खालील प्रश्न आरक्षण या विषयाच्या पार्श्वभूमीवर आहेत असे समजून मी उत्तरे देतो !!

खालील प्रश्न आरक्षण या विषयाच्या पार्श्वभूमीवर आहेत असे समजून मी उत्तरे देतो !!



१. स्वातंत्र्य मिळून ६६ वर्षे झाली. खरोखरच किती अन्याय्यग्रस्तांचे जीवनमान सुधारले? आणि किती मध्यस्थांचे? ---- आरक्षण हे पिडीत , गरीब किंवा अन्याय ग्रस्त समाजांचे जीवन सुधारण्यासाअठि आहे हीच मुळात चुकीची समजूत आहे. आरक्षण सर्व समाजघटकांना सत्ताकारण , अर्थकारण आणि एलिट क्लास यात प्रतिनिधित्व - वाटा मिळवुन देते. हि एकप्रकारची रक्त विहीन क्रांति असते. उच्च जातीच्या लोब्या जेंव्हा " नाही रे" वर्गाला… मोक्याच्या स्थानापासून दूर ठेवतात तेंव्हा दाबल्या पिच्लेल्यांना संघर्ष करण्याची उर्मी सहाजिकच येते… ज्यांकडे हरायला काही नसते ते युद्धाला कायमच तयार असतात . ज्या देशात मागास समाजाच्या उत्थानासाठी कोणत्याहि योजना नसतात त्या देशांचे काय होते ? यासाठी पाकीस्थान हे पुरेसे बोलके उदाहरण आहे.


२. जातीभेदामुळे झालेले अनेक देशांचे नुकसान आणि जातीचा उल्लेख बंद केल्यावर झालेली प्रगती याचा हि आपण अभ्यास केला आहे का? --- बिळात साप नाही असे मोठ्याने घोकाल्याने सापाचा धोका टळतो काय ? जातिव्यस्थेचा साप अस्तित्वात आहे- त्याचा उल्लेख टाळून काय मिळेल ? ---- जपान मधे अणुबोब च्या विनाशानंतर तिथल्या सामुराइ या उच्च जातीने सर्व अधिकारपदे सोडुन दिली । आणि जो पर्यंत सर्व समाज घटकांना सत्तेत स्थान मिळत नाही तोपर्यंत आम्ही गवत खाउन राहू अशी घोषणा केली… जपानची झालेली प्रगती आपल्या डोळ्यासमोर आहेच.… । ज्या ज्या सुधारलेल्या देशात जाती /­वर्गभेद तीव्र होते तेथे आरक्षण किंवा तत्सम सुविधा आहेत. उदा : अमेरिकेत - कृष्ण वर्णीय विद्यार्थ्यांचा कोटा पुर्ण भरल्यासा विद्यापिठांना घसघशीत वाढीव सरकारी अनुदान मिळते.


३. व्यक्ती म्हणून मला वाटणारे प्रेम आणि निष्ठा या सर्वप्रथम कोठे असाव्यात जात, देश, धर्म, परंपरा संस्कृती, व्यक्ती? या गहन नैतिक प्रश्नाचे उत्तर द्यायला मी समर्थ नाही . पण व्यक्ती समाज देश … याबद्दल सरकारी धोरणे ठरवताना - अन्यायग्रस्त समाजाचा विचार केला जावा असे वाटते.


४. आपल्या शिक्षण पद्धतीत १७ किंवा २५ % अभ्यास केला कि पदवी मिळते मग आपण त्यात, गुण, फी, आणि skills सर्वच पातळीवर सुट का दिली जाते. अश्या पद्धतीने गुणवत्ता कशी वाढेल- खरे आहे गुणवत्ता वाढीसाठी अधिक प्रयत्नांची गरज आहे.


