (लेखक पुणे विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राचे संचालक आहेत.)
धन्यवाद- दै. लोकमत.

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...