भूकंप पूर वादळापेक्षा जास्त मुडदे हे साम्राज्य आणि धर्म यांच्या नावाखाली पडलेत !!

भूकंप पूर वादळापेक्षा जास्त मुडदे हे साम्राज्य आणि धर्म यांच्या नावाखाली पडलेत !!


 




प्रत्येक माणूस त्याच्या तथाकथित धर्मापेक्षा त्याच्या मानसिक जडणघडणीप्रमाणे जास्त वागतो. बर्याचदा त्याच्या स्वार्थासाठी त्याच्या धर्माची तत्त्व शिताफीने वाकवायला मोडायला मागे पुढे पाहत नाही, मग अशावेळी तो त्याच्या धर्माच्या नावाखाली अविवेकी कृत्य करतो. धर्म माणसाच्या जगण्याचे सर्वसाधारण नितीनियम असे मानले तर प्रत्येक धर्मात समविचार आहेतच की. आपण जे जे विषम आहे त्यावर बोट ठेऊन दंगा घालतो. दंगा म्हणजे डायरेक्ट दंगली. साम्राज्यवाद देखील धर्मप्रसाराचाच एक भाग होता. भूकंप पूर वादळापेक्षा जास्त मुडदे हे साम्राज्य आणि धर्म यांच्या नावाखाली पडलेत.



 

जगात शेकड्याने धर्म झालेत. अहो उडत्या तबकड्यांवर विश्वास ठेवणार्यांचाही एक युएफो धर्म आहे. जगाचं जाऊ दे किमान आपल्या देशाचं बघूयात. मला नेहमी प्रश्न पडतो, महावीराने वैदिक, बुध्दाने जैन किंवा वैदिक, येशूने बौध्द, पैगंबराने ख्रिस्ति, बसवेश्वराने इस्लाम आणि नानकांनी लिंगायत धर्म का स्विकारले नाहीत. उत्तर सोप्पयं, प्रत्येकजण आपापल्या सद्विवेकानुसार चालला, पुढे त्यांच्या त्यांच्या अनुयायांनी त्याचं अनुकरण केलं. अनुकरण वाईट नाही अंधानुकरण वाईट. धर्म आला की अंधानुकरण येते, येतेच. भिती दंभ यांची सुरुवात होते. मार्क्स धर्माला अफूची गोळी म्हणतो ते याचमुळे, धर्म नशा आहे, व्यसन आहे. एकही धर्म विवेकवादाशिवाय कामाचा नाही, माणूसपण खर्या अर्थाने समृध्द करायचं असेल तर धर्म नावाच्या घटकाची कात टाकावीच लागेल. धर्माच्या संकल्पनांनी विवेक संपतो आणि माणूसपण संकुचित होतं.



विचार- डॉ.आशिष तांबे.

असंवेदनांचा उत्सव... डीजेंचा कोलाहल, नेत्यांचा अतिउत्साह आणि विद्रूपतेचा कळस बेताल गोविंदांचा हैदोस !!

असंवेदनांचा उत्सव... डीजेंचा कोलाहल, नेत्यांचा अतिउत्साह आणि विद्रूपतेचा कळस बेताल गोविंदांचा हैदोस !!

 

  

डीजेचा ढणढणाट, राजकारण्यांची चमकोगिरी आणि मादक नाचगाण्याच्या धुंदीत हरवत चाललेल्या या सणामुळे सामान्यांच्या कानाबरोबरच जणू मनेही बधिर झाली आहेत. घरात साधे खेळताना पडणाऱ्या मुलाला पाहिले की काळजात चर्र होते. पण गोविंदा पथकांच्या सर्वात वरच्या थरावर पाच-सात वर्षांची चिमुरडी मुले सलामी देत होती. मनोरा पडल्यानंतर खाली कोसळणाऱ्या या कोवळ्या शरीरांशी जणू कुणालाच काही देणेघेणे नव्हते. माणुसकीला पायदळी तुडवत दहीहंडीचा उत्सव साजरा होत होता. कुणाचा हातपाय मोडला तर बाजूलाच उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेत टाकून रुग्णालयात रवानगी व्हायची. या जखमी गोविंदांचे जणू कुणालाच सोयरसुतक नव्हते. असंवेदनांचाच उत्सव जागोजागी पाहायला मिळत होता.






एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून पारंपरिक वाद्यांच्या तालावर दारोदारी नाचत फिरणारे गोविंदा कुठे आणि हजारो, लाखोंच्या हंडीसाठी आपला जीव धोक्यात घालणारे गोविंदा कुठे असा प्रश्न आजच्या विचकट उत्साहामुळे अनेक प्रेक्षकांच्या मनात घोळत होता. पूर्वी आपल्या दारात नाचत येणाऱ्या बालगोपाळांच्या तोंडात प्रेमाने दहीपोह्य़ाचा घास भरविला जायचा. आताच्या थकलेल्या गोविंदांना वडापाव, पुलावाची पाकिटे आणि बिसलेरीच्या बाटल्या पुरविल्या जातात. त्यामुळे, रिकाम्या बाटल्यांचा आणि प्लॅस्टिकच्या प्लेटचा पडलेला खच रस्तोरस्ती दिसत होता.




महिलांना प्रोत्साहन देण्याच्या नावाखाली त्यांच्यासाठी विशेष बक्षिसे ठेवायची आणि दुसऱ्या बाजूला डान्सबारमध्ये शोभतील अशा दिलखेचक आणि मादक अदाकारी करणाऱ्या नृत्यांगना प्रेक्षकांना रिझविण्यासाठी मंचावर नाचवायच्या असा हिडीस उद्योग आयोजकांनी सुरू केला आहे. त्यामुळे दहीहंडीच्या जागी कुठे तमाशाच्या फडाचे तर कुठे डान्सबारचे रूप आले होते. ज्याचा आनंद लुटायचा, वेध घ्यायचा त्या दहीहंडीचा तर पत्ताच दिसत नव्हता. ती कुठे तरी खूप उंचावर क्रेनला अडकवलेली. तिचे जमिनीपासूनचे अंतर पाहूनच खाली उभ्या असलेल्या गोविंदा पथकांच्या पोटात गोळा येत होता. पण या धुंदीच्या वातावरणात तेही अलगद सापळ्यात सापडत होते.





दहीकाल्याच्या निमित्ताने दहीहंडी फोडण्यासाठी शहरभर संचार करणाऱ्या गोविंदा पथकांनी मुंबईत अक्षरश: हैदोस घातला. महिलांवरील अत्याचारामुळे मुंबई हादरलेली असताना गोविंदांनी येता-जाता मुली, महिलांची छेड काढत उत्सव ‘साजरा’ केला. आपली घागर बक्षिसांनी भरण्यासाठी भरधाव वेगाने बस, ट्रक, टेम्पो आणि दुचाकींवरून फिरणाऱ्या गोविंदांमुळे पादचारी आणि इतर वाहनचालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.







जन्माष्टमीच्या मुहूर्तावर दहीहंडी फोडल्यानंतर मुंबईत बुधवारी मध्यरात्रीनंतर भरधाव वेगात वाहने हाकून गोविंदांचा स्वैरसंचार सुरू झाला. गुरुवारी सकाळी ही मंडळी पुन्हा घराबाहेर पडली. दहीहंडी फोडून, अधिकाधिक माया गोळा करण्याची स्पर्धाच सुरू झाली. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यासाठी भरधाव वेगात बस, ट्रक, टेम्पो, दुचाकी हाकण्यात येत होती. सिग्नल तोडून फिरणाऱ्या गोविंदांना वाहतूक पोलिसांचे अजिबात भय नव्हते. दहीकाल्याच्या दिवशी दहीहंडी फोडण्यासाठी निघालेल्या गोविंदांनी वाहतुकीच्या नियमांचेच नव्हे तर सामाजिक नियमांचेही उल्लंघन केले. ठिकठिकाणी महिलांवर पाण्याने भरलेले फुगे, प्लास्टिकच्या पिशव्या भिरकावत असभ्यतेचे दर्शन काही गोविंदा पथकांनी घडविले. दारू पिऊन बेभान झालेले काही गोविंदा महिलांच्या छेडछाडीत आघाडीवर होते. खासगी गाडय़ा, बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांनाही असा त्रासदायक अनुभव आल्याच्या तक्रारी या महिलांनी केल्या. गोविंदांच्या या वर्तणुकीने मुंबईत दहिकाल्याच्या उत्साहाला गालबोट लावत बीभत्स काला केला. मुंबई विद्रूप करणाऱ्या फलकबाजीला आळा घालायाचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर पालिकेने मुंबईतील फलक काढून टाकले होते.दहीहंडी उत्सवाचे निमित्त साधून राजकीय नेत्यांनी फलकबाजी करत मुंबई पुन्हा विद्रूप केली. पालिकेची परवानगी न घेताच अनेकांनी फलक झळकवून न्यायालयाचाही अवमान केला आहे. यावरून न्यायालयाचीही भीती आयोजकांना राहिलेली नसल्याचे दिसले.








आज आपण ह्याचे फारच विकृत रूप पहात आहोत...आज नऊ ते अकरा थरा पर्यंत हंडी बांधली जाते....त्यात कित्येक लोकं जखमी होतात..कोणी दगावतात..आणि ह्याची साधना एक महिन्या पासून चालू असते...म्हणजे विचार करा आता पर्यंत कित्येक लोकं जखमी अथवा पंगु अथवा दगावले असतील ह्याचा नेम नाहीं..आजच सकाळी मी वाचले की ४०० जान इस्पि तळात शामील झाले आहे..त्यात २० जन कायमचे पंगु झाले आहेत...काही लोकं दगावतील सुद्धा... मी म्हणतो जर हाच जमाव कुठल्या सोशल कार्य जसे झाडं लावणे..शहर साफ करने...किंवा सिविक सेन्स म्हणजे नक्की काय ह्याचे शिक्षण देण्यासाठी जर जमा झाला तर आपले जगच निराळे असेल...तुमचे काय मत आहे ?? (By - Kamlesh M Vaze)




संदर्भ- http://www.loksatta.com/mumbai-news/dahi-handi-utsav-festival-of-insensitivity-184352/2/




धन्यवाद- दै. लोकसत्ता , कमलेश वाझे.

पोटासाठी ते विकत घेतात आजार !!

पोटासाठी ते विकत घेतात आजार !!


 




रखरखत्या उन्हातील लग्नसराईच्या माहौलमध्ये फटाक्‍यांची आतषबाजी आणि या वातावरणात बॅंड वाजवणारे कलाकार वरातीचे प्रमुख आकर्षण असतात. मात्र, प्रचंड उकाड्यातही अंगावर भरजरी वस्त्र लेऊन बॅंडवाले "ट्रम्पेट', "सेक्‍सोफोन'मध्ये छाती फुटेपर्यंत हवा फुंकत असतात. त्यांच्या भुकेल्या पोटातून निघणाऱ्या संगीताच्या सुरांवर लग्नसोहळ्याचा आनंद वरातीतून ओसंडून वाहत असतो. सुरांचा आनंद देणाऱ्या वाजंत्रींना मात्र दमा, कॅन्सर, टीबी आणि फुफ्फुसांच्या आसुरी आजाराचा घट्ट विळखा असल्याचा डॉ. अशोक कांबळे यांचा पीएचडी प्रबंधातील निष्कर्ष हेलावून टाकणारा आहे.

 


कुटुंबाचा आर्थिक गाढा ओढण्यासाठी शरिराला जडणाऱ्या व्याधी आणि वेदनांकडे दुर्लक्ष करणारा हा बॅंडवाला चितारताना डॉ. कांबळे यांनी वाजंत्री समाजाच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थितीचे आकडेवारीतून विष्लेषणात्मक असा ५८० पानांचा प्रबंध विद्यापीठाला सादर केला आहे. नागपूर जिल्ह्यात मातंग समाजाची संख्या ५० हजारांच्या घरात असून, ४२८ बॅंड पार्टीमधील ९ हजार कलावंतांची स्थिती पारखून डॉ. कांबळे यांनी निष्कर्ष काढले आहेत.

 


इतिहासाकडे एक नजर-


 


बॅंड वाजवणारे कलावंत मुख्यतः मातंग समाजाचे. हा त्यांचा पिढीजात व्यवसाय. मातंग शब्दाच्या व्युत्पत्तीपासून तर राज्यात ३५ लाखांवर असलेल्या समाजाच्या वेदनांना त्यांनी या प्रबंधातून वाट करून दिली. मार्च, एप्रिल आणि मे हे तीन महिनेच बॅंडवाल्यांच्या कमाईचे दिवस. तीन महिने तुमच्या-आमच्या आनंदात सहभागी होणाऱ्या या बॅंडवाल्यांचा इतिहास डॉ. कांबळे यांनी शोधून काढला. स्वातंत्र्यापूर्वी राजे, महाराजे यांच्या काळातही मातंग समाजाचे बॅंडपथक राजदरबारी असायचे. त्यावेळी "मसक वाद्या'ची (पाइप वाद्य) परंपरा होती. या वाद्याला शास्त्रीय आधार होता. परंतु, काळ बदलला. राजे, महाराजांचा काळ गेला आणि मातंग समाजाच्या हातून हे वाद्य सुटले.

