प्लास्टिकच्या कपात पॉयझनच!

घातक रसायनांमुळे कॅन्सर, अल्सर, त्वचारोगांसोबतच वंध्यत्वाचाही धोका...
धावपळीच्या दिनचर्येत फक्कड चहाचा एक घोटसुद्धा ताजेतवाणे करतो. पण, आपण हा चहा प्लास्टिकच्या कपात घेत असाल तर सावधान! प्लास्टिकच्या कपात सतत चहा किंवा गरम पदार्थ घेणे आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. गरम पदार्थांमुळे प्लास्टिकमधील घातक रसायने त्यात विरघळतात. पोटात जातात. आता तर प्लास्टिकच्या बाटलीतील औषधेही सुरक्षित नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 

चहाचा घोट घेतल्यानंतर थोड्यावेळासाठी तरतरीत वाटत असले तरी त्यातून शरीरात जाणाऱ्या घातक रसायनांमुळे कॅन्सर, अल्सर आणि त्वचारोगांना आमंत्रण मिळते. प्लास्टिकची बाटली किंवा कपात बिस्फिनॉल-ए आणि डायथॉइल हॅक्सिल फॅलेट आदी घातक घटक आढळतात. गरम पदार्थाच्या संपर्कात आल्यास ते त्यात विरघळतात. प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पिणेही आरोग्याच्यादृष्टीने घातक आहे. स्वच्छतेसाठी म्हणून बाटली वारंवार धुतली जाते. या धुण्याने त्यातील रसायने पाण्यात मिसळू लागतात. त्यातून शरीरात हार्मोन्सचे बॅलन्स बिघडते आणि कॅन्सर व त्वचा रोगांचा धोका वाढतो, असे रॉकलॅन्ड रुग्णालयाचे डॉ. एम. पी. शर्मा यांनी सांगितले. 

जेवढे गरम तेवढेच घातक खाद्य पदार्थांसाठी प्लास्टिकच्या भांड्यांचा वाढता वापर घातक आहे. सतत प्लास्टिकच्या कपातून चहा पिणे, प्लास्टिक बॉटल आणि प्लेट्सचा वापर करणे हे आरोग्याच्यादृष्टीने घातकच आहे. जेवढा गरम पदार्थ यात दिला तेवढी घातक रसायने झटपट मिसळतात. त्यातून येणारे काही रासायनिक पदार्थ हे डाऊन सिंड्रोम आणि काही मानसिक आजारांस कारणीभूत ठरतात. प्लास्टिकची बॉटल उन्हात गरम होत असेल तरी त्यातील पाणी पिणेही घातक आहे. त्यामुळे प्लास्टिकचे कप, बाटल्या, ताटांचा वापर शक्य तेवढा कमी ठेवणेच आरोग्याच्या हिताचे आहे, असे डॉ. दास यांनी सांगितले.
धन्यवाद : महाराष्ट्र टाईम्स

पुण्यातील मुलुखावेगळा रिक्षाचालक !

आजारपणात अथवा अपंगत्व असो मध्यमवर्गीय नागरिक सोय म्हणून रिक्षाचा वापर करतात. मात्र अनेकदा या रुग्णांच्या किंवा अपंग व्यक्तींच्या वाहतुकीसाठी रिक्षावाले तयार होत नाहीत, हा अनेकांचा अनुभव आहे. मात्र, पुण्यात एक रिक्षाचालक रुग्णांची आणि अपंगांची वाहतूक करायला कधीच नाही म्हणत नाही. तर उलट त्यांना मदत व्हावी या उद्देशाने, त्यांनी गेली अडीच वर्षे ही वाहतूक कोणताही मोबदला न घेता केली आहे.