आरक्षणाने गुणवत्ता कमी होते हो - अशी हाकाटी कायम केली जाते. कोणाची गुणवत्ता ? हा खरा प्रश्न आहे. देशातल्या पन्नास टक्के जनतेला निर्णयप्र्क्रियेतुन दूर ठेवल्यास त्यांची गुणवत्ता सुधारेल काय ? देशाची गुणवत्ता म्हणजे सर्व समाजाची गुणवत्ता . समाजा एका घरात दोन भाऊ आहेत । त्यापैकी दुबळ्या भावाच्या खाण्यापिण्याकडेआई वडिल अधिक लक्ष पुरवतात । प्रसंगी सशक्त भावाकडे दुर्लक्ष … करतात । त्यामुळे कुटुंबाची गुणवत्ता कमी होत नाही - वाढते.



लेखं- डॉ अभिराम दीक्षित सर.

शून्यातून विश्व !!

शून्यातून विश्व !!


पहाटेचा इंतजार करा-

रात्रीच्या अंधाराला घाबरू नका, पहाटेचा इंतजार करा. एक दिवस तुमचाही उजाडेल. वयाच्या ८ व्या वर्षी लग्न झाले आणि बाराव्या वर्षी मी नांदायला सासरी गेले. मात्र सासरच्यांनी छळले. तान्ह्या मुलीसह घराबाहेर पडले. रेल्वेत गाणी म्हणून भिक मागितली. स्मशानात राहिले. जगणे कठीण झाले. अशा परी स्थितीत झगडले, रडले नाही, माघार तर घेतलीच नाही. पोटच्या पोरीला पुण्यात प्रतापराव गोडसे दगडू सेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांच्या हवाली केले आणि मग उपेक्षित मुलांची आई बनले. मी आज १००० अनाथांची आई होऊ शकले, आज माझ्या ३२० सुना व २६५ जावई आहेत , माझा एक मुलगा आज माझ्यावरच phd करतो आहे. माझे गाणे, माझे बोलणे वेदनेतून आले आहे, ते वरवरचे नाही.

 

जगायला शिका, देश तुमच्या खांद्यावर आहे-

पतीने गरोदर असताना घरातून बाहेर हाकलून दिले, गाईच्या गोठ्यात मुलीला जन्म दिला. मृतदेहावरील पिठाची त्याच ठिकाणी भाकरी करून खाल्ली. रेल्वेत भिक मागून उदरनिर्वाह केला. आयुष्यात मी कधी थांबली नाही, आयुष्याला फुलस्ट्योप दिला नाही. रस्त्यावरच्या कागदातील कविता वाचल्या. बहिणाबाई च्या कवितांनी प्रेरणा दिली, सुरेश भटांच्या गझलांनी जगण्याचे बळ दिले. माझ्या काळजातील हुंदका त्यांच्या शब्दात होता, त्या शब्दांनी मी आभाळ पेलायला शिकले. हिम्मत ठेवा, अंगावर आभाळ आले तर मागे हटू नका, त्यावर पाय देउन उभे रहा.

 

स्मशानात खाल्लेली भाकरी विसरणे अशक्य-

माणूस वाईट नसतो तर माणसाची भूक वाईट असते. भुकेनेच मला माणूस बनविले. स्मशानात खाल्लेली भाकरी मला कधीही विसरता येत नाही. सुख नको तर दुखातच जगायला आवडेल. गरोदर असताना मला गाईच्या गोठ्यात टाकण्यात आले, त्या वेळी गाईच्या पोटाखाली मी बाळंत झाले. गाय असून ती माझ्यासाठी माय झाली. दगडाने नाळ तोडताना असा दिवस कोणावर ही येऊ द्या य चा नाही असा निश्चय केला. काही ही नसताना मी जगले तर तुम्ही का जगू शकणार नाही.
 

आयुष्य जगताना तीन वेळा आत्महत्याचा विचार केला. २२ वर्षांनी सासरच्या दारात सत्कार झाला. सासरच्या घरातून बाहेर काढताना माझ्या पातळाला गाठी होत्या. सासरच्या गावी सत्काराला आले तेव्हा पतीच्या धोतराला गाठी होत्या. पतींना रडताना पाहून एकक्षण आनंद झाला तर दुसऱ्याच क्षणी त्यांच्यामुळेच मी घडल्याची जाणीव झाली आणि त्यांना माफ करून टाकल. आज त्याच पतींची पत्नी म्हणून नाही तर आई म्हणून सांभाळ करत आहे.