 


पूर्वी बॅंडपथकाला वाद्य वाजवण्याचा मोबदला धान्याच्या स्वरूपात अदा करता येत होता. सन १९३५  मध्ये नरेंद्रसिंग यांनी नागपुरात बॅंडपार्टी स्थापन केली. पुढे या पथकाला बिरादीन या पंजाबी व्यक्तीने विकसित रूप दिले. अब्दुला आणि मातंग समाजातील कलाकारांनी ही पार्टी काढली होती. या बॅंडपार्टीचे नाव १९३५  साली "नॅशनल बॅंड पार्टी' ठेवले होते. डॉ. कांबळे यांनी बॅंडची मजुरी आणि व्यवस्थापनासह लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळातून झालेल्या लाभाच्या आकडेवारीचा वेधही प्रबंधात घेतला आहे.

 


डॉ. कांबळे यांनी पत्नी सुचेता कांबळे यांच्या साथीने शहरासह जिल्ह्यातील १३  तालुके त्यासाठी पालथे घातले. बॅंड व्यवसायातून मिळणाऱ्या मिळकतीच्या भागिदारीचेही विष्लेषण केले. शिक्षणाच्या अभावाने आजही ३२  टक्के युवक या व्यवसायात आहेत. तर ९४  टक्के बॅंडवाले दारूच्या विळख्यात सापडले असल्याचे त्यांना आढळून आले.

 


कलावंताचा दर्जा नाही-


 

बॅंडवाले पोटार्थी आहेत, असा समज रूढ आहे. मातंग समाजात संगीताची प्रतिभा घेऊन जन्माला आलेला बॅंडवाला होतो. परंतु, तो कलाकार कधीही होत नाही, हे त्यांच शल्य आहे. बॅंडपथकात वाद्य वाजविण्याच्या संधीवर आता कुटुंबाचे पोट असते. कुटुंबाला जगवण्यासाठी तो शारीरिक वेदना सहन करतो. पुढे वेदना शमविण्यासाठी "दवा'सोबत "दारू' घेणे त्याची "मजबूरी' असते.


 


येथेही सावकारी पाश-


 

तीन महिन्यांत बॅंडपथकात काम मिळतेच. परंतु, पुढचे नऊ महिने संसाराचा गाढा ओढण्यासाठी ते "मयती'त डफ वाजतात. त्यातून पोटापुरतेच मिळते. त्यामुळे लेकरांच्या शिक्षणासाठी वा पोरीच्या लग्नासाठी "सावकारा'पुढे हात पसरावा लागतो. पुढे वर्षभर सावकाराच्या पाशात ते अडकले असतात.

 


डीजेचे अतिक्रमण-


 


बॅंडपथकांची संख्या वाढली, तशी कामात भागीदारही वाढलेत. रोजी वाढली; पण कामात कपात झाली. आज मातंग समाजाच्या यातनांचा आलेख बघितल्यास अतिशय विदारक चित्र आहे. त्यांच्या भुकेल्या पोटाकडे समाजाचे लक्ष जात नाही. फक्त लग्नसराई आली की, आनंदात मशगूल होण्यासाठी बॅंडवाला आठवतो.

 


प्राथमिक हेच "उच्च' शिक्षण-



अशिक्षित - २० टक्के
 

प्राथमिक - ४०  टक्के
 

माध्यमिक- ३२  टक्के
 

उच्च माध्यमिक- ६ टक्के
 

स्नातक- १ टक्का
 

स्नातकोत्तर- ०.२० टक्के
 


(जिल्ह्यातील ९  हजार ०५  बॅंड कलावंतांच्या अभ्यासातून पुढे आलेली माहिती.)

 



नागपुरातील पहिली बॅंड पार्टी-


 


सन १९३५ मध्ये नॅशनल बॅंड पार्टी डॉ. नरेंद्रसिंग प्रधान यांनी स्थापन केली. यानंतर वर्षभरात हिंदू बॅंड पार्टी नत्थूसिंग यांनी स्थापन केली. यापाठोपाठ फुसाजी कांबळे यांनी प्रभात बॅंड पार्टी उभी केली. तर पुढे इतवारीत बोटासिंग आणि रिगल सिनेमाजवळ गुंडासिंग बिहाडे यांनी बॅंड पार्टी सुरू केली. पुढे १९६९ मध्ये संत गुलाबबाबा यांनी रमेश निखारे आणि गंभीरदास अडागळे यांना एक लाख रुपये दिले. यातून संत गुलाब बाबा बॅंड पार्टी सुरू झाली.

 


'सकाळ'चे आभार-


 


दै. "सकाळ'ने डॉ. अशोक कांबळे यांनी लक्तरातून आपल्या आयुष्याची रंगीबेरंगी उबदार गोधडी साकारली. काटेरी आयुष्य जगताना, जिवंतपणी मरणयातना भोगल्या. आज ते शिक्षक या नात्याने विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देताहेत. त्यांच्या आयुष्याची ही चित्तरकथा दै. "सकाळ'ने गुरुवारच्या अंकात प्रकाशित केली आणि डॉ. कांबळे यांच्यावर संपूर्ण विदर्भातून कौतुकाचा वर्षाव झाला. याबाबत अतिशय भारावलेल्या शब्दात डॉ. कांबळे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सुचेता यांनी दै. "सकाळ'चे आभार मानले.

 


बॅंडवाले मुळात मातंग. कधीकाळी त्यांना राजाश्रय होता. या व्यवसायावर आता डीजेसह इतर समाजांचे, परप्रांतीयांचे अतिक्रमण झाले आहे. यामुळे अर्थकारण वाढले असले तरीही मातंग समाज या वाद्यकलेतून बाद होत आहे. तरुण वादक गंभीर आजाराच्या विळख्यात सापडले आहेत. बॅंड वाजवणाऱ्यांना कलावंत म्हणून ओळख मिळून त्यांना शासनाकडून दरमहा किमान तीन हजार रुपयांचे मानधन मिळायला हवे. तसेच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक स्तर उंचावण्यासाठी त्यांना विशेष आरक्षणाची गरज आहे.

 


संदर्भ- http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5641720671772648479&SectionId=28&SectionName=ताज्या+बातम्या&NewsDate=20130726&Provider=केवल+जीवनतारे+%3A+सकाळ+वृत्तसेवा&NewsTitle=पोटासाठी+ते+विकत+घेतात+आजार


 

धन्यवाद- दै.सकाळ.


लेखं - डॉ. अशोक कांबळे, नागपूर. (9822461593)

आज खरा जातीयवादी कोण आहे ??

आज खरा जातीयवादी कोण आहे ?? 

 



आज खरा जातीयवादी कोण आहे..? ब्राम्हण आहे की ओबीसी आहे याला महत्व नाही. जो जातीयवादी आहे तो आपला शत्रूच आहे. मग तो कुणीही असेना. आता नव्याने शत्रूत्वाची व शत्रूची व्याख्या करावी लागेल. त्याप्रमाणे सामाजिक/राजकिय भूमिका घ्याव्या लागतील. स्वातंत्र्यानंतरची चवथी पिढी शिकली आहे. तरीही ही पिढी आजही दलीतांबद्द्ल जातीयभावना जोपासत असेल तर तो अडाणीपणा नसून जातीय उच्चतेचा उर्मट अंहकारच समजून त्याला धडा शिकविला पाहीजे.


 

बहूजन/मूलनिवासीच्या नावाखाली दलितांवर अत्याचार करणाऱ्या ब्राह्मणेत्तरांना कदापीही माफ करू नये. तो शत्रूच समजावा. खैरलांजीतील आरोपी/रमाबाईनगर गोऴीबार प्रकरणातील आरोपी/आनंद गायकवाड (उस्मानाबाद) हत्याकांडातील आरोपी हे दलीतांचे शत्रूच आहे. ते कोणत्याही जातीचे असोत. आता दलीतांनी धर्मनिरपेक्ष भूमिकेऐवजी जातनिरपेक्ष भूमिका घेणाऱ्यांना मित्र मानले पाहीजे.

 

धर्मनिरपेक्षतेची भूमिकेचा बाता करून निवडणूका जिंकणारे महाराष्ट्रातील पक्ष/नेते मुख्यमंत्रीपद/इतर महत्वाची मंत्रीपदावर दावा सांगताना "जात" हीच पात्रता लावतात तेव्हा यांचा धर्मनिरपेक्षतेचे सोंग उघडे पडते. दलीतांना खूप ब्लँकमेल केल्या गेले आहे. सारेच पक्ष दलीत विरोधी आहे. तसे नसते तर कसाब/अफजलला फासावर लटकविणारे खैरलांजी/रमाबाईनगर हत्याकांडातील आरोपी आजही दलितांना वाकूल्या का दाखवित आहे याचे उत्तर द्यावे ??


विचार- भारत लढे सर.

चला विज्ञानाचा प्रचार करू या आणि डॉ. नरेंद्र दाभोलकरांना खरी श्रद्धांजली वाहूया !!

चला विज्ञानाचा प्रचार करू या आणि डॉ. नरेंद्र दाभोलकरांना खरी श्रद्धांजली वाहूया !!

 


 


High-voltage विद्युत तारेवर बसल्यावरही पक्ष्यांना शॉक का लागत नाही ?

 

 


ज्या प्रमाणे पाणी जास्त उंचीच्या ठिकाणहून कमी उंचीच्या ठिकाणी आपोआप जाते तसेच Electricity जास्त दाबाच्या (High Voltage) ठिकाणहून कमी दाबाच्या (Low Voltage) ठिकाणी प्रवास करते.

 

जेव्हा पक्षी विद्युत तारेवर बसतो आणि जमिनीला सुद्धा त्याच वेळा स्पर्श करतो त्यावेळेस Electricity ला पक्ष्याच्या शरीरातून जेथे voltage नाही तेथे जाण्यासाठी मार्ग निर्माण होतो आणि शॉक बसून पक्षी मरण पावतो.

 

परंतु जेव्हा पक्षी एका तारेला स्पर्श करतो किवा तारेवर बसतो तेव्हा Electricity तारेतून पुढे वाहत जाते नाकी पक्ष्यातून त्यामुळे पक्ष्यांना शॉक लागत नाही.



 
 
अधिक माहितीसाठी खाली इंग्रजीत...

-----------------------------------------------------------------------


Why dont birds sitting on a high-voltage wire get a shock ?


 

Electricity travels from a place of high voltage to low voltage, just like water travels naturally from high elevation to low elevation.

 

If the bird sits on a wire and also touches the ground, a path is created that allows electricity to travel through the body and to the place with no voltage. When electricity travels through the body of the bird in this fashion, electrocution takes place, and the bird dies.

 

However, if the bird touches a single wire it doesn't get a shock because electric current passes through the wife instead of the bird.

 

-----------------------------------------------------------------------

 

बोट / हाडे मोडताना आवाज का येतो ?

 



 

आपल्या शरीरात जेथे जेथे Joints आहेत उदा. बोटे, मणक्यांची हाडे यांच्या Joints भोवती Synovial नावाचे द्रव असते. आपण बोट मोडण्यासाठी ते वाकवतो तेव्हा या Synovial द्रव्याचा दबाव कमी होतो आणि या द्रव्यात असणारे विविध वायुंचा बुडबुडा निर्माण होऊन तो फुटतो आणि बोट / हाडे मोडताना येणारा आवाज निर्माण होतो.

 

अधिक माहितीसाठी खाली इंग्रजीत...
 

 -----------------------------------------------------------------------

 

What makes the sound when we crack our Figures / joints ?


 

All of the joints in our bodies are surrounded by synovial fluid, a thick, clear liquid. When you stretch or bend your finger to pop the knuckle, you're causing the bones of the joint to pull apart. As they do, the connective tissue capsule that surrounds the joint is stretched. By stretching this capsule, you increase its volume. So as the pressure of the synovial fluid drops, gases dissolved in the fluid become less soluble, forming bubbles through a process called cavitation. When the joint is stretched far enough, the pressure in the capsule drops so low that these bubbles burst, producing the pop that we associate with knuckle cracking.

 

-----------------------------------------------------------------------
 

समुद्रात मीठ कसे तयार होते ?


 

 


जेव्हा पाउस पडतो आणि जमिनीत मुरतो तेव्हा जमिनीतील आणि दगडातील मुलद्रव (Substances) पाउस पाण्यासोबत वाहत आणतो आणि हे द्रव्य नदी आणि समुद्रात येतात. तुम्ही ह्या द्रव्याचे नावे Mineral Water च्या बाटलीवर छापलेले पाहू शकाल.

 

नदीचे पाण्यात खूप कमी म्हणजे १ ग्राम प्रती लिटर एवढेच तर समुद्र्याच्या पाण्यात जास्त म्हणजे ३५ ग्राम प्रती लिटर एवढे हे द्रव्य असते कारण समुद्रात हे द्रव संचित होते.