अजीज इनामदार या जेमतेम ३५ वर्षे वयाच्या रिक्क्षाचालकाने हे रूग्णसेवेचे व्रत अंगीकारले आहे. याला कारण आहे त्यांच्यावर गुदरलेला प्रसंग. अजीज यांची पत्नी काही वर्षांपूर्वी पेरालिसिसने आजारी पडली आणि जादा सुट्ट्यांच्या कारणानं हातची नोकरीही गेली. जगण्यासाठी पैसा लागतो आणि त्यासाठी काहीतरी काम तर केलच पाहिजे म्हणून शेवटी इनामदार यांनी रिक्षा चालवायचा निर्णय घेतला. रिक्षा चालवून जे काही पैसे हातात पडतील त्यावर तीन मुलं, पत्नी असा पाच जणांच्या कुटुंबाचा गाडा इनामदार
हाकतात. मात्र, पत्नीच्या आजारपणात तिला रुग्णालयात नेताना त्यांना फार त्रास सहन करावा लागला. एकतर रुग्णालयात जायला लवकर वाहन मिळायच नाही, मिळालं तरी रिक्षावाले भाडं नाकारायचे. शेवटी अक्षरश: स्वत: उचलून घेत त्यांनी आपल्या आजारी पत्नीला अनेकदा रुग्णालयात नेले आहे. आपल्याबाबतीत जे झालं, ते इतर रुग्णांच्या बाबतीत होऊ नये असा निश्चय अजीज यांनी केला आणि मग त्यातून अजीज यांनी सुरू केली ही आगळीवेगळी समाजसेवा !

आपल्या रिक्षाच्या धंद्यातून वेळ काढत इनामदार आपल्या परिसरातील रुग्ण आणि अपंगांची मोफत वाहतूक गेल्या अडीच वर्षांपासून करत आहेत. यामध्ये आपल्याला समाधान मिळते असे ते सांगतात. अनेकदा गरीब रुग्णांकडे औषधासाठीही पैसे नसतात, तर वाहतुकीसाठी पैसे देणार कसे. अशांना या मोफत वाहतुकीमुळे खूप मोठा दिलासा मिळतो. त्यावेळेला त्यांच्या डोळ्यांतील समाधान माझ्यासाठी मोलाच आहे
असे इनामदार म्हणतात. तसेच इतर रिक्षाचालकांनीही रुग्ण आणि अपंगाची वाहतूक करणे न टाळता त्यांना मदत करावी असेही ते आवर्जूनपणे सांगतात.

ज्या गरजू रुग्णांना रुग्णालयात जायचं असेल, मेडिकल मध्ये जायचं असेल किंवा अपंगांना कोणत्या कामासाठी बाहेर जायचं असेल ते अजीज इनामदार यांना ९६५७८७८६१५ दूरध्वनीवरून संपर्क साधू शकतात. अनेकदा रिक्षावाल्यांना त्यांच्या सोईने भाडे हवे असतात, त्यामुळे प्रवासी आणि रिक्षाचालक यांच्यात नेहमीच वाद होतात. त्यातही रुग्ण, अपंग प्रवासी म्हटले की भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांच्या डोळ्यात अजीज इनामदारांनी आपल्या या मोफत सेवेच्या माध्यमातून झणझणीत अंजन घालत समाजसेवेच एक उदाहरणच घालून दिले आहे.

पर्यावरणामध्ये प्रत्येक गोष्टीला वेगळे महत्व आहे. आणि या महत्वपूर्ण गोष्टीमधील साप हा सुद्धा महत्वाचा घटक आहे.

आता पावसाळा सुरू होत आहे.या काळात जंगल जिवंत होऊन उठते.प्रत्येक प्राण्याच्या हालचाली वाढतात.त्यामध्ये सापाचाही समावेश होतो पण साप हा प्रकार मानवाच्या मनात इतक्या खोलवर भिती निर्माण करून बसला आहे की,एखाद्या व्यक्तीला समजवणे फार कठीण होते.याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या पूर्वजांच्या काळात दवाखाने,हॉस्पीटल,डॉक्टर उपलब्ध नव्हते.जंगले मोठी व घनदाट होती.लोकवस्ती लहान व घरे साधी होती.रस्ते व पायवाटा तितक्याशा उपलब्ध नव्हत्या यामुळे वन्यजीवांची प्रामुख्याने सापांच्या हालचाली जास्त होत होत्या.अशामुळे एखाद्या व्यक्तीला विषारी सर्पदंश झाला असावा.औषधोपचार उपलब्ध नसल्याने काही वेळात ती व्यक्ती मृत्यूमुखी पडली असावी.या घटनेमुळे तिथल्या लोकांमध्ये सापांविषयी भिती निर्माण झाली असावी व स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी दिसेल तो साप मारायला सुरूवात केली असावी.पुढे पिढ्यान्‌पिढ्या हि गोष्ट पसरत जाऊन संपूर्ण भारतभर अशा गोष्टींचा प्रसार झाला.