काय चुकले आमचे ??

काय चुकले आमचे ??


आज हनुमान जयंती आमच्या घरासमोरच हनुमान मंदिर आहे सकाळपासून लाऊडस्पिकरवर हनुमान स्तोत्राचे पठण जोरात सुरु होते नंतर अंजनीच्या सुता वगैरे गाणी सुरु झाली हे सालाबादप्रमाणे दरवर्षी चालू असते, आम्हाला याचा त्रास वगैरे होत नाही. घरच्यांनीही कधी तशी तक्रार केली नाही. घरासमोर मैदान असल्यामुळे बरेचसे कार्यक्रम तीथेच होतात. हनुमान जयंतीचा कार्यक्रम एकच दिवस असतो. त्या आणि अशा कितीतरी दिवसांचा त्रास आम्ही गृहित धरलेला आहे. त्यामुळे (मोठ्या आवाजाचा त्रास )काहि जाणवत नाही आजही याबाबत माझी काहिच तक्रार नाही.


प्रत्येक सण ,उत्सवाला असलेला प्रसाद,महाप्रसाद सर्व घरपोच येते आम्ही मिष्टान्न म्हणून ते ग्रहण करतो. त्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही आणि कुणालाही वाटु नये, मी,माझे कुटूंब विज्ञाननिष्ठ असल्यामुळे असे पदार्थ सेवन केल्याने मी भ्रष्ट होईल, बाटेल अशी अंधश्रद्धा आम्ही पाळत नाही सबब एक शेजारधर्म आणि समाज म्हणून आम्ही प्रत्येक गोष्टित सहकार्य करत असतो आणि या देशातील प्रत्येक आंबेडकरी कुटूंबाची भुमिका हि या पेक्षा वेगळी नाही.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते "तुमची जात-धर्म हा उंबर्‍याच्या आत जेव्हा बाहेर पडाल तेव्हा फक्त आणि फक्त भारतीय म्हणूनच" समाज म्हणून एकत्र रहायचे असेल तर सर्व धर्म समभाव पाळला गेला पाहिजे सर्वांच्या सुख दु:खात आले-गेले पाहिजे...


मात्र हिच गोष्ट इतर समाजाकडून का पाळली जात नाही ??


बुद्धपोर्णिमेला आम्ही खीरदान करत असतो आंबेडकर जयंतीला भोजनदान करतो मात्र तीथे आंबेडकरी समाजाशिवाय कुणीच नसते बोलावले तर थातूरमातूर कारणे सांगून येण्याचे टाळले जाते तरीही, हे सर्व ठीक आहे, मात्र गेल्या दोन दिवसांपासून वर्तमानपत्रांमध्ये बातम्या येत आहेत आंबेडकर जयंतीदिनी काढलेल्या मिरवणूकीत अडवणूक , मारहाण बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबणा, परभणी मध्ये तर कळस केला गेला, दगडफेकीत एका महिलेचा मृत्यु झाला आहे, हेच कृत्य इतर कट्टर धर्मपंथीयांच्याबाबतीत घडले असते तर आज देशात दंगली माजल्या असत्या.


काय चुकले आमचे ??


आंबेडकरी समाजाने कधी कुठल्या श्रद्धास्थानाची विटंबणा केली काय ?? कधी कोणत्या धार्मिक मिरवणूकिवर दगड-फेक केली काय ??


तरीही आज समाजामध्ये तुमच्याकडून तिरस्कारा शिवाय काहीही मिळत नाही तुम्ही समाज म्हणून एकत्र राहण्याच्या लाईकीचे आहात काय ??