 

जरी नद्या हे मीठ समुद्रात पाण्याद्वारे आणतच राहते तरीही समुद्र हा अति खारट / मिठाने युक्त होत नाही कारण समुद्रातील प्राणी आणि वनस्पती मिठाचे शोषण त्यांच्या शरीरात करत असतात आणि जेव्हा ते मृत होतात ते समुर्द्राच्या तळाशी जमिनीत पुरले जातात आणि त्यांचे विघटन होते.

 


 अधिक माहितीसाठी खाली इंग्रजीत...
-----------------------------------------------------------------------

 

How is salt formed in the sea ?


 

When rain falls on the ground and seeps below it, it washes away substances from the soil and rocks. It carries these substances into the river and the sea. You can read the names of these substances on the label of a bottle of mineral water.

 

River water contains only a little salt about 1 gm per liter whereas the salt content of the sea is much higher about 35 gm per liter on an average. The reason is that the salt remains in the sea.

 

Although the rivers continue to deposit new salts, the seas do not become 'over salty' because animals and plants in the sea absorb the salts in their bodies. When they die, they sink to the seabed and decompose into sediments.
 


-----------------------------------------------------------------------
 

आपण श्वसन करत असलेला ऑक्सिजन कोठून येतो ?




 

वायू रुपात ऑक्सिजन पृथ्वीवर सुमारे ३.५ बिलियन वर्षांपूर्वी तयार झाला. त्या वेळी, सूर्याच्या अतिनील (UV) किरणांनी वातावरणातील पाण्याच्या अनुचे (molecules) चे विघटन केले आणि त्यातून ऑक्सिजन आणि हायड्रोजन बाहेर पडले. परंतु यातील बराचसा ऑक्सिजनचा लगेच विविध मुलद्रव्यांशी (substances) संयोग झाला आणि वायुरूपात ऑक्सिजन जास्त वेळ राहू शकला नाही.

 


ऑक्सिजन समुद्रात सुद्धा निर्माण झाला. समुद्रातील निळे शेवाळाने (blue algae) प्रकाश-संश्लेषण (photosynthesis) करणे चालू केले तेव्हा ऑक्सिजन तयार झाला. या शेवाळाने सूर्यप्रकाश आणि कार्बनडाय ऑक्साईड चे रुपांतर उर्जेत केले. या प्रक्रियेत वायुरूपात ऑक्सिजन तयार होऊन वातावरणात जमा झाला. अंदाजे एक बिलियन वर्ष पूर्वी एकूण वातावरणात ४% ऑक्सिजन होता.

 


अधिक माहितीसाठी खाली इंग्रजीत...
  
-----------------------------------------------------------------------

 

Where does the oxygen we breathe come from ?


 

Gaseous oxygen was created on the Earth about 3.5 billion years ago. At the time, the UV light of the sun decomposed the water vapour molecules present in the atmosphere, and released oxygen and hydrogen. But a major part of the oxygen immediately reacted with the substances, so that It was no longer available in the atmosphere as gas.

 

Oxygen was also produced by the seas, where the ‘blue algae’ carried out photosynthesis. These bacteria converted sunlight and carbon dioxide into energy. In the process, gaseious oxygen was released as ‘waste product’, which accumulated in the atmosphere.

 

Appx one billion years ago, 4% of the atmosphere consisted of oxygen.
 


-----------------------------------------------------------------------
 

ताऱ्यांविषयी काही माहिती-




१. ताऱ्यांची चमचम ( twinkling) ताऱ्यांच्या स्वत: मुले नाही तर वातावरणातील हवेच्या झुळके होते.
 

२. प्रत्येक २० दिवसानंतर एक नवीन तारा निर्माण होतो.
 

३. ताऱ्यांचा रंग हा लाल, पिवळा आणि नीळासुद्धा असू शकतो. लाल रंग म्हणजे सर्वात थंड तारा आणि नीळा म्हणजे सर्वात उष्ण. पिवळा तारा सूर्यासारखे तापमान असलेला असू शकतो.
 

४. काही तारे हे सूर्याच्या १००० पटीने मोठा सुद्धा असतात.

 

अधिक माहितीसाठी खाली इंग्रजीत...
  
-----------------------------------------------------------------------

Some more on Stars-


 

1. The twinkling of the stars is caused by the swirling air in atmosphere and does not come from the star itself.
 


2. A new star is born every 20 days.
 


3. The color of stars ranges from red to yellow and to blue.
Red is coolest star and blue is the hottest. Yellow stars like the Sun have an average temperature.
 


4. Many stars are 1000 times bigger than our Sun.
 

----------------------------------------------------------------------- 


प्रिय मित्र-मैत्रिणीनो तुमच्या मनात येणारी अशी विज्ञानीक प्रश्नाची उत्तरे देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत..  विज्ञान आणि तंत्रज्ञान साध्या आणि सरळ भाषेत आपल्या प्रबोधन टीम च्या एका नवीन फेसबुक पेज वर मांडणार आहोत. तुमची साथ मिळेल त्याबद्दल आमच्या मनात शंका नाही. तुमच्या मनातील शंका-कुशंका याची उत्तरे मिळवण्यासाठी आम्ही रोज छोट्या-छोट्या पोस्तद्वारे विज्ञानाचा प्रचार... प्रसार करणार आहोत. 



प्रबोधन टीम चे नवीन विज्ञानाचा प्रचार... प्रसार करणारे फेसबुक वरील एकमेव मराठी आणी इंग्रजी पेज....
 



पेज चे नाव-  Science Simplified




पेज लिंक- 


https://www.facebook.com/pages/Science-Simplified/204547429714435?refid=7&ref=notif&notif_t=like&_ft_=qid.5914464478197606937%3Amf_story_key.506858672721636



विज्ञानाचा प्रचार करू या आणि डॉ. नरेंद्र दाभोलकरांना खरी श्रद्धांजली वाहूया आहात ना सोबत ??



  

तुमचीच प्रबोधन टीम !!

 

लेखं- किरण शिंदे.

‘जादुटोणा’ विधेयकात दडलंय काय ?? प्रिय मित्र-मैत्रिणीनो आता तुम्हीच ठरवा अंधश्रद्धेवर प्रहार की श्रद्धेवर आघात... आपल्या प्रतिक्रिया मांडा ?

‘जादुटोणा’ विधेयकात दडलंय काय ??

 


 

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि अंधश्रद्धाविरोधी चळवळीचे अग्रणी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात हत्या झाल्यानंतर त्यांनी दीर्घकाळ ज्यासाठी लढा दिला त्या जादुटोणा विरोधी विधेयकाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या विधेयकाचा आग्रह धरल्यानेच त्यांची हत्या झाल्याचेही म्हटले जात आहे. राज्य सरकारने या विधेयकाचा जो मसुदा निश्‍चित केला आहे त्यात प्रामुख्याने जी बारा कलमे अशी आहेत. या कलमांवर नजर टाकली असता त्यांच्या अंमलबजावणीने अंधश्रद्धेवर प्रहार होणार आहे की श्रद्धेवर आच येईल, याचा फैसला सुजाण वाचक करू शकतील. अंधश्रद्धेला आळा घालण्यासाठी कायदा झाला पाहिजे, हा विचार पुढे आल्यापासूनच त्याचे सर्मथक आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आले आहेत. या मुद्याला राजकीय रंगही वेळोवेळी आले.

 

असा झाला प्रवास-



- अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अशासकीय विधेयक ७ जुलै १९९५ मध्ये विधानसभेत मांडण्यात आले.



- १३ एप्रिल २
००५ रोजी शासकीय विधेयक आले. मात्र विरोधामुळे स्थगित.


- १६ डिसेंबर २००५ रोजी विधानसभेत विधेयक मंजूर पण विधान परिषदेत पारित होऊ शकले नाही.



- नंतर विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे गेले पुढे विधेयक व्यपगत झाले.



- २०११ मध्ये नव्याने विधेयक मांडले गेले पण त्यावर चर्चाही झाली नाही. विरोधाचे सूर कायम राहिले.



- चालू वर्षीच्या पावसाळी अधिवेशनात ते सुधारणांसह मांडण्याची तयारी सरकारने केली. हे विधेयक या अधिवेशनात आणले जाईल, असा मनोदय सरकारच्या वतीने व्यक्त करण्यात आला.



- तथापि, विधेयक अधिवेशनात आलेच नाही. वारकर्‍यांशी चर्चा करूनच विधेयक आणले जाईल, असे स्पष्ट करीत सरकारने माघार घेतली.



- आज मंत्रिमंडळाने वटहुकूम काढण्याचा निर्णय घेतला.

 
या विधेयकात नमूद केलेल्या गुन्ह्यांबद्दल कमीत कमी सहा महिने आणि पाच हजार रुपये दंड ते जास्तीतजास्त ७ वर्षे कारावास आणि ५ हजार रुपये दंड अशी तरतूद करण्यात आली आहे.

 

ही कलमे अशी-




१) भूत उतरविण्याच्या बहाण्याने एखाद्या व्यक्तीला बांधून मारहाण करणे, त्याचा विविध प्रकारे छळ करणे, चटके देणे, मूत्रविष्ठा खायला लावणे अशी कृत्ये गुन्हा ठरतील.(भूत उतरविण्यासाठी प्रार्थना, मंत्र म्हटले, पूजा केली तर तो गुन्हा ठरत नाही.




२) एखाद्या व्यक्तीने चमत्काराचा प्रयोग करून फसविणे, ठकवणे, आर्थिक प्राप्ती करणे गुन्हा ठरेल.




३) जिवाला धोका निर्माण होतो, अथवा शरीराला जीवघेण्या जखमा होतात, अशा अमानुष अघोरी प्रथांचा अवलंब करणे हा गुन्हा.



४) गुप्तधन, जारणमरण, करणी, भानामती या नावाने अमानुष, अनिष्ट व अघोरी कृत्य करणे किंवा नरबळी देणे.



५) अतींद्रिय शक्ती असल्याचे भासवून इतरांच्या मनात भीती निर्माण करणे व न ऐकल्यास वाईट परिणामाची धमकी देणे, फसविणे, ठकविणे हा गुन्हा असेल पण केवळ अंगात येणे हा गुन्हा नाही.



६) एखादी व्यक्ती करणी करते, जादुटोणा करते, भूत लावते, जनावरांचे दूध आटवते, अपशकुनी आहे, सैतान आहे असे जाहीर करणे.



७) चेटूक केल्याच्या नावाखाली मारहाण करणे, नग्नावस्थेत धिंड काढणे, रोजच्या व्यवहारांवर बंदी घालणे.



८) भूत पिशाच्चांना आवाहन करून घबराट निर्माण करणे, मृत्यूची भीती घालणे, भुताच्या कोपामुळे शारीरिक इजा झाली, असे सांगणे.




९) कुत्रा, साप, विंचू चावल्यास एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखणे किंवा त्याऐवजी मंत्रतंत्र-गंडे
दोरे असे उपचार करणे.



१०) बोटाने शस्त्रक्रिया करण्याचा दावा करणे. गर्भवती महिलांच्या गर्भाचे लिंग बदलण्याचा दावा करणे.




११) स्वत:ला विशेष शक्ती असल्याचे सांगून अथवा गेल्या जन्मी पत्नी, प्रेयसी, प्रियकर होता असे सांगून लैंगिक संबंध ठेवणे.अलौकिक शक्तीद्वारे मूल होण्याचे आश्‍वासन देत लैंगिक संबंध ठेवणे.




१२) एखाद्या मतिमंद व्यक्तीमध्ये अलौकिक शक्ती असल्याचे भासवून त्या व्यक्तीचा वापर धंदा, व्यवसायासाठी करणे.


 

प्रिय मित्र-मैत्रिणीनो आता तुम्हीच ठरवा अंधश्रद्धेवर प्रहार की श्रद्धेवर आघात... आपल्या प्रतिक्रिया मांडा ?


 
संदर्भ- http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=MainEdition-1-1-22-08-2013-6d8dc&ndate=2013-08-22&editionname=main



धन्यवाद- दै.लोकमत.




लेखं- यदु जोशी (मुंबई)

डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या मृत्यूने महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचा आवाज हरवला !!

 डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या मृत्यूने महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचा आवाज हरवला !!