भारतामध्ये 278 जातीचे साप सापडतात.यापैकी फक्त 72 साप विषारी आहेत.महाराष्ट्रामध्ये 52 जातीचे साप सापडतात त्यापैकी फक्त 10 सापच विषारी आहेत.या 10 सापांपैकी मानवाचा फक्त 4 विषारी सापांसोबत सामना होतो.बाकीचे 6 साप खूप दूर्मिळ आहेत.पावसाळ्यामध्ये उंदिर,बेडूक,सरडे,पाली अशा प्राण्यांची संख्या व हालचाली वाढतात.परिणामी साप या भक्ष्यावर आकर्षित होऊन आपल्या घरापर्यंत येण्याची शक्यता असते.महाराष्ट्रामध्ये आढळणारे 52 जातीच्या सापांपैकी 42 साप बिनविषारी आहेत या सापांमधील काही दुर्मिळ जातीचे साप आपल्या घराजवळ येऊ शकतात पण हे साप बिनविषारी असून या सापांपासून मानवाला काही अपाय नसतो.पण सापांबद्दलची अनुवांशिक भिती शास्त्रीय अज्ञान व माहितीचा अभाव यामुळे लोक दिसेल तो साप मारून टाकतात.सापाला मारण्याची काहीच गरज नसते कारण साप कधीच मानवाला उगाच चावत नाही किंवा डूख धरत नाही किंवा मागावरही येत नाही.कारण सापांच्या मेंदूचा विकास झालेला नाही त्यामुळे त्यांच्या स्मरणात काहीच राहत नाही.सापांना आपली प्रतिमा कृष्णधवल दिसते.सापांना लांबी व रूंदी कळते.जाडी कळत नाही कारण,सापांची दृष्टी द्विमितीय असते.सापांना 6 फूटापलिकडे अंधूक दिसते त्यामुळे साप व्यक्ती ओळखू शकत नाही.यातही आता गावोगावी दवाखाने हॉस्पीटल झाले आहेत.प्रत्येक गावांमध्ये सर्पमित्र तयार झाले आहेत.त्यामुळे सापांपासून घाबरण्याचे कारण राहिलेले नाही.सापांबद्दलची माहिती आता डॉक्युमेंटरी,पुस्तके,जनजागृती कार्यक्रम,बॅनर्स,पोस्टर्स द्वारे दिली जाते यामुळे साप तितका भयावह प्राणी राहिलेला नाही.प्रत्येक माणसाने सापांना जाणून घेऊन त्यांची शास्त्रीय माहिती वाचली तर साप किती शांत व भित्रा प्राणी आहे हे लक्षात येते.
उपाय:
साप आपल्या घराजवळ येऊ नये म्हणून काय कराल ?
¤ घराजवळ पालापाचोळा साचू देऊ नका.भिंतीच्या भेगा व बिळे बुजवावीत.गोवय्रा व सरपणाची लाकडे घरापासून दूर व उंचावर ठेवावीत.
¤ शेतात किंवा घराबाहेर झोपताना शक्यतो जमिनीवर झोपू नये.कॉटचा पलंगाचा वापर करावा.खरकटे व कचरा घरापासून लांब अंतरावर टाकावा.
¤ पाळीव प्राणी,ससे,पोपट,कोंबड्या घरापासून दूर व उंचावर ठेवावेत.
- सदाफ कडवेकर

मी प्रथम भारतीय आणि अंतत: भारतीय !!

प्रत्येक राष्ट्राचा विकास हा त्या राष्ट्रातील नागरिकांच्या बहुआयामी विकासावर अवलंबून असतो. भारतासारख्या देशाला लागलेली जातीयतेची किड हा देशावरील सर्वात मोठा कलंक आहे. हा कलंक धुवून काढणे आणि जातीयता मुक्त भारत राष्ट्राची निर्मिती करणे हेच एकमात्र उद्दिष्ट घेऊन आकारास आलेल्या ‘कॅम्पेन फॉर कास्ट फ्री इंडीया’ या अभियानाचे भूमिकापत्र आम्ही आपणास सादर करित आहोत.
जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशाचे आपण नागरिक. आपला देश बदलत्या काळासोबत अधिकाधिक विकसित होण्यासोबतच येथील प्रत्येक नागरिक सुखी, समृद्धी आणि संपन्न व्हावा या इच्छेने प्रत्येकाचे मन तळमळत असते. परंतू सत्य परिस्थिती नेमकी याच्या उलट असल्याचे आपणास पहायला मिळत आहे. नानाविध धर्म, शेकडो पंथ, हजारो जाती समुहात विभागला गेलेला भारतीय समाज हा वरकरणी जरी एक वाटत असला तरी राष्ट्रीयत्वाच्या भावनेखाली त्यांचं एकत्रितपण अजूनही तितकेसे विकसित झालेले नाही हेच कटू सत्य आहे.