हे एकदा तरी तपासून पहा स्वतःच्या मनाला विचारा जातीयवाद, तिरस्कार हा तुमच्या रक्तात किती खोलवर भिनला आहे ?? आणि वर पुन्हा तुम्ही आरक्षण कशाला ?? म्हणून बदमाषि करणार ?? लाज वाटते मी अशा लोकांबरोबर रहातो आहे.


बोला मित्र-मैत्रिणीनो ??


नोट- आपल्या मनातील जातीद्वेष मिटवा म्हणून ही पोस्ट आहे.


लेखं - मिलिंद धुमाळे.


या लिंक ही ओपन करून बघा- 

१ http://www.sataratoday.com/MoreContentPage.aspx?q=809

२ http://epaper.pudhari.com/details.aspx?ID=357091&boxid=233528328&pgno=2&u_name=0

३ https://www.facebook.com/photo.php?fbid=10200294260133612&set=a.1165564453748.163379.1067000417&type=1&relevant_count=1

४ http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=AurangabadEdition-5-3-24-04-2013-5a438&ndate=2013-04-24&editionname=aurangabad

लग्नसराईत उरकले जातात ४00 बालविवाह.... यवतमाळ जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधक कायद्याची पायमल्ली !!


विश्‍वास बसणार नाही; पण पुरोगामी महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यात आजही लग्नसराईत एक दोन नव्हे तर तब्बल ४00 बालविवाह उरकले जातात. कायद्याच्या अज्ञानापोटी सामाजिक संस्थांच्या डोळ्यांत धूळ फेकत अतिदुर्गम भागात हा प्रकार सुरू असल्याची धक्कादायक माहिती लोकमतच्या हाती आली आहे.


बालविवाहावर पायबंद घालण्यासाठी शासन आटोकाट प्रयत्न करीत आहे. युनिसेफसारखी संस्थासुद्धा जागृती करून बालविवाह रोखत असताना मुलीचे हात लवकर पिवळे करण्याच्या उद्देशाने आदिवासीबहुल यवतमाळ जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधक कायदा सर्रास पायदळी तुडविला जात आहे. बालविवाह प्रतिबंधक कायदा १९२९ नुसार मुलाचे वय २१ व मुलीचे वय १८ वर्षे असणे गरजेचे आहे.


बालविवाह होऊ नये म्हणून विविध जनजागृतिपर उपक्रम राबविले जातात. गावस्तरावर आणि जिल्हास्तरावर बालहक्क संरक्षण समित्या काम करतात. तरी या सर्वांना अनभिज्ञ ठेवून पालक बालविवाह लावत आहेत. यामध्ये मुलगी १८ वर्षांच्या आतील असून मुलगा मात्र विवाहयोग्य वयाचा असतो.


युनिसेफने यवतमाळ जिल्ह्याच्या सात तालुक्यांत एनजीओंना बालविवाह रोखण्यासाठी नियुक्त केले आहे. जिल्ह्याच्या इतर नऊ तालुक्यांत मात्र एनजीओ नसल्यामुळे तिथे बालविवाहाच्या प्रकारात वाढ होत असून याचे आकडे मात्र प्रशासनाकडे उपलब्ध नाहीत.


यवतमाळ जिल्ह्यातील १२0५ ग्रामपंचायतींपैकी ७२५ ग्रामपंचायतींनी बालविवाह रोखण्यासाठी ग्रामसभेतून ठरावही घेतला आहे. उर्वरित ४८0 ग्रामपंचायतींमध्ये असे कुठेच ठराव घेतले गेले नसल्याने या ग्रामपंचायत क्षेत्रांतर्गत येणार्‍या गावांमध्ये बालविवाह खुलेआम होत असल्याची माहिती आहे.हे बालविवाह रोखण्याची जबाबदारी संबंधित पोलीस ठाण्याची व ग्रामपंचायतीची असतानाही याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.