काल अंधश्रधेच्या विरोधात कार्य करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाला. ज्याने त्यांचा खून केला असेल त्याला सुद्धा माहित नसेल कि तो काय करतोय आणि त्यामागे नक्की काय तर्क आहे. दुर्दैवाने त्यांच्या मारेकर्यांची जी बौद्धिक स्थिती आहे तीच बहुसंख्य अशा स्वता:ला धार्मिक म्हणून घेणाऱ्या लोकांची दिसून येते. अंधश्रद्धानिर्मूलनाच्या संदर्भातील डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे कार्याने खरे पाहता हिंदू धर्मावरील लोकांची आस्था वाढवण्याचेच काम केले असते कारण अंधश्रधा आणि इतर निरर्थक गोष्टी वजा करून राहिलेला हिंदू धर्माचे रूप नक्कीच लोकांना भावले असते आणि शिकलेल्या आणि कार्यकारणभावाने जीवन जगणाऱ्या लोकांना सुद्धा आकर्षित किवा जोडून ठेवण्याचे काम आपोआप झाले असते. परंतु हे माहित असून सुद्धा त्यांचा खून झाला हे लक्षात घेण्यासारखे आहे. आणि म्हणून वेळ आली आहे देव, धर्म, श्रद्धा सारख्या गोष्टींमध्ये बावळट मेंढरानसारखे राहून चालणार नाही.




धर्माचे ठेकेदार मग ते कोणत्याही धर्माचे असोत उदा. पुजारी, धर्मगुरू, पदरी ज्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून घडून आणला यांना खरे पाहता तुमच्या श्रद्धा, देव, अध्यात्मिक उन्नती सारख्या गोष्टींशी खरे तर काहीही घेणे देणे नसते. त्यांचा स्वार्थ असतो तो दोन गोष्टीत. १. तुमचा पैसा, २. धर्माच्या नावाखाली आपोआप मिळणारी सत्ता आणि दहशतवाद. पैसा - हा मुद्दा समजण्यासाठी सोपा आहे. धार्मिक स्थळे उदा. मंदिर, मस्जिद इ. ठिकाणी असणारी दुकाने, पूजा अर्चा द्वारे निर्माण होणारी आर्थिक उलाढाली, संस्थानाला मिळणारी प्रचंड अशी देणगी. या गोष्टी सर्वसामान्य वाचनातून जास्त विचार न करताहि समजू शकतो.

 



धर्माच्या नावाखाली आपोआप मिळणारी सत्ता आणि दहशतवाद - हा मुद्दा बरेच वेळा भोळ्या भाबड्या लोकांना समजत नाही. किवा समजून येण्यासाठी जी लागणरा दृष्टीकोन प्राप्त होत नाही. विविध कर्मकड, अनुष्ठानद्वारे विशिष्ठ समाजाला किवा समूहाला एक प्रकारचे गुलामच बनवले जाते. असे गुलाम कि जे स्वता:च्या बुद्धीचा किवा कार्यकारणभावाचा वापर न करता या धर्मगुरूंच्या किवा पुरोहितवर्गाच्या प्रत्येक गोष्टीला हो ला हो करतात. या गुलामांत भावनिक लोक, स्त्रिया, निरक्षित किवा कमी शिक्षित लोक जास्त असतात ज्यांची संख्या भारतासारख्या विकसनशील देशात अजूनही जास्त आहे. एकदा अशा प्रकारे लोकांच्या बुद्धीचा दोर हातात आला कि मग तो वर्ग नेहमी आपल्या हातातच कसा राहील (Control) याचा विचार या धर्मागुरुना असतो तुमचाच पैसा मग तुम्हाला आणखी आणखी मानसिक गुलाम बनवण्यासाठी वापरला जातो. नवनवीन कल्पना शोधून तुमचा कष्टाने मिळवलेला पैसा गोळा केला जातो आणखी अशा मानसिक गुलामाची संख्या कशी वाढवता येईल या साठी प्रयत्न केला जातात. हे करताना देवाचे, धर्माचे आणि अध्यात्मिक जीवनाचे दाखले देऊन गुलाम बनवण्याची प्रक्रियाला सुखाच्या साखरेचा मुलामा दिला जातो जो एकतर कधी लक्षात येत नाही किवा लक्षात आल्यावर बरीच वेळ निघून गेलेली असते.

 



मग दाभोलकर सारख्या सामाजिक जाणिवेचे भान असलेल्या लोकानी या विरुद्ध आवाज उठवला तर मग त्यांना दाबण्यासाठी धार्मिक दहशदवाद निर्माण केला जातो. लोकांच्या भावनांना भडकावले जाते, धर्म धोक्यात आहे असे सांगून दहशतवादी निर्माण केलेलं जातात दहशत निर्माण केली जाते. आणि एकमेकांचा खून करण्यासाठी परावृत्त केले जातात. लक्षात घेतले पाहिजे कि हे धर्मगुरू स्वत कधीच लढत नाहीत ते त्यांनी बनवलेले असे दहशतवादी लढतात ज्यांचे विचार परिपक्व नसतात किवा अध्यात्माचा खरा अर्थ त्यांना समजण्याआधीच त्यांच्या विचारांना एकाच विशिष्ट पद्धतीने विकसित केले जाते ज्याला मानसशास्त्रात Brain Wash म्हणतात. मित्रानो, आपल्या श्रद्धेप्रमाणे परमेश्वराचे चिंतन करणे वाईट नाही परंतु हे करत असताना आपल्या बुद्धीच्या दोऱ्या इतर कोणाकडेही देऊ नयेत तथाकथित धर्मगुरूंकडे देऊ नयेत. कळत नकळत त्या गुलाम मेंढर होऊ नयेत, ज्यांना हे माहित असते कि आपला मेंढपाळ कधी न कधी आपल्याला खाटिकाकडे नेणार आहे परंतु तरीही त्याच्च्या मागेच जात असतात. देवाच्या प्राप्तीसाठी तुम्हाला मेंढपालची गरज नाही कि कोणत्या मंदिराची कि तीर्थस्थानाची. आपले शरीर हे मंदिर आणि आपला आत्मा हाच देव. (BY-Kiran Shinde)


 


महाराष्ट्रातील सांस्कृतिक दहशतवादाचे केंद्र असलेल्या पुण्यात डॉ नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली! भारतामध्ये पुरोगामी नावलौकिक असलेल्या महाराष्ट्रात विचारवंताची आणि समाजसुधारकांची हत्या होणे हे काही नवीन नाही ! महाराष्ट्रात पुणे हेच कटकारस्थानाचे केंद्र बनलेले आहे असेच चित्र दिसत आहे.

 



राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (R.S.S) आणि सनातनी वैदिकांना विरोधाला न जुमानता  डॉ नरेंद्र दाभोलकर यांनी नेहमीच अंधश्रद्धा निपटून काढण्यासाठी आपले प्रयत्न चालूच ठेवले. त्यांचे कार्य खरे तर शोषित, दिन-दुबळ्या गरीब लोकांना अंधश्रद्धधेपासून वाचविण्यासाठी चालले होते. त्याला धर्मांद सनातनी लोकांचा नेहमीच विरोध होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्लेही चढवले होते हे आपण विसरता कामा नये ! जेव्हा जेव्हा महाराष्ट्रातील समाजसुधारकांनी आणि विचारवंतांनी  प्रयत्न केले तेव्हा त्यांच्यावर प्राणघातक हल्ले करण्यात आले. मग महात्मा गांधी, महामानव डॉ आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा फुले, सावित्रीआई फुले, राजर्षी शाहू यांची संघर्ष कहाणी आणि उदाहरणे आपल्याला हेच दर्शवितात. काही इतिहासकारांनी छत्रपती शिवरायांना आणि आद्य समाजसुधारक संत तुकाराम यांना याच सनातन्यांनी मारले असे संशोधन पुढे आणले आहे. हेच वास्तव आहे मित्रानो !

 



दाभोलकर यांच्या मृत्युने आणि या गंभीर अश्या घटनेने पुन्ह एकदा आपल्या सर्वांना इतिहास पड़ताळनि करण्यास भाग पाड़ले आहे ! ऐतिहासिक पुरावे आणि महत्वपूर्ण असे घडामोडी आपन इथे पाहुयात !

 



राजर्षि शाहूमहाराज यांच्यावरील हल्ले-


 



राजर्षि शाहूमहाराज जे शोषित जनतेसाठी आणि त्यांच्या उन्नतीसाठी आपले सर्व जीवन जगले यांच्यावर सुद्धा याच प्रवृत्तिच्या सनातन्यानी अनेक प्राणघातक हल्ले चढवले होते ! वेदोक्ताच्या संघर्षत फेरिस यांनी शाहू महाराजांना साथ दिली म्हणून कोल्हापुर मधील अणि पुण्यातील वैदिक धर्मीय ब्रम्हनानी १६ एप्रिल १९०८ रोजी, फेरिस रेल्वेने प्रवास करीत असताना दामू जोशी नावाच्या दहशत वाद्याने पिस्तूल रोखून गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर तीनच महिन्यांनी खुद्द शाहू महाराजाणा रस्त्यात बोंम्ब ने उडवून देण्याचा आणखी एक प्रयत्न करण्यात आला ! अंगावर काटा येतो मित्रानो आशा गोष्टी वाचून ! महापुरुषाना काटेरी मार्ग पत्करावे लागतात ! पुढेही महाराजांच्या जीवनाच्या अंतापर्यंत त्यांचा जिव घेण्यासाठी सनातनी वैदिक दहशात्वाद्यानी त्यांचा पिच्चा पुरावालेला दिसून येतो ! जिव घेणे हे सनातनी वैदिकांचे अगदी सोपे कामच होते हेच यावरून दिसते !

 

महात्मा फुले आणि सावित्रीआई फुले यांच्यावरील हल्ले-


 



महात्मा फुले यांचे समाजप्रबोधनाचे आणि समाज सुधारणेचे काम पाहून त्यांचा विरोधक आणि सनातनी दहशतवादी चिपळूणकर याने  राष्ट्रपिता फुलेँना मारण्यास व त्यांचा जिवघेण्यास मारेकरीना पैसे दिले.  म्हणजे यांचे मनसूबे भयंकर होते, आहेत आणि राहणार !


 


जेव्हा स्त्री-शिक्षणाची सुरवात सावित्रीआई फुले आणि महात्मा फुले यांनी केली तेव्हा देखील सावित्रीआई वर दगड धोंडे आणि चिखल फेकून याच सनातन्यानी जखमी केले. यांना आजही सावित्रीआई ची महती कळलेली नाहीये ! सावित्रीआई मुळेच आज आपली कल्पना चावला अंतराळत गेली आहे याचा विसर यांना पडत आहे ! शेवटी मनुचिच पिल्ले ही !

  

गांधीहत्या आणि नाथूराम गोडसे -


 




महात्मा गांधी यांची हत्या भरदिवसा गोळी मारून नथूराम गोडसे नामक एक माथेफिरुने केलि. मित्रहो वरील उदाहरणे काय दर्शवितात ? कुठे आहोत आपण ? विसाव्या शतकाच्या सुरवातीस हीच परिस्थिती होती. त्यावेळीही मनुचीच पिल्ले होती ! आणि आताही तेच आहेत . पुरोगामी महाराष्ट्राची लचके तोडत आहेत ! भरदिवसा खून करीत आहेत ! थांबणार कधी हे ?

  

डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या पत्नी डॉ. शैला दाभोलकर यांच्या प्रतिक्रिया-






डॉ. दाभोलकर यांच्यासोबत मी गेली अनेक वर्षे सहकारी म्हणून काम केले. मी कधीच त्यांच्यासोबत फोटोसेशनसाठी उभी राहिले नाही. आज तुम्ही आला आहात तर फक्त फोटोसेशन होईल. अंधश्रद्धा निर्मूलनाचे जादूटोणा विरोधी विधेयक मंजूर व्हावे, यासाठी डॉ. दाभोलकर हे तुमच्या दालनासमोर तासन्‌-तास ताटकळत बसत होते तरी तुमची भेट होत नव्हती. सामाजिक हितासाठी जीवनभर तळमळीने आणि समर्पितपणे कार्य करणाऱ्या माझ्या पतीला व्यक्तिगत काहीच नको होते. डॉ. दाभोलकर यांच्या अकाली जाण्याने पुरोगामी चळवळीची मोठी हानी झाली आहे. निदान आता तरी त्यांची अखेरची इच्छा म्हणून जादूटोणा विरोधी विधेयक मंजूर करून महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचाच असल्याचे आपल्या कृतीतून दाखवा.


 

-  डॉ. दाभोलकर यांच्या पत्नी डॉ. शैला दाभोलकर यांचा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण , गृहमंत्री आर. आर. पाटील, संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील व सातारचे पालकमंत्री शशिकांत शिंदे यांना हा निरोप आहे.