जातीयवादाच्या विषवल्लीने पोखरलेला येथील पुरातन समाज आजही जातीय विद्वेषाच्या पखाली बेमालूमपणे वाहताना आपण पाहत आहोत. गेल्या काही वर्षांत वेगाने कार्यन्वित झालेल्या कट्टर धर्मांध प्रवृत्ती, भांडवली संस्था विशेषकरून जातीयवादाला बळकटी देणाऱ्या आणि क्रोनी कॅपटलीझम चा पुरस्कार करणाऱ्या उद्योजक घराण्यांचा राजकारणातील वाढता हस्तक्षेप सोबतच जातीय अत्याचारांची वाढती प्रकरणे हे एका सशक्त समाजाचे उदाहरण असूच शकत नाही.

भारतीय समाज हा इतक्या गुंतागुंतीने विभागला जाण्याचे एकमात्र कारण म्हणजे इथली जातीव्यवस्था आणि जातीव्यवस्थेतून उगम पावलेली जात-वर्ग-पितृसत्ताकवादी मानसिकता. स्वातंत्र्याने पासष्टी प्रवेश केलेला असताना देखील देशातील जातीय असमानता आपण संपवण्यात अयशस्वी ठरलो आहोत. याला एकमात्र जबाबदार घटक ही जातीयताच आहे.

आज देशातील प्रत्येक नागरिक दुस-या नागरिका पासुन जातींमुळे दुर झाला आहे. त्यांच्यात उच्च-नीच, द्वेष आणि शत्रुत्वाची भावना निर्माण झाली आहे. समतामधिष्ठित समाजाच्या निर्मितीसाठी प्रत्येकाच्या मनात बंधुत्वाची भावना निर्माण होणे गरजेचे आहे. त्यातूनच एकतेचे तत्व अंमलात आणले जाऊ शकते. देशातील राजकिय, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समस्यांना प्रभावीपणे सोडवण्यासाठी समता आणि समानतेचे तत्व आचरणात आणणे गरजेचे आहे

जो पर्यंत या देशात बंधुत्वाची भावाना रुजत नाही तोपर्यंत ईथे लोकशाही देखील ख-या अर्थाने रुजणार नाही व पर्यायाने या देशाचे राष्ट्रनिर्माण होऊ शकत नाही. जाती हि देशाच्या बंधुत्वाच्या पर्यायाने एकतेच्या-अखंडतेच्या आड येणारी कृत्रिम व्यवस्था आहे व राष्ट्रविरोधी देखील आहे. त्यामुळे जातीव्यवस्था नष्ट करणे हे प्रत्येक राष्ट्रप्रेमी भारतीयाचे आद्य कर्तव्य आहे. जातीमुक्त राष्ट्राची निर्मिती करणे हीच या अभियानाची मुख्य भूमिका आणि गाभा आहे. एका भारतीयाला दुस-या भारतीयापासुन दुर करणारी, त्यांच्यात बंधुत्वा ऐवजी शत्रुत्व निर्माण करणारी जातीव्यवस्था नष्ट करणे हि काही एका विशिष्ट जातीची नाही तर प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरीकाची जबाबदारी आहे.

‘कॅम्पेन फॉर कास्ट फ्री इंडिया’ हे अभियान देशभरातील तमाम समविचारी संघटनांना एकत्रित आणून एका किमान समान कार्यक्रमाअंतर्गत कार्यान्वित करण्यासाठी जबाबदार असणार आहे. जातिनिर्मूलनाच्या कार्यात सहभागी असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना जातीमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी एका किमान समान कार्यक्रमावर एकत्र आणण्याची जबाबदारी हे अभियान उचलणार आहे.