दुसर्‍या गावात जाऊन उरकले जातात बालविवाह-

अनेक गावांत बालविवाह लक्षात येईल म्हणून दुसर्‍या गावात मंदिरात जाऊन मोजक्याच नातेवाइकांच्या उपस्थितीत विवाह विधी उरकला जातो. यवतमाळ तालुक्यात नुकताच एक बालविवाह रोखण्याचा प्रयत्न झाला असताना कुटुंबीयांनी कोणालाही न जुमानता कळंब येथील मंदिरात गुढीपाडव्याच्या दिवशी विवाह उरकविला. मोजकेच नातेवाईक व मोजक्याच पत्रिका छापून हे विवाह पार पाडले जातात.


२0१३ मध्ये जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यात सर्वाधिक ११, वणी तालुक्यात सहा, पांढरकवडा तालुक्यात पाच, यवतमाळ तालुक्यात नऊ, दारव्हा तालुक्यात चार, झरी तालुक्यात एक, असे एकूण ३६ बालविवाह रोखण्यात आले. विशेष म्हणजे यवतमाळ तालुक्यातील एका खेड्यातील पाच बालविवाहांचे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले होते. परंतु अनधिकृतपणे बालविवाह होणारी संख्या मात्र स्वयंसेवी संस्थांच्यासुद्धा कल्पनेपलीकडची आहे. जिल्ह्यात एकूण २0४0 गावे असून पाच गावांतून एक बालविवाह अशी सरासरी काढली तरी हा आकडा ४00 वर जात आहे. जिल्ह्यात युनिसेफ अंतर्गत सात तालुक्यांत ४५ क्षेत्रीय संघटक व सात तालुका समन्वयक हे बालविवाह रोखण्यासाठी काम करीत आहेत.


मार्च ते मे या कालावधीत बालविवाह मोठय़ा प्रमाणात होतात. मागील दोन महिन्यांत यवतमाळ जिल्ह्यात एकूण ३६ बालविवाह रोखण्यात स्वयंसेवी संस्थांना यश आले आहे. अनाथ बालिका, एकल पालकत्व, आर्थिक विवंचना, कायद्याचे अज्ञान व गावातील नातेवाइकांचे दबावतंत्र यामुळे बालविवाहांत वाढ होत आहे. बालविवाह थांबवून मुला-मुलींचे व त्यांच्या पालकांचे समुपदेशन करून नंतर योग्य वयात विवाह लावून देणे गरजेचे आहे. किशोरी बैठका व गावकर्‍यांच्या सहकार्यातून हे प्रकार थांबविले जाऊ शकतात.

लेखं - सुनील भेले, युवा वेध संस्था, यवतमाळ

धन्यवाद - लोकमत

संदर्भ - http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=NagpurEdition-2-1-21-04-2013-bdcf8&ndate=2013-04-21&editionname=nagpur

बलात्कार कसे रोखाल ?

बलात्कार कसे रोखाल ?


1. तुमच्या सभोवतील परिस्थितीचे नेहमी भान ठेवा -

सोसायटी किवा ऑफिस इमारतीतील पार्किंग ची जागा किवा वापरत नसलेली जागा, जास्त रहदारी नसलेला रस्ता, उंच इमारतीचे टेरेस अशा जागी बलात्कार होण्याची शक्यता जास्त असते. अशा ठिकाणी जाताना विशेष काळजी घ्या.  तिथे आरोपी लपून बसलेला किवा तुमची वाट पाहत असू शकतो.  गरजच पडली तर गेल्यावर फोन वर मोठ्या आवाजात बोलत राहा म्हणजे तुम्ही एकटे नाहीत असे त्यास वाटेल.



२. तुमच्या कपड्यांची योग्य निवड करा -

हे तुमच्या आकर्षक किवा मादक स्वरूपाच्या कपड्याशी संबंधित नाही.  सार्वजनिक जीवनात जर वाईट प्रसंग आलाच तर पळून जाण्यासाठी किवा स्वताची सुटका करून घेताना उपयोगी पडतील असेल कपडे वापरा.  खूप सैल कपडे किवा उंच कपडे चांगले नाहीत.  जे कपडे अंगावर तंग बसतात ते कधीही चांगले.  जीन्स, बेल्ट बांधलेला पायजमा कधीही चांगले.  ईलास्तिक असलेला पायजामा सारखे सहज काढता येणारे कपडे आरोपीस अत्याचार करायला मदत करतात. म्हणून अंगावरून काढायला अवघड जाईल असे कपडे वापरा.