 



आज डॉ दाभोलकर यांच्या खुनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते मगरीचे अश्रू रडून दाखवत आहेत. पण जेव्हा नरेंद्र दाभोळकर सर आणि श्याम मानव सर अंधश्रद्धा विरोधी विधयेक लागू करा म्हणून या राजकीय नेत्यांच्या कडे जाऊन त्यांची मनधरणी करत होते तेव्हा हे राजकीय लोक अंधश्रद्धा विधयक लागू करत नव्हते. महाराष्ट्रात ६ महिने ते १० वर्ष पर्यंतच्या मुलाचा बळी मुलप्राप्ती आणि धनप्राप्तीसाठी करण्यात येत होता तरीही सरकार बुवा बाबाच्या बाजूने उभे राहिले होते?? शिवसेनेचे नेते दिवाकर रावते हे तर अत्यंत घाणेरड्या भाषेत दाभोळकर यांच्यावर टीका करायचे. भाजपा हि भोंदूगिरी आणि अंधश्रद्धेच्या सोबत राहिली तिने हि दाभोळकर ला त्रास दिला. राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वता:ला पुरोगामी म्हणायची पण अंधश्रद्धा विरोधी विधयक म्हटले कि ते सनातनी होऊन हा कायदा करायचे नाहीत कॉंग्रेस चे पण तेच होते. आज राज ठाकरे जादूटोणा विरोधी विधयक सरकार ने का लागू केले नाही असा प्रश्न करत आहे पण त्यांना त्यांच्या पक्षाने विधानसभेत काय भूमिका घेतली होती हे माहिती आहे का ?? मनसे ने अंधश्रद्धा विरोधी विधयकाला विरोध केला होता.. सर्व पोपटपंची आहे सरकार ला आणि विरोधी पक्षांना राज्यात अंधश्रद्धा हवी आहे यांनी जी लोकांची वाट लावली आहे हि लोकांना समजू नये त्यांना आपली प्रगती झाली नाही कारण देवाची आपल्यावर कृपा नाही असे वाटावे आणि यांनी जे लोकांना खड्यात घातले आहे ते लोकांनी समजू नये. हिंगोली जिल्ह्यात ७ लहान मुलांची हत्या गेल्या वर्षी अंधश्रद्धेतून झाली होती अशाच शेकडो हत्या होत राहतील कारण भोंदू बुवांचे शिष्य सध्या सरकार आणि विरोधी पक्षात आहेत.


 


आता या महाराष्ट्राच्या राजकारण्यांना माझे एकच सांगणे आहे, थोडीशी जरी लाज शिल्लक असेल ना  आणि महाराष्ट्रात सुद्धा इतर मागास राज्यांप्रमाणे प्रमाणे वैचारिक लढाई बंदुकीच्या गोळ्यावर जिंकता येते हा चुकीचा संदेश जर जायला नको असेल तर ज्यासाठी डॉ नरेंद्र दाभोळकरांनी आपले आयुष्य वेचले ते जादूटोणा विधेयक वारकऱ्यानां विश्वासात घेऊन त्वरित मंजूर करून टाका तीच डॉ. नरेंद्र दाभोळकरांना खरी आदरांजली ठरेल.

 




शम्बुकापासून- तुकाराम महाराजांपर्यंत आणि गांधींपासून- डॉ. नरेंद्र दाभोलकरांपर्यंत झालेल्या हत्याकांडाने त्यांचे विचार न मरता ते इतिहासात अमर झालेले आहेत आणि हाच या परिवर्तनवादी चळवळीचा विजय आहे. अस्सल संविधानप्रेमी, अंधश्रद्धेंचा नायनाट करण्याचा विडा उचलणाऱ्या या खऱ्याखुऱ्या क्रुसेडरला आमचा हा अखेरचा वंदन. __/\__

 


लेखं- किरण शिंदे , वैभव मोरे , शंकर माने , AJ Karde.

म्हणे जातिभेद संपला ???

म्हणे जातिभेद संपला ???




वर्तमानपत्रातील वधुवर वर सूचक जाहिरातीतील पानावर लक्ष गेले, सहजच म्हणून वाचले, निम्म्या जाहिरातींच्या शेवटी "sc /st क्षमस्व" असे लिहिलेले दिसले, मुलगी किंवा मुलगा स्वजातीय हवी असे नमूद केल्यावर सुद्धा असे कुत्सित लिहिण्याची गरज खरच आहे का ? या समाजातील लोक काय आमची मुलगी घ्या, आमचा मुलगा घ्या असे म्हणून मागे लागतात का ? प्रसिद्ध वर्तमानपत्रे (जशी लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाईम्स) सुद्धा हे उघडपणे छापत आहेत. यावरून यांचे पुरोगामित्वाचा बुरखा दिसून येतो. एखाद्या भिकाऱ्याला आपण क्षमा करा पुढे, पुढे जा असे म्हणतो मला तर हे असेच वाटते.


 


प्रेम विवाह सोडला तर महाराष्ट्रातील अभेद्य अशी जातीव्यवस्था मोडून दुसऱ्या जातीच्या लोकांकडे विवाहासाठी म्हणून मागणे घेऊन कुणीही जात नाही तेव्हा पूर्वग्रह असलेला आकस मनात ठेऊनच हि ओळ जाहिरातीत छापली जात असावी.


 


मराठा/कुणबी समाजातील जाहिरातीत हा उल्लेख सर्रास आढळतो, म्हणजे जातीचा माज आणि पोकळ अभिमान हे लग्नाच्या बाजारात सुद्धा मिरवताना दिसतात.दलित समाजातील मुले/ मुली आता प्रगती करत आहेत, उच्च पदावर, मोठ्या पगाराची नोकरी करीत आहेत असे, सुशिक्षित आहेत, सुंदर आहेत परंतु त्यांच्या जाहिरातीत "जातीची अट नाही" असे लिहिलेले आढळते, यावरून या समाजबांधवांच्या मनाचा मोठेपणा आणि जातीअंताची तळमळ दिसून येते.


 



डॉ. बाबासाहेबांनी आंतरजातीय विवाह हा जातीअंतसाठीच्या लढ्यातील एक पर्याय सुचवला होता आणि आम्ही तो स्वीकारतो. पण कदाचित हिंदू धर्मातील अनिष्ठ रूढी, देव देवस्की,अंधश्रद्धा आणि हेकेखोर वृत्तीमुळे मागील काही महिन्यांपासून सुशिक्षित बौद्ध समाजातील मुलामुलींचा कल बौद्ध समाजातच लग्न करण्यात दिसून येतो, सोशल साईट्स वर तर तसे ग्रुप्सही आहेत म्हणजे दोन्ही बाजूने आता हि दरी मोठी होणार हे मात्र नक्की !


 


जात या महाराष्ट्रातल्या मातीत इतकी खोल रुजली आहे, रुजवली गेली आहे कि तिला मुळासकट उखडून फेकणे अशक्य आहे, हिरोशिमा नागासाकी या जपान मधील शहरांवर अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात अणुबॉम्ब टाकून हे शहरं उध्वस्त केली होती पण नंतर जन्माला येणारया प्रत्येक मुलावर याचा परिणाम झालेला दिसत होता. जातीयतेचे अणुबॉम्ब भारत भूमीवर फोडण्यात आले होते आणि त्याची पाळेमुळे इतकी घट्ट रोवली गेली आहेत कि जन्माला येणारा प्रत्येक भारतीय जातीयतेचे अपंगत्व घेऊनच जन्माला येतोय !! हे सत्य आहे.


 


जातीबाहेर लग्न केलं म्हणून मुलीचा खून करणारी जात पंचायत याच महाराष्ट्रात दिसून आली तिथे आणखी काय बोलायचे !!




लेखं- अमोलभाऊ गायकवाड.

आपल्या भारतीय राष्ट्रध्वजाला तिरंगा नव्हे चौरंगा बोला !!

 आपल्या भारतीय राष्ट्रध्वजाला तिरंगा नव्हे चौरंगा बोला !!







आपला राष्ट्रीय ध्वज हा तिरंगा वास्तविक हा ध्वज तिरंगा नसून तो चार रंगाचा म्हणजे चौरंगा आहे. आपण अशोक चक्राचा रंग विचारात न घेतल्यामुळे आपण त्याला तिरंगा म्हणतो. मात्र भारताचे केंद्रीय सांस्कृतीक मंत्रालय राष्ट्रीय ध्वजाचा उल्लेख तिरंगा असा करत नाही तर चौरंगा असाच करते. तशी नोंद त्या मंत्रालयाने केलेली आहे.








या तिरंगा ध्वजातील सर्वात पहिला रंग वरच्या बाजूचा ज्याला आपण लाल, केशरी, कोणी भगवा, कोणी नारंगी म्हणतो. या रंगाला आपल्या भारतीय संविधानाने एका विशेष अशा नावाने वर्णित केले आहे. ते म्हणजे इंग्रजीत या रंगाला ओशर असे म्हटलेले आहे. ओशर म्हणजे लालसर पिवळ्या अशा आपल्या कोकणी मातीचा रंग जो तांबड्या व पिवळ्या रंगाचे मिश्रण असतो. हा रंग आपल्या धम्मगुरुंच्या म्हणजेच बौध्द भिक्खूंच्या चिवराचा रंग असतो. चिवर हे बौध्द भिक्खूंचे वस्र आहे. ते वस्र त्यागाचे प्रतिक आहे.


 


दुसरा म्हणजेच मधला रंग हा पांढरा असून या रंगाला सुध्दा बुध्द धम्मात महत्त्वाचे असे स्थान आहे. पांढरा रंग हा शांती व सत्याचा प्रतिक आहे. हा रंग शांती व सत्याचा प्रतिक असल्याने बौध्द उपासक आणि उपासिका शील ग्रहण करीत असताना नेहमी पांढरया रंगाचे वस्र परिधान करतात.


 


ध्वजातील तिसरा रंग म्हणजेच शेवटचा खालचा रंग हा हिरवा असून हा रंग निसर्गावर व प्राणीमात्रांवर प्रेम करायला सांगतो. हा निसर्गावर व प्राणीमात्रांवर प्रेम करण्याचा बुध्द धम्माच्या पंचशीलेची शिकवण देणारा रंग आहे. शिवाय तिरंग्याच्या मधोमध बुध्द धम्माचे प्रतिक असलेले निळ्या रंगातील अशोकचक्र म्हणजेच धम्मचक्र असून ते सा-या विश्वाला बुध्द धम्माची ओळख करुन देते. असा हा सर्वांगीन बुध्द धम्माची प्रचिती देणारा आपला राष्ट्रीय ध्वज तिरंगा, राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्ण विचारांती व अभ्यासाने आपल्या देशाला म्हणजेच भारताला दिला.


 


थोडक्यात बुध्द धम्माशी निगडित असणारे तिनही रंग व धम्मचक्र हे आपल्या राष्ट्रीय ध्वजात असल्याने या ध्वजावरुन भारत हा बौध्दमय देश असल्याची जाणीव होते. प्रत्येक देशाच्या राष्ट्रध्वजावरुन तो देश कोणत्या धर्माचा पुरस्कार करणारा आहे हे ओळखले जाते. कींवा त्या देशाचा प्रमुख धर्म कोणता हे सांगीतले जात असल्याने आपल्या राष्ट्रीय ध्वजातूनही भारत हा बौध्दमय देश असल्याचे स्पष्ट होते.

 



संदर्भ ग्रंथ-


 

१. राष्ट्रीय प्रतिक- राष्ट्रध्वज व भारतीय ध्वज संहिता, भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने प्रकाशित केलेल्या पुस्तिका.

 


२. जाधव केशर आर (२०११) भारतीय राष्ट्रध्वजाचा इतिहास आणि त्यातील अशोकचक्राचे महत्त्व, 'शुभाय प्रकाशन मुंबई-२८



३. सम्मासम्बुध्द , ऑगस्ट २०१३


छायाचित्र धन्यवाद- संदीप गायकवाड.



लेखं धन्यवाद- देव भिवसने सर.

परिवर्तनाच्या चळवळीत काम करणाऱ्यासाठी मित्रत्वाचा संदेश !!

परिवर्तनाच्या चळवळीत काम करणाऱ्यासाठी मित्रत्वाचा संदेश !!




आपल्या परिवर्तनवादी विचारांच्या तरुणांचा मला प्रचंड आदर वाटतो. पण बर्याचदा काही जण भरकटलेली विधानं करतात. आपला लढा वैचारिक आणि कृतीशील आहे की कट्टरवादी आणि बालिश आहे यात गल्लत करतात. अशी गल्लत माझीही होते. पण मग ती आपण सुधारायला हवी का नको ??


मागे मी एक विधान वाचलं,





'बाबासाहेबांनी दाखवलं एकच बोट,
भटबामणं सगळी भिकारचोट !'




मी त्याला मेसेज केला, असलं कायतरी खुळचट टाकू नकोस, तर तो म्हणाला, असल्यांना असच हाणलं पाहिजे. बराच वितंडा झाला.


 

अशाने आपण आपल्याचबद्दल गैरसमज पसरवतो. निष्कलंक जगण्याच्या दोन पध्दती, एक कुणाला आपल्यावर बोट ठेवायला जागा द्यायची नाही, आणि दोन कुणी विनाकारण बोट उचललं तर त्याला सोडायचं नाही.


निरंजन लांडगे, डॉ. सुनील यादव, गौरव गायकवाड, निलेश कळसकर, शंकर माने आणि असे अनेक परिवर्तनवादी तरुण संदर्भपूर्ण मांडणी करतात, जिथे निकोप चर्चा होते. वाद झाले तरी ते सत्याग्रही असतात. पण विनाकारण उपरोक्त विधानांसारखी विधानं करुन आपण आपल्याबद्दल अपमान का निर्माण करुन घ्या?