येत्या काळात जातीय अत्याचारासंदर्भात असलेली उपाययोजना अत्यंत कठोर पद्धतीने राबवली जाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व उपाययोजनांचा पाठपुरावा करण्याची भूमिका हे अभियान घेत असून जातीमुक्त भारत राष्ट्राच्या निर्मितीचा संकल्प आम्ही करत आहोत.
- Vaibhav Chhaya

त्यांच्या साहसाला सलाम...

आंध्रप्रदेशातील आदिवासी कुटुंबातील १३ वर्षिय पूर्णा ठरली एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वात तरूण मुलगी. विशेष म्हणजे आपला आदर्श असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं छायाचित्रही तिने एव्हरेस्टवर सोबत नेलं होतं.

काही लोक बोभाटाच जास्त करतात आणि आदर्शांना कमीपणा आणतात. तर पूर्णा सारखी लहानगी आपल्या पराक्रमाने आदर्शांना मानवंदना देते. हे इथे आपण लक्षात घेतलं पाहिजे.

मालवथा पूर्णा आणि साधनापल्ली आनंद कुमारया दोन मुलींनी आज एवरेस्ट हे जगातील सर्वोच्चशिखर गाठले. यातील एक आदिवासी तर दुसरी दलित. पूर्णा १३ वर्षाची व आनंद कुमार१६. एकीचे वडील शेतीकाम करतात तर दुसरीचे सायकल दुसृस्तीचे. दोन्ही आंध्र प्रदेशातील आहेत.

दोघींचे लक्ष्य आयपीएस अधिकारी बनणे आहे. निश्चितच ते आपले लक्ष्य प्राप्त करतील कारणत्यांचे आदर्श आहेत कर्तृत्वाचे हिमालय डॉ.बाबासाहेब आंबेडकर ! बाबासाहेबांची प्रतिमा घेऊन शिखराच्या टोकावर पोहचल्या.

अनेक सुखवस्तू दलित ब्राह्मणांना जयभीम म्हणायची लाज वाटते, भीमराजच्या बेटींनी जगातल्या सर्वोच्च शिखरावरून उच्चरवाने जयभीम ठोकला. त्यांच्या साहसाला सलाम आणि कोट्यवधी जीवांना प्रेरणा व शक्ती देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शतकोटी अभिवादन !

"The world is very small", when Poorna spoke outthese words from atop Mount Everest, she capturedthe magnitude of achievement, an inspiring tale forgirls in India. At just 13 years and 11 months old, Malavath Poorna, daughter of farm labourers from Nizamabad district of Andhra Pradesh has becomethe youngest woman to scale Mount Everest, thehighest mountain peak in the world. On this uniquemission, she was accompanied by Sadhanapalli Anand Kumar, who is the son of a cycle mechanicfrom the state's Khamman district. They havebecome the first Dalits
to conquer the tallest peak.The teenagers, Poorna and Anand, symbolicallycarried photographs of Dr. BR Ambedkar andformer IAS officer SR Sankaran, and hoisted the National Flag at the top of the world. Aiming to be an IPS officer, Poorna, coming fromfamilies that struggle to simply survive to the topof the world is a long journey that would inspiremillions across the country.
Post By : Vishal Sonawane, Raj Asrondkar, Anand Gaikwad, Milind Patil

रिपोर्ताज.. Action Against Anti Social Facebookers

फेसबुक वर जे देशद्रोही विध्वंसक पोस्ट टाकतील आपले गृप मेंबर त्या पोस्टचा रिपोर्ट फेसबुक ला करणार जेणेकरून ती पोस्ट लागलीच डीलीट होणार. चला तर तर मग या समाजपरिवर्तानाच्या लढ्यात सहभागी होवूया... कोणत्याही आक्षेपार्य पोस्ट बाबत १६०० तक्रारी (रीपोर्ट) गेल्यास ५ मिनिटांत फेसबुक ती पोस्ट काढून टाकते. त्यासाठी कोणत्याही आक्षेप असणारया पोस्ट ला लाईक किंवा शेअर करण्याऐवजी रिपोर्ट करा.

रिपोर्ताज.. Action Against Anti Social Facebookers गृप-

https://www.facebook.com/groups/294227280751104/

गृप प्रमुख (ADMIN)-

१ प्रदीप बोरगे.
२ निलेश कळसकर.

३. वैभव छाया.
४. अभिषेक ठमके.

चला जनप्रबोधन करुया । झोपलेल्याना जागे करू या ।।

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...