३. पार्टी आणि बार सारख्या ठिकाणी जास्त काळजी घ्या -


पार्टीत तुमचा ग्लास कोणाच्या हि हातात देऊ नका किवा कोठेही ठेऊ नका.  कोणीही दिलेले पेय पिऊ नका.  स्वताचा ग्लास स्वताच्या डोळ्या देखत भरून घ्या.  आणि भरताना लक्ष द्या.  पेय तेथील वेटर किवा बार टेंडर यांनीच स्वत तुम्हाला दिले पाहिजे इतर व्यक्तीने नाही.

अशा वेळी आपले मित्र किवा मैत्रिणी काय म्हणतील याची अजिबात काळजी करू नका.  जर तुम्हाला काही शंका आली तर ते पेय न पिता बाथरूम ला जाण्याचे नाटक करून तुम्ही पेय फेकून देऊ शकतात.


४. स्पष्ट आणि उघडपने बोलणे शिका -

सार्वजनिक ठिकाणी किवा जीवनात जर कोणी तुमच्या कडे कारण नसताना किवा वाईट नजरेने पाहत असल्याचे तुम्हास दिसले तर लगेच त्याच्याशी थोडी हुज्जत घालायला पाहिजे.  तुम्ही काहीच बोलले नाही तर त्याची हिम्मत वाढत जाते.  त्यामुळे स्पष्टपणे बोलायला शिका.   शंका आलीच तर अशी व्यक्तीचे वय, व्यक्तिमत्व, नाते याचा विचार करू नका.  आजकाल वडील सुद्धा मुलीवर बलात्कार करतात अशा घटना होत आहे.



५. तुमची केसांची style तपासा -

होय, तुमचे केसांची style ने आरोपीला मदत होऊ शकते.  लांब वेणी किवा सुटे केस तुम्हाला पकडायला मदत करतात. सैल केस नकोत किवा सहज पकडता येतील अशी वेणी नको.



६. जोरात ओरडा -

काहीही शंका आली तर जोरात ओरडा.  लक्षात घ्या कोणी तात्पुरते मूर्ख म्हंटले तर चालेल पण बलात्कार झालेला नको.



७. मोठ्या आवाजाच्या ठिकाणी जास्त काळजी घ्या -

पार्टी किवा समारंभात जेथे मोठ्या आवाजात संगीत किवा गाणी वाजवली जात असेल तेथे जास्त काळजी घ्या.  कारण तिथे तुमचे ओरडणे सुद्धा इतरांना ऐकू जाणार नाही आणि मदतीला येऊ शकणार नाही.  चांगल्या मित्र किवा मैत्रीनिसोबातच राहा.



८. आत्मविश्वासाने चला किवा वावरा -

चालताना पाठ सरळ ठेवा.  पाऊले टाकताना आत्मविश्वासाने टाकत आहे असे दिसले पाहिजे.  स्वताची रक्षा करायला आपण समर्थ आहोत आहे इतरांना दिसले पाहिजे.  आरोपी अश्या स्त्रीच्या शोधात असतो जी गरीब आणि स्वताची रक्षा करू शकणार नाही.


९.  स्वताची वैयक्तिक माहिती कोणाला देऊ नका -

कोणालाही आपली माहिती देऊ नका उदा. फोन नंबर, फोटो, पत्ता. Internet वर सुद्धा आपली माहिती टाकू नका.  कोणासही भेटण्यास एकटे जाऊ नका.  Internet वरील मैत्रीवर भरवसा करू नका.