बाबासाहेबांनी असं कधीच कुठे म्हटलेले नाही. सगळेच ब्राम्हण परिवर्तनाच्या विरोधात नाहीत. ब्राम्हणत्वाच्या वर्णवर्चस्वाने मनुवाद जन्मला हे सत्य बुध्दिवादी ब्राम्हण नाकारत नाहीत. पण मनुवाद जास्त कुणी पोसला असेल तर तो ब्राम्हणेतरांनीच. आपण ब्राम्हण पुजार्यांना ज्योतिषांना विरोध करतो तेव्हा त्यांच्या या व्यवसायांना शरण गेलेले ब्राम्हणेतरच मी जास्त दोषी ठरवेन. परिवर्तन म्हणजे आपल्याला अशा लोकांच्या मानसिकतेत बदल करणं अपेक्षित आहे. अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो हे बाबासाहेबांचं प्रतिपादन खूप काही शिकवतं.


 

मला एवढच वाटतं की आपण आपली प्रतिमा विनाकारण खराब करु नये, हिंदुत्ववाद्यांची समस्त मुस्लिमद्वेषाची भूमिका आणि अशा विधानांना दुजोरा देत समस्त ब्राम्हणद्वेषाची भूमिका यात फरक काय उरतो मग?


 

कारण मनुवादी किंवा वर्णवर्चस्ववादी फक्त ब्राम्हणच आहेत असे नाहीये.


 

ध्येयवेडं असणं ही चांगली गोष्ट आहे, पण ध्येयापोटी वेडगळ विधानं आणि कृती ही ध्येयाला बाधक ठरते.




 

विचार - डॉ आशिष तांबे(सोबत प्रबोधन टीम)

प्रत्येक अतिरेकी कारवाईवेळी स्फोटावेळी मुसलमानांनाच दोषी ठरवणं हा देखील अतिरेकच आहे !!

प्रत्येक अतिरेकी कारवाईवेळी मुसलमानांनाच दोषी ठरवणं हा देखील अतिरेकच आहे !!




कधी नव्हे ते पवारसाहेबांचं पटलं आपल्याला, आता ती मतांची राजकीय खेळी वगैरे असणं ओघाने आलच, पण मुद्दा काय? त्यांनी मांडलेला मुद्दा !

 




शुक्रवार या दिवशी कुठला मुसलमान अतिरेकी मशिदीत बॉम्बस्फोट करेल का ? देशात कुठेही अतिरेकी कारवाई झाली की संशयित म्हणून जे पकडले जातात ते मुसलमानच! मग तो स्फोट शुक्रवारी मशिदीत का झाला असेना. अतिरेक हा वाईटच ! कुणाचा का असेना ! अगदी माझाही ! प्रत्येकाचा ! अतिरेकाला मापदंड नसतो, नसावाच.

 



म्हणूनच. प्रत्येक अतिरेकी कारवाईवेळी स्फोटावेळी मुसलमानांनाच दोषी ठरवणं हा देखील अतिरेकच आहे.

 


मागे कुणीतरी पोस्ट केलं होतं. मलाही तेच वाटतं. माझं कुणीतरी एखाद्या रेखाचित्रकाराकडे वर्णन करावं आणि मला न पाहता, माझं वर्णन सांगणार्याची बुध्दी पातळी आणि रेखाचित्रकाराची बुद्धीपातळी कमाल मर्यादेवर एकत्र येऊन माझं डिट्टो चित्र काढावं, मी म्हणाल ती पैज हारेन.

 


स्फोट झाला रे झाला की अशी रेखाचित्र प्रसिद्ध होतात, यांची उपयुक्तता तपासायला हवी. बरं लगेच दोघांना चौघांना अटक होते. मग संपूर्ण तपासाला दोनपासून वीसपर्यंत किती वर्ष लागतील याची खात्री नाही. मग अशावेळी एखाद्या निरपराध्याला केवळ त्याच्या धर्मामुळे सजा भोगावी लागली तर तो एका अतिरेकाच्या प्रतिक्रियास्वरुप अतिरेक आहे असे मी मानेन.

 


मला जर अशी विनाकारण प्रदीर्घ शिक्षा झाली तर मला एकेकाला गोळ्या घालून ठार करावं वाटणं मी अतिशय स्वाभाविक मानतो.

 



अतिरेकाला जात धर्म नसतो. आपण अतिरेकाला एक धर्म चिकटवलाय, मुळात हा आपलाचा अतिरेक आहे. एका कृष्णा भास्कर कुलकर्णीमुळे मी संपूर्ण ब्राम्हणांना पिंजऱ्यात उभं करणार नाही. तो माझ्या बुध्दीचा अतिरेक ठरेल, तसच सीमेपारच्या काही कट्टरवाद्यांमुळे मी आख्खा इस्लाम दोषी ठरवणार नाही.






मी कुठल्याही दहशतवादाचा पाठीराखा नाही. मुस्लिम मदरश्यांमधून जसे कट्टरवादाचे धडे दिले जातात तसे आपणही कट्टरवादाचे धडे घेतोच की. आपण काय फक्त कट्टरवाद कट्टरवाद खेळत राहायचं का? यामागचं राजकारण तुमच्या का लक्षात येत नाही? तुमची नेमकी भूमिका काय आहे? तुम्ही इस्लामी दाम्पत्त्याच्या पोटी जन्मलेल्या नवजात अर्भकाचाही द्वेषच करणार का? तुम्ही अभिमान हा शब्द वापरलात. जावेद शेख नावाचा माझा एक मित्र पंजाब बॉर्डरवर आहे, मला त्याचा अभिमान आहे. आता तुम्ही विचाराल असे किती? तर पहा मला टक्केवारीशी काही घेणं देणं नाही. सैन्यात एकही मुस्लिम नाही का? आझाद हिंद सेनेचे बहुतांशी रेजिमेंटप्रमुख मुस्लिम होते. अब्दुल हमीद अब्दुल कलाम हे भारतीय नाहीत का? काही मुस्लिम दहशतवादी आहेत तसे काही हिंदूही आहेत, वर त्यातील काहींची नावेही आलीत. मुस्लिम कट्टरवादी म्हणणार हिंदू मुस्लिमांवर जुलूम करतायत, हिंदू कट्टरवादी मुस्लिमांबाबत हे बोलणार, मग आपण काय आजन्म कट्टरवाद कट्टरवादच खेळत राहायचं का? शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न.


वर्णव्यवस्था कायम टिकवून उच्चवर्णीय छुपा आतंकवाद खेळत आहे त्याबद्दल तुमचे मत काय आहे?? हे कृत्य तर आतंकावादाच्या कृत्यापेक्षाही भयंकर कृत्य आहे. काही फ़क्त नालायक लोकांमुळे सर्वानाच वाईट ठरवीता येत नाही. आम्ही जर आमच्याच भारताच्या ईतिहासात ढुंकुन पाहीले तर उचचवर्णीयासारखे अतिरेकी आम्हाला जगात कुठेच पहायला आणि वाचायला मिळनार नाही.

 



अत्यंत दुर्दैव आहे.असं चित्र उभं केलं जातं की मुसलमान म्हणजे अतिरेकी मग मालेगाव मधील पांडे, नांदेड मधील पुरण्याला सापडलेले अतिरेकी मुसलमान होते काय ? इंदिरा गांधींना कोणी मुसलमानाने मारले काय ? महात्मा गांधींना कोणी मुसलमानाने मारले काय ? राजीव गांधींना कोणी मुसलमानाने मारले काय ? काय चाललंय काय ? अरे अतिरेकींना जात- धर्म नसतो. जे मुसलमान अतिरेकी असतील त्यांना भर चौकात ठेचुन मारा पण या देशावर प्रेम करणार्या सर्वसामान्य मुसलमानांचा त्या अतिरेक्यांशी काय संबंध ? हि भुमिका आपन समजुन घेतली पाहिजे. 






प्रिय मित्र-मैत्रिणीनो एक धर्मांधता दुसर्या धर्मांधतेला जन्म देते. अतिरेक्यांना जन्म घालते. देशातील तरुणांनी धर्मांधतेकडे वळू नये. धर्मनिरपेक्षवाद हाच आपल्या देशाचा मुख्य पाया आहे.



नोट- उपरोक्त मत सर्वांना पटावं असा माझा अजिबात आग्रह नाही. ज्याला योग्य वाटतं त्याने स्वीकारा ज्याला अयोग्य वाटतं त्याने सोडून द्या. मी माझ्या मतांवर ठाम आहे.

 

लेखं- डॉ.आशिष तांबे(सोबत प्रबोधन टीम)

नागपंचमी निम्मित … सापांबद्दल माहितीपट सांगणारा हा लेखं !!

नागपंचमी निम्मित... सापांबद्दल माहितीपट सांगणारा हा लेखं !!

 

 

नाव उच्चारताच बहुतेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. पण हि भीती जितकी भयानक वाटते तितकीच ती पोकळ आहे असं मला वाटतं, कारण सापांबद्दल भारतीय समाजात अवास्तव अंधश्रद्धा पसरलेल्या आहेत ज्याला कारणीभूत काही अंशी येथील अंधानुकरण करणारी सांस्कृतिक मानसिकता आहे. परवा दिवशी माझ्या एका फेसबुकीय भगिनीने" सापाची भीती वाटते, त्यांचे फोटो मला ट्याग करू नका.." अशा आशयाची एक पोस्ट टाकली होती, तेव्हा याचे गांभीर्य लक्षात आले व हा लेख लिहिण्याचे मनात आले.




मी सापांविषयी जनमानसांत असलेल्या काही महत्वाच्या अंधश्रद्धा व त्यांची शास्त्रीय कारणासहित निरसन करून त्यांच्याविषयीची भीती घालवून मित्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करेन. हि 'लेखमाला' प्रश्न उत्तराच्या स्वरूपात असेल. ती वाचा आणि स्वतःसोबत इतरांनाही प्रबोधित करा....

प्रश्न १ - साप किंवा नाग डुख धरतो का..?? किंवा नागीण बदला घेते का..??

  

उत्तर - गावा-खेड्याकडे एक समजूत असते कि मिलनाच्या काळात जर साप किंवा नागाला, नागीणीला मारले तर त्याची माधी किंवा नर त्याचा बदला घेतात, अर्थात डुख धरतात. म्हणजे भारतीय चित्रपट सृष्टीनेसुद्धा याचा नको तितका बाऊ करून हि अंधश्रद्धा वाढवण्याची पुरेपूर काळजी घेतलेली दिसते. पण हे असे खरेच असते काय..??



या प्रश्नांची उत्तरं शोधताना सापांच्या जीवनातील काही गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. सापांचा मिलनाचा काळ फेब्रुवारी-मार्च यादरम्यान असतो. साप हा कळपाने राहणारा प्राणी नाही, तो एकट्याने राहणारा प्राणी आहे. म्हणून मिलनाच्या काळात नर सापांस आकर्षित करण्यासाठी मादीच्या शरीरातून एक चिकट द्रव स्रवत असतो, ज्या द्रवाच्या वासावरून नाग किंवा तत्सम साप हा मिलनाच्या इच्छेने मादिपाशी पोहोचत असतो. याकाळात अशी मिलनेच्छुक मादी ज्या रस्त्यावरून गेली असेल त्या रस्त्यांवर नर साप फिरताना हमखास दिसतात.






वर चित्रात दाखवल्याप्रमाणे सापांची जोडपी गावच्या बाजूस अनेकांनी पाहिली असतील, यालाच काही जण मिलन किंवा "जुगाम' म्हणतात; पण ते खरे नाही. अशा जोड्या या बहुतांशी नर आणि मादीच्या नसतातच मूळी..!! तर कोकीळ जसा गाऊन, मोर जसा नाचून आणि वाघ- सिंहामध्ये जसं युध्द करून नर मादीला मिळवण्याचा, तिला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो अगदी तोच प्रकार सापांच्या बाबतीतही दिसून येतो. जर मादीच्या वासाचा माग काढत दोन नर एकाच वेळी एकमेकांसमोर आले तर मग त्यांच्यात एक छोटेखानी युद्ध होतं. जो नर पहिल्या नरापेक्षा आपली मान उंचावर ठेवण्यात यशस्वी होतो, तो ती लढाई जिंकतो व मादीशी मिलन करण्याची त्याला परवानगी मिळते. वर दाखवलेल्या चित्रातही असेच दोन नर आहेत, जे मादीसाठी लढत आहेत. पण बरेच जण याला मिलन समजतात व प्रसंगी त्या सापांना (गरज नसतानाही) मारतात.


अशावेळी जर त्यातील एखादा साप किंवा नाग मारला गेला आणि त्याच्या शरीराला सरपटताना जर मादीचा तो द्रव लागला असेल तर त्याला मारलेल्या काठीला लागून तो द्रव घरात येऊ शकतो, व त्याच्या वासाने पुन्हा दुसराच एखादा नाग घरात येण्याची शक्यता असते व लोक या प्रकाराला "नाग बदल घ्यायला आला" असे समजतात.