१०.  बगीच्यात किवा समुद्र किनारी फिरायला सोबत कुत्रा घ्या -

अश्या ठिकाणी नेहमी जात असेल तर कुत्रा नक्की सोबत असू द्या.  लहान किवा मोठा कसाही आकार असू द्या कुत्र्यांना धोक्याची सूचना लवकर मिळते आणि ते धोक्याचा सामना नक्कीच करतात.


११.  कोणी पाठलाग करत असेल तर त्या व्यक्तीच्या नजरेला नजर द्या -

थोडी जरी शंका आली कि कोणी पाठलाग करत आहे तर थोडे थांबून न घाबरता मागे ओळून नजरेला नजर द्या तो व्यक्ती नक्की घाबरेल आणि त्याला कळेल कि हि महिला कमजोर नाही.


१२.  मानसिक दृष्ट्या अश्या वाईट प्रसंगी तुम्ही काय आणि कसा प्रतिकार कराल याची योजना आखून ठेवा -

समजा कोणी तुमच्यावर वाईट प्रसंग करायला लागला तर तुम्ही काय आणि कसा प्रतिकार कराल याची योजना आखून ठेवा. उदा. ओरडणे, आरोपीच्या गुप्तांगाला मारणे, डोळे नाक अशा नाजूक भागाला मारणे इ.  यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल.


१३.  मदत केंद्राचे नंबर हाताशी ठेवा -

पोलीस आणि महिला मदत केंद्राचे नंबर लक्षात ठेवा. मोबाईल वर लगेच call करता येईल असे ते राहू द्या.


इतर काही प्रासंगिक उपाय योजना-


१. प्रसंग - रात्री लिफ्ट मध्ये -

जर कंपनीच्या किवा एखाद्या उंच इमारतीच्या समजा १३ व्या मजल्यावर तुम्हाला जायचे असेल आणि लिफ्ट मध्ये अनोळखी मनुष्य आणि तुम्ही एकट्याच असेल तर ?
लिफ्ट मध्ये प्रवेश करा. आणि समजा १३ व्या मजल्यावर जायचे असेल तर १३ व्या पर्यंत सर्व मजल्याची बटन दाबा. जी लिफ्ट प्रत्येक मजल्यावर थांबते अशा लिफ्ट मध्ये कोणीही तुमच्यावर बलात्कार करण्याचे धाडस नाही करणार.



२. प्रसंग - घरात एकटे असताना -

घरात कोणी तुमच्यावर हल्ला केला तर तुम्ही तुमच्या स्वयंपाक घरात पळा. फक्त तुम्हाला माहित असते कि लाल मिरची किवा हळद कुठे आहे. किवा चाकू, चिमटे कुठे आहे. वेळप्रसंगी या साधनांचा खूप चांगला उपयोग होतो. काहीच नसेल तर भांडी अशा व्यक्तीच्या अंगावर फेकत राहा. आणि हो जोर जोरात ओरडा. असा आवाज आरोपीचा शत्रू असतो कारण त्याला पकडले जावे असे कधीही वाटू शकत नाही.


३. प्रसंग - रात्रीच्या वेळी रिक्षा किवा Taxi घेताना -
रात्री एकटे असताना रिक्षा, Tax मध्ये प्रवेश करताना तिचा नंबर लिहून घ्या. आणि घरी मोबाईल वरून कोल करून तो नंबर सांगा, सांगताना ड्रायवर ला ऐकू जाईल असेल मुद्दाम संभाषण करून सांगा. फोन जरी घरच्यांनी किवा मित्रांनी उचलला नाही तरी नाटक करा कि त्यांनी ते ऐकले आहे. ड्रायवरची हि आपोआप जबाबदारी निर्माण होईल कि त्याने सुरक्षित तुम्हाला घरी पोचवावे. (कारण त्याचे Details तुम्ही घरी किवा मित्रांना दिले आहे )


४. प्रसंग - जर गाडीचा ड्रायवरने नको त्या रस्त्यावर गाडी वळवली आणि तुम्हाला धोका दिसतोय -
तुमच्या हातातील वस्तूंचा वापर करा उदा. पर्स किवा दुपट्टा. यांचा वापर करून तुम्ही त्याच्या मानेला आवळून मागे खेचू शकतात. लगेचच त्याला गळा चोक -उप होऊन helpless वाटेल. जर दुपट्टा नसेल तर क्वालर पकडा.


५. प्रसंग - जर तुमचा कोणी पाठलाग करत असेल तर -
कोणत्याची दुकानात घुसा आणि त्यांना पाठलाग बद्दल सांगा. जर रात्र असेल आणि दुकाने बंद असेल तर ATM box मध्ये जा. तेथे सुरक्षा रक्षक असतोच आणि विदिओ केमेरा सुद्धा असतो त्याला घाबरून कोणी हल्ला करणार नाही.


हि माहिती आपल्या बहिणीला, मुलीला आणि माहिती असलेल्या सर्वच महिलांना वाचायला द्या काळजीपूर्वक वाचून मनाने सुदृढ आणि आत्मविश्वासपूर्ण राहिल्यास बरेच प्रसंग टाळता येऊ शकतात आणि वेळ प्रसंगी सामना करून आपली सुटका करता येऊ शकते.


लेखं - किरण शिंदे.(Kiran Shinde)

संदर्भ - http://coffeewithkiranshinde.blogspot.in/2013/04/blog-post_22.html

आज २२ एप्रिल - जागतिक वसुंधरा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

आज २२ एप्रिल - जागतिक वसुंधरा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!


Mobile, कॉम्प्युटर, वातानुकुलीत यंत्रे, गाड्या, मोटर बाईक, पेट्रोल, डीझेल, रॉकेल, लाकूड, कागद, फर्निचर, कृत्रिम रंग, कृत्रिम कपडे, प्लास्टिक यांचा कमीत कमी वापर करा, आवश्यक असेल तिथेच वापर करा. पाणी , विद्युत उर्जा आणि इंधनाची बचत करा....


आणि सर्वात महत्वाचे लोकसंख्यावाढ करू नका, भाराभर लेकुरे जन्माला घालू नका, वंशाचा दिवा म्हणजे मुलगा ही संकल्पनाच रद्द करा, जे मुल होईल ते स्वीकारा, आपोआप स्त्रीमुक्ती होईल आणि घराणेशाही नष्ट होइल.....


"धरतीका बोझ मत बढाओ", Creativity करायची असेल, योग्य तो विचार, आपापसात आदान-प्रदान करून आणि निसर्गाशी अनुरूप होऊन निसर्गाची हानी न होता किंवा कमीत कमी हानी होत असेल तरच नवनिर्माण करा.


सध्या भरपूर सुखसोयी उपलब्ध अहेत. पण साधन संपत्तीचे योग्य ते वाटप झालेच नाही. गरीब गरीबच होत चाललेत आणि श्रीमंत अत्यंत माजोरपणे आणि मुजोरपणे संपत्ती ओरबाडून उपभोगत आहेत.


धर्म, वंश, जात, प्रांत, भाषा, श्रीमत-गरीब यातील सर्व मतभेद मिटवा. उच्च नीचता, वर्णव्यवस्था नष्ट करा, सर्व प्रेषितांचा आदर करा. प्रेषित हे कोठल्याही धर्माचे नाहीत तर त्यांचे विचार मानव जातीच्या कल्याणासाठी आहेत. आपण असे नाही केले तर आपला विध्वंस होईल आणि पुढील मानवी पिढी अस्तितवात असेल तर आपल्याला माफ करणार नाही...


प्रत्येकाने सुरवात तर स्वतःपासून केली पाहिजे. केवळ आजच दिवस नाही तर यापुढील प्रत्येक दिवशी, प्रत्येक वेळी आपण याचे भान ठेवले पाहिजे......


सर्व विश्व नागरिक, सर्व प्राणी-पक्षीमात्रे, वृक्षावल्लरी चिरायू होवो.… "जय वसुंधरा दिन…… !!"

 

लेखं - Dnyanesh Parab

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...