तसेच याकाळात जर 'तशी' एखादी मादी गेलेल्या रस्त्यावरून आपण गेलो तर तिच्या शरीरातून पाझरलेला तो द्रव आपल्या चपलेला लागून घरात येऊ शकतो. त्याच वासाने पुन्हा एखादा नर साप आपल्या घरापर्यंत येण्याची दाट शक्यता असते. व त्या दरम्यानच्या काळात जर चुकून एखादा साप आपल्याकडून दुखावला गेला असेल तर मग अशावेळी घरात आलेला 'तो' साप किंवा नाग बदल घेण्यासाठी आला कि काय...?? अशी समजूत होते, पण तो सापही भलताच असतो आणि तो केवळ मिलनाच्या इच्छेने आलेला असतो किंवा एखाद्या उंदराच्या मागे...डुख धरून किंवा बदल घेण्यासाठी नव्हे..!!


दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सापांचा मेंदू अविकसित असतो, त्याला केवळ "कृष्ण-धवल" म्हणजे 'black & white' दिसते, त्याची दृष्टी हि द्विमितीय (two dimensional) असल्याने त्याला लांबी, रुंदी आणि खोलीचे ज्ञान होत नसते तसेच त्याला ३ फुटांच्या वरचे सगळे अतिशय अंधुक दिसते, अशावेळेस साप एखाद्याचा चेहरा लक्षात ठेवणे आणि त्याचा बदला घेणे हे कोणत्याही सापकारीता शारीरिक आणि नैसर्गिकदृष्ट्या अशक्य कोटीतील गोष्ट आहे.


तेव्हा इथून पुढे जर तुम्हाला कुणी म्हणालं कि, साप बदल घेतात, डुख धरतात तर त्यांना वरील शास्त्रीय करणे देऊन त्यांचे अज्ञान दूर करा, अंधश्रद्धा दूर करून समाज प्रबोधित करा.




माझे पप्पा आणि आजोबा आम्ही लहान असताना सांगायचे कि, गावाकडे काही तांत्रिक बाबा असतात म्हणेजे आपल्याकडच्या जालीम मंत्रांनी सापाचं विष उतरवतात. ते मंत्र इतके जालीम असतात कि' अक्षरशः लोकांनी उचलून आणलेला माणूस सुद्धा त्यांच्याकडून जाताना स्वतःच्या पायांनी चालत जातो.. लहानपणी ते ऐकायला जाम भारी वाटायचं पण जसजसं विचारांमध्ये प्रगल्भता येत गेली तसतसं मन या समजुतीकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागलं, आणि जिथे प्रश्न पडतो तिथे उत्तर शोधणं आलंच..!! मग मी याचा पाठपुरावा केला ज्यातून माझ्यासमोर जे आलं तेच मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे, आशा करतो मला पडलेला हा प्रश्न तुमच्या मनातील प्रश्नचंही निरसन करेल.

 

प्रश्न २ - तंत्र-मंत्रांनी सापाचे विष उतरवता येते का..??

 




 

उत्तर:- या प्रश्नाचं उतार शोधताना आधी काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. मुळात भारतात सापांच्या एकूण ६०० आढळतात, त्यातील केवळ पाचच जाती विषारी आहेत. जशा कि-

 

१. नाग राज (king cobra ) किंवा साधा नाग-




२. मण्यार-



३.घोणस (Russel viper)-



४.फुरसे-
 



त्याचप्रमाणे काही निमविषारी जातीही आहेत.


वरील गोष्टी ध्यानात घेता लक्षात येते कि, विषारी जातींची संख्या व बिनविषारी जातींची संख्या यामध्ये प्रचंड मोठी तफावत आहे. आपल्याला गावखेड्या कडे दिसणारे व चावणारे बरेचसे साप हे मुळात बिनविषारीच असतात. पण भारतीय समाजात एकूणच सापांविषयी असलेली अवास्तव भीती यामुळे 'चावलेला साप हा विषारीच असणार' या समजुतीने, या भीतीनेच माणूस गर्भगळीत होतो, अर्धमेला होतो व त्याला विष चढले कि काय असा सर्वांचा समज होऊन जातो. गावाखेड्याकडे दवाखाने, हॉस्पिटल्स जवळ नसतात आणि देवभोळी माणसं मग साप चावलेल्या माणसास एखाद्या ढोंगी तांत्रिक बाबाकडे घेऊन जातात. (लक्षात ठेवा मित्रांनो, या तांत्रिक बाबांना सुद्धा चांगलेच ठाऊक असते कि, त्या विभागात विषारी जातीचे साप किती असतात, त्यांचा तितका अभ्यास असतो म्हणून ते लोकांना सहज मूर्ख बनवू शकतात.)



तर अशावेळेस एखादा बिनविषारी किंवा मी वर म्हणाल्याप्रमाणे निमविषारी साप चावलेला (बहुतांशी बिनविषारी सापच चावतात, कारण ते विषारी सापांपेक्षा अधिक चपळ असतात व आपले विष वाया जाईल याची त्यांना भीती नसते.) तर असा एखादा बिनविषारी साप चावलेला एखादा व्यक्ती जर अशा बाबाकडे आला तर तसाही कोणत्याही उपचाराविना तो बरा होऊ शकतो, पण त्याच सगळं क्रेडीट त्या तांत्रिक बाबाला जातं आणि लोकांना विषारी अन बिनविषारी सापांमधील फरकच माहित नसल्याने लोकांचा त्याच्यावरील विश्वास वृद्धिंगत होत जातो.


 

निम-विषारी (semi-poisonous ) साप चावल्यानंतरही माणूस मारत नाही, थोडा त्रास जरूर होतो पण मृत्यू होत नाही त्यामुळे असे साप चावल्यासही विना उपचार रोगी बरा होऊ शकतो, आणि जयजयकार त्या बाबाचा होतो.


 

मग काही लोक म्हणतात कि- "आम्ही विषारी साप म्हणजेच नाग, घोणस, मण्यार, किंवा फुरसे चावताना प्रत्यक्षात पहिले आहे.." काही लोक तर साप चावल्यानंतर त्याला शोधून मारतात व दंश झालेल्या व्यक्तीसोबत अशा एखाद्या "तांत्रिक बाबाकडे" घेऊन जातात; जो कधी कधी अस्सल विषारी साप असू शकतो पण तरीही त्याच्या मंत्रांनी तो पेशंट जगतो ते कसे काय..??


 

तर याचे उत्तर देताना एक गोष्ट लक्षात ठेवावी कि, विषारी सापांचे विष हे माणसांना मारण्यासाठी नसतेच मुळी, तर प्रतिस्पर्ध्याला घाबरवण्यासाठी किंवा आपल्या भक्ष्याला चीतपट करण्यासाठी ते असते, त्यामुळे माणसाला चावताना हे साप भक्ष्याला चावताना जितके विष त्याच्या शरीरात सोडतात त्यापेक्षा फार अत्यल्प प्रमाणात ते माणसाच्या शरीरात सोडतात. (ज्याचे प्रमाण भक्ष्यात ३०-३५% तर मनुष्यात फक्त ४-५% च असते). कारण सापाच्या शरीरात हे विष तयार होण्यास बरेच दिवस लागतात, आणि सापांना देखील याची नैसर्गिकरीत्या जाणीव असते त्यामुळे ते विष वाचवण्याच्या प्रयत्नात असतात.


 

महत्वाची गोष्ट म्हणजे याच कारणामुळे बऱ्याच वेळा प्रतिकार म्हणून विषारी साप हे माणसाचा चावा नक्की घेतात पण शरीरात विष सोडत नाहीत, विष सोडायचे कि नाही हे सर्वस्वी त्या सापावर अवलंबून असते. तर हे सांगायचं कारण म्हणजे असा एखादा विषारी साप चावलेला परंतु विष शरीरात न गेलेला माणूस जर अशा तांत्रिक बाबाकडे गेला तर तो कोणत्याही औषधांखेरीज बरा होऊ शकतो. पण परत जयजयकार बाबाचाच होतो.


 

पण असे विष जर शरीरात गेले आणि त्याचा रक्ताशी संपर्क आला तर मात्र लवकर 'प्रतिविष' (anti- venom) न दिले गेल्यास मृत्यू हा अटल असतो, तेव्हा हे मंत्र-तंत्र सुद्धा काहीही करू शकत नाहीत.


 

तेव्हा कधीही कोणाला सर्पदंश झाला तर जखम आधी स्वच्छ पाण्याने धुवा. जर साप विषारी असेल तर जखमेतून रक्तासोबत पांढरे चिकट पाणी वाहू लागेल. जखमेच्या बाजूचा भाग लालसर-काळा पडेल. रोग्याचे शरीर जड झाल्यासारखे वाटेल, बोलताना त्याची जीभ जड होऊन शब्द बोबडे पडतील. अशी लक्षणे दिसल्यास तो दंश विषारी समजावा. अशा व्यक्तीस त्वरित डॉक्टरकडे पाचारण करावे, कारण अशावेळी कोणत्या तंत्रिकाकडे जाणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे.





 

तेव्हा मंत्रांनी सर्पदंश बरा होतो असा जर कुणी दावा करत असेल तर त्याला सांगा कि- " बाबा, आमच्यासमोर एखद्या विषारी सापाचा दंश करून घे नि मंत्रांनी विष उतरवून दाखव." मग बघा तो बाबा ढुंगणाला पाय लावून पळून जातो कि नाही.

 

सर्वाना जाहीर आवाहन -


नागपंचमीनिमित्त नागांचे खेळ दाखविण्याचा प्रयत्न कोणी केल्यास त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा वन विभागाने दिला आहे. या संदर्भात वन विभागाने खास हेल्पलाईन कार्यान्वित केली आहे. श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. गावोगावी झाडांवर, घराच्या पडवीत झुलणारे झोके दिसले की नागपंचमी जवळ आल्याचे लक्षात येते. धार्मिकतेच्या दृष्टीने या दिवशी नागांची पूजा करणे भारतीय संस्कृतीत श्रद्धेचे मानले गेले आहे. नागाला पूर्वीपासून संस्कृतीने देवत्व बहाल केले आहे. नागाचे शास्त्रीय स्थानही महत्त्वाचे आहे. शेतातील उंदीर आणि घुशी त्याचे भक्ष्य असल्याने सर्प शेतक ऱ्यांचा मित्र मानला जातो. त्याच्यामुळे शेतातील धान्याचे संरक्षण होते. सर्पाला मात्र श्रध्दा, अंधश्रध्दा, समज-गैरसमजाला नेहमीच बळी पडावे लागत आहे.


विषारी आणि बिनविषारी हा फरक न समजल्याने अनेकदा सापांना नाहक मारले जाते. नागपंचमीला पूजेतून मिळणाऱ्या पैशांसाठी गारूडी या दिवशी शहरात सर्वत्र फिरतात. सापांचा आणि दूध पिण्याचा काहीही संबंध नाही, असे सामाजिक वनीकरण विभागाने स्पष्ट केले आहे. सापाच्या पचनसंस्थेला दूध पचविता येत नाही. असे असताना या दिवशी नागाला दूध पाजले जाते. गारूडी त्यांचे दात काढून टाकतात. कोणतेही भक्ष्य पकडण्यासाठी दात फार महत्त्वाचे असतात. दात काढल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते, आणि अखेर मृत्यूला सामोरे जावे लागते. नागपंचमीच्या दिवशी या प्रकारांना रोखण्यासाठी वन विभागाने शहरात गारूडी सापाचे खेळ करत असल्यास त्याची माहिती त्वरीत कळविण्याचे आवाहन केले आहे, अशी माहिती विभागीय उपवनसंरक्षक अरविंद पाटील यांनी दिली. विभागाने सर्व कर्मचाऱ्यांना सूचित करून फिरती गस्त पथके निर्माण केली आहेत. अनुचित प्रकार दिसल्यास त्वरीत १५५३१४ या हेल्पलाईनशी संपर्क साधण्याचे आवाहन विभागाने केले आहे.

(By- राज जाधव सर)


 

अंधश्रद्धा सोडू या शेतकऱ्यांचा मित्र नाग वाचवू या-


 
नाग या प्राण्याला केवळ भारतीय संस्कृतीमध्येच नाही, तर जगभरातील अनेक प्राचीन संस्कृतींमध्ये मानाचे स्थान आहे. विषामुळे नागाच्या दंशाबद्दल प्रचंड भीती लोकांच्या मनात वसलेली आहे. नाग- सापाबद्दल भीतियुक्त आदर असतो. महाराष्ट्रात श्रावण महिन्यात नागपंचमी साजरी केली जाते. या दिवशी महिला नागाची किंवा नागाच्या प्रतिमेची पूजा करतात. लाह्या, साळी व दुधाचा नैवेद्य दाखविला जातो. भारतीय परंपरेमध्ये महिला नागाला भाऊ मानतात. नागपंचमीच्या आदल्या दिवशी महिला भावाचा उपवास करतात.

 

 

नागाबद्दलचे गैरसमज व अंधश्रद्धा-



नागाला देवाचे स्वरूप मानले जात असले तरी ग्रामीण भागामध्ये नाग किंवा साप दिसल्यानंतर जिवाच्या भीतीने त्याला ठार मारले जाते. त्यामागे विषारीपणा हा एक महत्त्वाचा भाग असला, तरी साप- नागाबद्दल अनेक गैरसमज लोकांमध्ये पसरलेले आहेत.


नाग डूख धरतो साप किंवा नागामध्ये स्मरणशक्ती विकसित झालेली नाही, त्यामुळे सर्प एखादी घटना लक्षात ठेवू शकत नाहीत.


नाग दूध पितो दूध हे सस्तन प्राण्याचे अन्न आहे, साप हा सस्तन प्राणी नाही.


नाग पुंगीपुढे डोलतो  सापांना कान नसतात. हलणाऱ्या पुंगीवर तो स्वसंरक्षणाच्या दृष्टीने लक्ष ठेवून असतो, त्यामुळे तो डोलल्याप्रमाणे वाटतो. नाग पुंगीवर डंख मारण्याचाही प्रयत्न करतो.


नागाच्या डोक्‍यावर नागमणी असतो कोणत्याही सापाच्या डोक्‍यावर मणी नसतो. नागमणी म्हणून विकले जाणारे मणी बेन्झाईनचे असतात.


नागाच्या गळ्यावरील पट्ट्यांच्या संख्येवरून तो चावलेल्या माणसाच्या मृत्यूचा अंदाज करता येतो माणसाचा मृत्यू हा शरीरावरील दंशाची जागा, दंशाच्या वेळी सोडलेल्या विषाचे प्रमाण, त्याचबरोबर सर्पदंश झालेल्या माणसाची मानसिक अवस्था व त्याला वेळेवर मिळालेले अथवा न मिळालेले योग्य उपचार यावर ठरतो.


विषारी साप दंश करताना उलटा झाल्याशिवाय विष टोचू शकत नाही ः सापाचे विषारी दात हे तोंडाच्या आतील बाजूला वळलेले असतात. ते एखाद्याच्या शरीरात टोचल्यानंतर परत काढण्यासाठी त्याला धडपड करावी लागते, त्यासाठी तो उलटा होतो. त्याचा विष सोडण्याशी फारसा संबंध नाही.

 

विष उतरवण्यासंबंधी अंधश्रद्धा-

 

 



१) सापाचे विष हे मंत्रातंत्राने उतरवता येते.


२) साप चावल्यावर कोंबडीच्या साह्याने विष उतरवता येते.


३) सर्पदंशाच्या ठिकाणी नागवेलीची मुळी उगाळून लावल्यास उलटीवाटे विष बाहेर पडते.


४) कजरीच्या बिया खाल्ल्यास सर्पविष बाधत नाही.


५) दंशाच्या जागी तापवून लाल केलेले लोखंड लावतात  सर्पदंशावर प्रतिसर्पविष हेच एकमेव औषध आहे, अन्य कशाचाही सापाच्या विषावर परिणाम होत नाही, तेव्हा बाकीचे उपाय करत वेळ घालविण्यात काहीच अर्थ नाही. त्वरित जवळच्या दवाखान्यात नेणे, हा एकमेव उपाय आहे.

 

 

शेतकऱ्यांसाठी साप - नाग हे मित्र-



अन्नसुरक्षेचा प्रश्न बिकट होत असताना तयार झालेल्या अन्नापैकी सुमारे 30 टक्के अन्नाचा उंदीर फडशा पाडतात.


उंदराची एक जोडी महिन्याला 14 ते 15 पिल्लांना जन्म देते, ही पिल्ले पुढील एका महिन्यातच प्रजननक्षम होऊन पिल्लांना जन्म देऊ लागतात. त्यामुळे वर्षभरामध्ये एका जोडीपासून 770 उंदीर तयार होतात. सापाचे मुख्य खाद्य हे उंदीर आहे. साप आठवड्याला किमान दोन उंदीर खातात. सापाचे आयुष्य साधारणपणे 13 ते 15 वर्षे असते. या काळात तो लक्षावधी उंदरांचा फडशा पाडतो. उंदरांचे नैसर्गिकरीत्या नियंत्रण होते.

(by- ऍग्रोवन ई-पेपर , Narsing Deshmukh सर)



 

विषारी सापाशी नाद करू नका !!

 





१) सापाचे दुध हे अन्न नाही आहे , सस्तन प्राणीच दुध पितात ते पण आपल्या आईचेच मनुष्य प्राणी अपवाद सोडल्यास नाग हा सस्तन प्राणी नाही तेव्हा नागाला दुध पाजू नका , नागाने दुध पिल्यानंतर दुधाचे पोटात गाठी होऊन नंतर नाग मारतो


२ ) “Wildlife Protection Act 1972” नुसार ,साप पकडणे ,जवळ बाळगणे ,सापाला मारणे व प्रदर्शन करणे कायद्याने गुन्हा आहे.


३ ) विषारी सापां पासून दूर राहा , विषारी साप दिसल्यावर आजीबात हाल चाल करू नका ,हालचाली वर द्वंश करणे हा सापाचा स्वभाव आहे.


४ ) विषारी सापाचे विष हे मंत्राने उतरत नाही,त्यामुळे कोणत्याही देवळात दर्ग्यावर विष उतरवणाऱ्या बाबा कडे विषारी साप चावलेल्या व्यक्तीला घेऊन जाऊ नका त्या ठिकाणी त्या व्यक्तीचा मरण अटळ आहे । जी व्यक्ती वाचते त्या वेळी नकीच समजावे त्या व्यक्तीला बिन विषारी साप चावला आहे .


५ ) विषारी साप चावल्यावर त्वरित जवळ च्या “A.S.V. INJECTION” असणार्या सरकारी दवाखान्यात घेऊन जा. “A.S.V. INJECTION” (सापाच्या विषा पासून इंजेक्शन बनवतात ) हाच एकमेव वैज्ञानिक इलाज आहे आजच्या घडीला.


(By- विवेक साम)


 

सर्पदंशावर प्रतिसर्पविष हेच एकमेव औषध-



प्रतिसर्पविष हेच एकमेव औषध आहे, अन्य कशाचाही सापाच्या विषावर परिणाम होत नाही, तेव्हा बाकीचे उपाय करत वेळ घालविण्यात काहीच अर्थ नाही. त्वरित जवळच्या दवाखान्यात नेणे, हा एकमेव उपाय आहे. सर्प दंश झाल्यास तात्काळ प्रथमोपचार करून इस्पितळात दाखल करावे. बुवा,बापू,कापू,भोंदू कडे नेऊन वेळ घालवू नका.


 

सर्पदंश झाल्यास -

 



 

१) रुग्णाभोवती गर्दी करु नये. त्याला घाबरू न देता स्थिर द्यावा शांतता राखावी.

२) सर्पदंश झालेल्या व्यक्तीस चालणे, बोलणे, पळणे इ. कोणत्याही प्रकारची हालचाल न करता शांत पडून राहण्यास सांगावे.

 

३) सर्पदंश झालेल्या व्यक्तीस उबदार ठेवावे. त्यासाठी गरम कपड्यांचा वापर करावा. रुग्णास दारु देऊ नये.

 

४) सर्पदंश झालेल्या व्यक्तीस उलटी होत असेल तर त्या व्यक्तीस उजव्या किंवा डाव्या कुशीवर झोपवावे. त्याने श्वसनक्रियेस अडथळा होणार नाही.


५) सर्पदंश झालेल्या व्यक्तीस लवकरात लवकर जवळच्या सरकारी रूग्णालयात दाखल करावे.

 

६) रुग्णास बुवा-बाबा किंवा मांत्रिक यांच्याकडे नेऊन वेळ वाया घालवू नये. कारण सर्पदंशावर पोटात दिलेल्या औषधाचा परिणाम होत नाही तसेच जगातील कोणत्याही मंत्राने विष उतरत नाही. त्यासाठी केवळ अँटी स्नेक व्हिनम (अेएसव्ही) हे औषध रुग्णास देणे आवश्यक असते.

 

सर्पदंश आणि प्रथमोपचार-


१. प्रथमोपचार, २. रुग्णांचे स्थलांतर, ३. रुग्णालयातील औषधोपचार -
अ. कृत्रिम श्र्वासोश्र्वास यंत्र, ब. डायलीसीस, क. रक्त संक्रमण, ड.



सर्पविष विरोधी औषधे - (ए.एस.व्ही.), न्यूअीस्टीगमीन, रक्त संक्रमण.
(गरज पडल्यास)

 

१. प्रथमोपचार - काय करावे ?


अ) सर्पदंश झालेला व्यक्ती घाबरलेल्या स्थितीत असतो व त्यामुळे शरीरात विष लवकर पसरुन लवकर विषबाधावा होते. त्यामुळे त्यास धिर देणे आवश्यक असते.
 

ब) सर्पदंश झालेला भाग हृदयाच्या पातळीच्या वर उचलू नये. उदा. हात वर करु नये,

 
क) सर्पदंश झालेल्या व्यक्तीने घाबरुन विनाकारण पळू नये. कारण यामुळे शरीरात लवकर विष पसरते व रुग्ण तात्काळ गंभीर होण्याची भिती असते.

 
ड) त्वरीत जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात/ग्रामीण रुग्णालयात घेवून जावे. (प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात / ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशाकरीता प्राथमिक स्वरुपाची औषधोपचाराची सोय उपलब्ध आहे.)

 
ऊ) रुग्णाला डोळ्यास झापड पडत असेल, श्र्वास घेण्यास त्रास होत असेल, बोलण्यास त्रास होत असेल, गिळण्यास त्रास होत असेल, नाका, तोंडातून, जिभेतून, लघवीतून रक्तस्त्राव होत असेल तर अशा वेळेस वेळ न घालवता सर्व सोई उपलब्ध असलेल्या रुग्णालयात आपल्या रुग्णास, प्रा.आ. केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन त्वरीत स्थलांतर करावे.

 
ए) साप मारला असल्यास सोबत घेवून येणे.

 

काय करू नये-



१) रुग्णास रुग्णालयात नेण्यास दिरंगाई करु नका,


२) आपले अतिमहत्त्वाचे वेळ इतर प्रयोग करण्यात घालवू नका.


३) प्राथमिक उपचार पद्धतीची आपल्या गावातील काही लोकांनी प्रशिक्षण घेणे गरजेचे असते.


४) सर्पदंशा विषयांच्या माहिती, प्रशिक्षण घेवून आपल्या गावातील लोकांना समजावून सांगून गैरसमज दूर करा.






अनेक गारुडी नाग पकडून आणतात. नागांनी फणा काढणे, पुंगीने मोहून जाणे असे खेळ दाखवले जातात. ही प्रथा गेली कित्येक वर्षे सुरू आहे. नाग व इतर अनेक जंगली प्राणी माणसाने भीतीपोटी मारणे फार पूर्वीपासून सुरूच आहे. हे प्राणी निसर्गाचा समतोल टिकवतात, त्यांचे एक विशेष असे काम निसर्गत: सुरू असते. म्हणून त्यांचा नाश होऊ नये आणि विज्ञाना- आधारे अशा प्राण्यांच्या विषयी योग्य माहिती लोकांना कळावी यासाठी चळवळी सुरू आहेत. नागाला मारणार नाही अशा निश्र्चयानेच नागांची चांगली पूजा होईल असा पर्यावरणवादी विचार या उत्सवाबाबत करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते करतात. शेतीचा नाश करणार्या उंदरांचा नाश करण्याचे नागांचे काम सुरू राहणे आवश्यक आहेच. नागाची कात औषधी असते, सुंदर असते, काही सापांचे विष अत्यंत उपयोगी आणि मौल्यवान असते. म्हणूनच साप-नागांची हत्या होऊ नये असा प्रयत्न विज्ञानवादी, पर्यावरण रक्षणासाठी प्रशिक्षित असलेले लोक अलीकडे करत आहेत. या प्रयत्नांमुळे या सणाकडे पर्यावरणीय दृष्टीने पाहण्याचा कल सतत वाढतो आहे. 

 

 

कित्येक भारतीय स्ञीया नागाला दुध पाजण्यासाठी वारुळात दुध सांडतात पण त्याना एकच सागायचे आहे कि तुम्ही जे वारुळात दुध ओततात तेच दुध तुम्ही कुपोशीत बालकांना पाजा ते तुमच नाव तरी घेतील मनुवाद्यांचा कावेपणा आता ओळखा !!



(By- Amol Kore-Mali)


 

लेखं - गौरव गायकवाड (सोबत प्रबोधन टीम) , Amol Kore-Mali, विवेक साम, राज जाधव सर, Narsing Deshmukh सर.


छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...